शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी टापूतही आंदोलन पेटणार

By admin | Updated: January 14, 2015 23:20 IST

उदगिरी, नागेवाडी कारखाना लक्ष्य : स्वाभिमानी संघटनेची तयारी सुरू

दिलीप मोहिते-विटा -चालू गळीत हंगामात उसाला एफआरपीप्रमाणे दर मिळत नसल्याने जिल्हाभर सुरू असलेले ऊस दराचे आंदोलन आता दुष्काळी खानापूर तालुक्यातही पोहोचण्याचे संकेत असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुष्काळी खानापूर तालुक्यातील बामणी-पारे येथील उदगिरी व नागेवाडीचा यशवंत साखर कारखाना लक्ष्य केल्याची चर्चा आहे. यामुळे विटा पोलिसांनीही स्वाभिमानीच्या हालचालींवर लक्ष केंद्रित केले आहे.२०१४-१५ च्या चालू गळीत हंगामात कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या उसाला एफआरपीप्रमाणे दर न देता प्रतिटन १ हजार ९०० रुपये दर जाहीर केला आहे. त्या दराप्रमाणेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बॅँक खात्यावर रक्कम वर्ग केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाला एफआरपीप्रमाणे दर द्यावा, यासाठी शेतकरी संघटनांच्या माध्यमातून शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या आंदोलनाने उग्ररूप धारण केले आहे.खानापूर तालुक्यातील बामणी-पारे येथे माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांचा उदगिरी शुगर, तर खा. संजय पाटील यांच्या ताब्यातील नागेवाडीचा यशवंत शुगर या दोन साखर कारखान्यात उसाचे गळीत सुरू आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गेल्या महिन्यात मंगरूळ फाट्यावर आंदोलन करून विटा-तासगाव महामार्ग सुमारे दोन तास रोखून धरला होता. त्यावेळी आंदोलनकर्ते व शेतकऱ्यांची समजूत काढून ऊस दराबाबत सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते. परंतु, महिना संपला तरी, याबाबत कोणताही ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे आता शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते शेतकऱ्यांची पुन्हा एकदा मोळी बांधून एफआरपीप्रमाणे ऊस दर पदरात पाडून घेण्यासाठी निर्णायक लढा देणार आहेत.एफआरपीप्रमाणे उसाला दर मिळावा, या मागणीसाठी मंगळवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने येडेमच्छिंद्र येथे साखरसम्राटांच्या पुतळ्याचे दहन, तर ताकारी, बहे, आष्टा (ता. वाळवा), वसगडे, पाचवा मैल, माळवाडी, आमणापूर येथे रास्ता रोको करण्यात आला. कवठेएकंद येथेही सोमवारी कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. मात्र जिल्ह्यातील जमावबंदी आदेशामुळे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने अनुचित प्रकार घडला नाही. याच पार्श्वभूमीवर त्यामुळे खानापूरसारख्या दुष्काळी टापूतही नजीकच्या काळात आंदोलन पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून विटा पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष केंद्रित केले आहे.ऊस दराच्या प्रश्नावर केवळ कागदी घोडे नाचवून एका बाजूला शेतकऱ्यांना कोरडी सहानुभूती, तर दुसऱ्या बाजूला कोणतीच कृती न करता कारखानदारांना संरक्षण देण्याची दुटप्पी भूमिका सरकारने घेतली आहे. त्यामुळे सरकार व साखर कारखानदारांच्या या भूमिकेचा निषेध करीत असून, सरकारला याची किंमत मोजावी लागेल.- अ‍ॅड. सुभाष पाटीलसरचिटणीस, शेकापएफआरपीप्रमाणेच दर द्या : हिंमतराव जाधवखानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी अत्यंत कष्टाने व पुरेसे पाणी नसतानाही ऊस पीक घेतले आहे; परंतु साखरसम्राटांनी शासनाच्या एफआरपीप्रमाणे दराला बगल देऊन प्रतिटन १ हजार ९०० रुपये देण्याची घोषणा करीत त्याप्रमाणे रक्कम देण्यास सुरुवात केल्याने शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. एफआरपीप्रमाणे दर न दिल्यास आता उदगिरी व नागेवाडी कारखाना कार्यक्षेत्रातही स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभे करणार आहे, असा इशारा खानापूर तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष हिंमतराव जाधव यांनी दिला.