शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

चालकामुळे वाचले सांगली, मिरजेतील प्रवाशांचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 00:10 IST

सांगली : मिरज डेपोची नाशिक-मिरज ही बस खेड-शिवापूर येथे आल्यानंतर पुढील वाहनांनी अचानक ब्रेक लावल्यामुळे शनिवारी एक विचित्र व मोठा अपघात होणार होता. चालकाने प्रसंगावधान राखून बस एका हॉटेलच्या कठड्यावर नेऊन आदळल्याने सांगली, मिरजेतील ४२ प्रवाशांचे प्राण वाचले.शनिवारी रात्री सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मिरज डेपोची नाशिकहून मिरजेला निघालेली ...

सांगली : मिरज डेपोची नाशिक-मिरज ही बस खेड-शिवापूर येथे आल्यानंतर पुढील वाहनांनी अचानक ब्रेक लावल्यामुळे शनिवारी एक विचित्र व मोठा अपघात होणार होता. चालकाने प्रसंगावधान राखून बस एका हॉटेलच्या कठड्यावर नेऊन आदळल्याने सांगली, मिरजेतील ४२ प्रवाशांचे प्राण वाचले.शनिवारी रात्री सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मिरज डेपोची नाशिकहून मिरजेला निघालेली बस (क्र. एमएच 0९, १७१५) ही खेड-शिवापूरजवळ आल्यानंतर महामार्गावर एक घटना घडली. समोरील दोन वाहनांच्या आडवी एक कार आल्यामुळे पुढील सर्व वाहनांनी जोराचा ब्रेक लावला. त्यामुळे वाहने जागच्या जागी थांबली. मिरज डेपोच्या बसपुढेच सातारा आगाराची एक बस होती. ती बसही लडबडली. त्यामुळे मोठा अपघात होणार हे चालकाला जाणवले. अचानक ब्रेक दाबल्यानंतरही ही बस समोरच्या बसवर आदळणारच होती. त्यामुळे चालक एस. के. शिंदे यांनी स्टेअरिंग जोरात फिरवून बस एका हॉटेलच्या दिशेने नेली कठड्यावर नेऊन थांबविली.अचानक ब्रेक लावून एसटी बस रस्त्याकडेला एका हॉटेलच्या कठड्यावर गेल्याने प्रवाशांचाही तोल गेला, मात्र कोणतीही दुर्घटना घडली नाही. ज्यावेळी हा प्रकार त्यांच्या लक्षात आला तेव्हा साºया प्रवाशांनी खाली उतरून सुटकेचा श्वास सोडला. कुणी देवाला, तर कुणी चालकाला धन्यवाद देऊ लागले. चालकाच्या प्रसंगावधानाबद्दल प्रवाशांनी कौतुक केले. त्यानंतर रात्री उशिरा ही बस मिरजेच्या दिशेने रवाना झाली.