शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नेवरीतील बंधाऱ्याचे स्वप्न अद्याप अपुरेच

By admin | Updated: August 29, 2014 23:11 IST

तीनवेळा पूजन : शेतकऱ्यांत मोठ्या प्रमाणात नाराजी

गणेश पवार - नेवरी  --नेवरी (ता. कडेगाव) येथील येरळाकाठावरील महादेव मंदिराजवळ कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्याचे आतापर्यंत दोन ते तीनवेळा पूजन झाले आहे. अद्याप त्या ठिकाणी बंधाऱ्याचे काम सुरू नसल्याने शेतकऱ्यांचे या नदीवरील कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्याचे स्वप्न अद्याप अपुऱ्या अवस्थेत राहिले आहे. यामुळे स्थानिक शेतकऱ्यांतून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात असून शेतकऱ्यांचे स्वप्न अपुरेच राहिले आहे.येरळा नदीवरील महादेव मंदिराजवळ शासकीय अधिकाऱ्यांकडून जागेची पाहणी होऊनही बरीच वर्षे लोटली. अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना काम पूर्ण होणार असल्याचे गाजर दाखविण्यात आले. याठिकाणी मातब्बर नेत्यांनी प्रत्यक्ष वाजत गाजत येऊन श्रीफळ वाढवून बंधाऱ्याचा प्रारंभ केला. गेल्या दहा वर्षांपूर्वी महादेव मंदिराजवळील या कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्याचा शेतकऱ्यांसाठी हा एक फार्स झाला आहे. स्थानिक शेतकऱ्यांनी बऱ्याचदा संबंधित अधिकाऱ्यांकडे या बंधाऱ्याची चौकशी केली असता, निधी उपलब्ध नसल्याबाबत अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. बरीच वर्षे लोटली असतानाही या शेतकऱ्यांनी ताकारी योजनेच्या पाण्यावर स्वत:च्या खर्चातून मोठ्या प्रमाणावर शेतीसाठी पाईपलाईन केल्या आहेत. विविध बॅँकांतून कर्जे घेऊन शेतीमध्ये ऊस लागवडी केल्या आहेत. या बंधाऱ्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना शेतीच्या पाण्याचा मोठा प्रश्न सुटणार असून अजून अधिक क्षेत्र ओलिताखाली येऊ शकते. मात्र प्रशासनाच्या गांधारीच्या भूमिकेमुळे महादेव मंदिराजवळील कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्याचे नशीब कधी उघडणार, अशी चर्चा शेतकऱ्यांतून केली जात आहे. या ठिकाणी बंधाऱ्याचे काम न झाल्याने वाळू तस्करांनी मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे दोन्ही बाजूने नुकसान झाले आहे. हा बंधारा नेवरीतील शेतकऱ्यांसाठी एक चर्चेचा विषय बनला असून हा बंधारा होणार की नाही, याकडे लक्ष वेधले आहे. येरळाकाठावरील तुपेवाडी, येतगाव, भिकवडी खुर्द, विठ्ठलनगर, ननवरे मळा याही भागातील शेतकऱ्यांना कोल्हापूर पध्दतीच्या बंधाऱ्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. संबंधित खात्याने वेळीच लक्ष देऊन निधी उपलब्ध करून या बंधाऱ्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.