शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळातही डाळिंब बाग फुलवणारे

By admin | Updated: March 25, 2016 23:37 IST

: विलास शिंदे ४०० डाळिंबाची झाडे रोगाला बळी पडली नाहीत. या ४०० डाळिंबाच्या झाडातून त्यांनी सुरुवातीला पाच ते सात लाख रुपयांचे उत्पन्न घेतले.

जत पूर्व व उत्तर भागात डाळिंबाचे क्षेत्र मोठे आहे. चांगल्या दर्जाची परदेशात निर्यात होणारी डाळिंब ही उत्तर भागाची नव्याने ओळख तयार होत आहे. वाळेखिंडी (ता. जत) येथील डाळिंब बागायतदार शेतकरी विलास शिंदे यांनी २२ लाख रुपयांची कमाई केलीआहे. वाळेखिंडी (ता. जत) या गावात पूर्वी पारंपरिकच उदा. ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा, मका हीच पिके घेतली जात होती. कालांतराने डाळिंब बागांकडे शेतकऱ्यांचा कल वाढला. आधुनिक व निर्यातक्षम डाळिंब बागाच्या शेतीचे तंत्रज्ञान माजी सरपंच संभाजीराव शिंदे यांनी अवगत केले. त्यांनी हे तंत्रज्ञान स्वत:पुरते मर्यादित न ठेवता इतर शेतकऱ्यांनाही डाळिंब बागांसाठी प्रवृत्त केले. विलास अशोक शिंदे यांना वडिलांच्या निधनानंतर २००२ मध्ये एसटी महामंडळामध्ये कंडक्टरची नोकरी मिळाली. नोकरी जरी मिळाली तरी त्यांना शेतीचे क्षेत्र खुणावत होते. त्यामुळे स्वत:च्या दीड एकर क्षेत्रात १४ बाय १० अंतरावर सुरुवातीस भगव्या जातीच्या डाळिंबाची एकूण ४०० रोपांची लागवड केली. मृग नक्षत्राच्या सुरुवातीला म्हणजेच जून महिन्यात बागांचा बहर घेतला. त्यानंतर पाणी एक दिवसाआड पुरविले जाते. डाळिंबाचे क्षेत्र सर्वत्र वाढले तरी, हल्ली बिब्ब्या, तेल्या यासारख्या रोगाला बागा बळी पडत आहेत. याचा विचार विलास शिंदे यांनी करून चांगल्या प्रतीची औषध फवारणी केली. हस्त नक्षत्रात उष्ण व दमट हवामान असल्याने बागावर बिब्ब्या व तेल्या रोगाचा हल्ला लगेच होतो. त्यासाठी हवामानाचा अगोदरच अभ्यास शिंदे यांनी केला. त्यामुळे ४०० डाळिंबाची झाडे रोगाला बळी पडली नाहीत. या ४०० डाळिंबाच्या झाडातून त्यांनी सुरुवातीला पाच ते सात लाख रुपयांचे उत्पन्न घेतले.काहीवेळा डाळिंबाच्या दराबाबत व्यापाऱ्यांकडून फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे उत्पन्न चांगले काढले तरी बाजारपेठेचा अभ्यास असावा लागतो. पहिल्या ४०० डाळिंबाच्या झाडांपासून उत्पन्न मोठ्या प्रमाणात मिळाल्याने पुन्हा दुसऱ्या दीड एकरात आणखी ४०० डाळिंबाच्या झाडांची लागवड शिंदे यांनी केली. ही झाडे १२ बाय ७ या अंतरावर लावली. या ४०० झाडांची जोपासना पूर्वीसारखीच नियोजनबद्धरित्या केली. आता एकूण ८५० डाळिंबाची झाडे आहेत. सर्व झाडांना ठिबक संचनाद्वारे पाणी दिले जाते. पाण्याची पातळी कमी होत आहे. तरीही बोअरवेल घेऊन पाण्याचे योग्य नियोजन करुन सध्या ८५० डाळिंबाच्या झाडांची काळजी घेतली आहे. येत्या मे महिन्यात पुन्हा बागांची छाटणी करून जून महिन्यात बागांचा बहर शिंदे धरणार आहेत.सतत नवनवीन प्रयोग करणाऱ्या शिंदे यांनी परिसरातील शेतकऱ्यांना डाळिंब बागा लावण्यासाठी मोलाची साथ दिली आहे. त्यामुळेच वाळेखिंडी डाळिंब बागायतदारांचे गाव म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.शेती व्यवसायात चुलत बंधू हणमंत शिंदे, माजी सरपंच संभाजी शिंदे, पत्नी अश्विनी, आई अलकाताई यांची मोलाची साथ मिळत आहे. शेतीबरोबरच पाण्याच्या व्यवस्थापनासाठी पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष विक्रमसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली विलास शिंदे यांनी जोराचे प्रयत्न सुरू आहेत. वाळेखिंडी विशेषत: जत उत्तर भागातील डाळिंबाला योग्य भाव राहण्यासाठी डाळिंब बागायतदार संघ स्थापन करणार असल्याचे विलास शिंदे यांनी सांगितले. - भागवत काटकर दुष्काळ हा जत तालुक्याला पाचवीला पुजलेला. या दुष्काळी जत तालुक्यात अत्यंत कमी पाण्यावर डाळिंब बागा फुलविण्यात शेतकऱ्यांना यश आले आहे. डाळिंब बागांना प्रतिकूल हवामान, कमी पाणी यामुळे दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांना डाळिंबापासून लाखो रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळत आहे. विशेषत: जत पूर्व व उत्तर भागात डाळिंबाचे क्षेत्र मोठे आहे. चांगल्या दर्जाची परदेशात निर्यात होणारी डाळिंब ही उत्तर भागाची नव्याने ओळख तयार होत आहे. वाळेखिंडी (ता. जत) येथील डाळिंब बागायतदार शेतकरी विलास अशोकराव शिंदे यांनी सलग ७ वर्षे डाळिंबाचे उत्पन्न घेत २२ लाख रुपयांची कमाई केलीआहे. वडिलांच्या निधनानंतर २००२ पासून एसटी महामंडळात कंडक्टरची नोकरी सांभाळत आव्हानात्मक बनलेल्या डाळिंबाच्या शेतीत मिळवलेले हे उत्तुंग यश सर्वांनाच प्रेरणा देणारे आहे. त्यांचा या कामाचा आदर्श आता इतर शेतकरी घेताना दिसत आहेत...