शहरं
Join us  
Trending Stories
1
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
2
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
3
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
4
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
5
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
6
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
7
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
8
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
9
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
10
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
11
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
12
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
13
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
14
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
15
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
16
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
17
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
18
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
19
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
20
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!

दुष्काळी टापूतही आंदोलन पेटणार

By admin | Updated: January 14, 2015 23:20 IST

उदगिरी, नागेवाडी कारखाना लक्ष्य : स्वाभिमानी संघटनेची तयारी सुरू

दिलीप मोहिते-विटा -चालू गळीत हंगामात उसाला एफआरपीप्रमाणे दर मिळत नसल्याने जिल्हाभर सुरू असलेले ऊस दराचे आंदोलन आता दुष्काळी खानापूर तालुक्यातही पोहोचण्याचे संकेत असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुष्काळी खानापूर तालुक्यातील बामणी-पारे येथील उदगिरी व नागेवाडीचा यशवंत साखर कारखाना लक्ष्य केल्याची चर्चा आहे. यामुळे विटा पोलिसांनीही स्वाभिमानीच्या हालचालींवर लक्ष केंद्रित केले आहे.२०१४-१५ च्या चालू गळीत हंगामात कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या उसाला एफआरपीप्रमाणे दर न देता प्रतिटन १ हजार ९०० रुपये दर जाहीर केला आहे. त्या दराप्रमाणेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बॅँक खात्यावर रक्कम वर्ग केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाला एफआरपीप्रमाणे दर द्यावा, यासाठी शेतकरी संघटनांच्या माध्यमातून शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या आंदोलनाने उग्ररूप धारण केले आहे.खानापूर तालुक्यातील बामणी-पारे येथे माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांचा उदगिरी शुगर, तर खा. संजय पाटील यांच्या ताब्यातील नागेवाडीचा यशवंत शुगर या दोन साखर कारखान्यात उसाचे गळीत सुरू आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गेल्या महिन्यात मंगरूळ फाट्यावर आंदोलन करून विटा-तासगाव महामार्ग सुमारे दोन तास रोखून धरला होता. त्यावेळी आंदोलनकर्ते व शेतकऱ्यांची समजूत काढून ऊस दराबाबत सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते. परंतु, महिना संपला तरी, याबाबत कोणताही ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे आता शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते शेतकऱ्यांची पुन्हा एकदा मोळी बांधून एफआरपीप्रमाणे ऊस दर पदरात पाडून घेण्यासाठी निर्णायक लढा देणार आहेत.एफआरपीप्रमाणे उसाला दर मिळावा, या मागणीसाठी मंगळवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने येडेमच्छिंद्र येथे साखरसम्राटांच्या पुतळ्याचे दहन, तर ताकारी, बहे, आष्टा (ता. वाळवा), वसगडे, पाचवा मैल, माळवाडी, आमणापूर येथे रास्ता रोको करण्यात आला. कवठेएकंद येथेही सोमवारी कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. मात्र जिल्ह्यातील जमावबंदी आदेशामुळे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने अनुचित प्रकार घडला नाही. याच पार्श्वभूमीवर त्यामुळे खानापूरसारख्या दुष्काळी टापूतही नजीकच्या काळात आंदोलन पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून विटा पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष केंद्रित केले आहे.ऊस दराच्या प्रश्नावर केवळ कागदी घोडे नाचवून एका बाजूला शेतकऱ्यांना कोरडी सहानुभूती, तर दुसऱ्या बाजूला कोणतीच कृती न करता कारखानदारांना संरक्षण देण्याची दुटप्पी भूमिका सरकारने घेतली आहे. त्यामुळे सरकार व साखर कारखानदारांच्या या भूमिकेचा निषेध करीत असून, सरकारला याची किंमत मोजावी लागेल.- अ‍ॅड. सुभाष पाटीलसरचिटणीस, शेकापएफआरपीप्रमाणेच दर द्या : हिंमतराव जाधवखानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी अत्यंत कष्टाने व पुरेसे पाणी नसतानाही ऊस पीक घेतले आहे; परंतु साखरसम्राटांनी शासनाच्या एफआरपीप्रमाणे दराला बगल देऊन प्रतिटन १ हजार ९०० रुपये देण्याची घोषणा करीत त्याप्रमाणे रक्कम देण्यास सुरुवात केल्याने शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. एफआरपीप्रमाणे दर न दिल्यास आता उदगिरी व नागेवाडी कारखाना कार्यक्षेत्रातही स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभे करणार आहे, असा इशारा खानापूर तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष हिंमतराव जाधव यांनी दिला.