शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

मराठा आरक्षणाबाबत श्वेतपत्रिका काढा

By admin | Updated: November 2, 2016 00:00 IST

भारत पाटणकर : बलवडी (भा.) येथे बळिराजा धरणाचा वर्धापन दिन कार्यक्रम

आळसंद : राज्यातील एकूण लोकसंख्येनुसार मराठा समाजाची लोकसंख्या सहा कोटी इतकी आहे. मात्र, मराठा समाज आजही विकासापासून वंचित व मागासलेला आहे. त्यामुळे ही वस्तुस्थिती असल्याने सरकारने मराठा आरक्षणाबाबत श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी केले. बलवडी (भा.) तांदळगाव (ता. खानापूर) येथील येरळा नदीवर लोकसहभागातून बांधण्यात आलेल्या बळिराजा धरणाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. पाटणकर बोलत होते. यावेळी सरपंच मनीषा दुपटे, मोहनराव कदम, अ‍ॅड. कृष्णा पाटील, डॉ. प्रशांत पन्हाळकर, अनिल पाटील, विलास चव्हाण यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. डॉ. पाटणकर म्हणाले, राज्यातील युती शासनाला दोन वर्षे झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत राज्यातील शेतकऱ्यांना पाणी देणे अवघड आहे. हे विधान फडणवीस यांनी मागे घ्यावे. २५ एप्रिलला झालेल्या बैठकीत सर्वांना समन्यायी पाणी वाटप पध्दतीने पाणी देता येईल. गेल्या वीस वर्षांपासून चळवळीच्या माध्यमातून पाण्यासाठी लढा सुरू आहे. त्याला आता यश आले आहे. टेंभू, ताकारी योजनेचे वीज बिल शासनाने १०० टक्के भरावे, दुष्काळी भागातील लोक उंचावर राहिले आहे. हा त्यांचा गुन्हा आहे का? असा सवाल करत सध्या ८० टक्के वीज बिल शासन, तर २० टक्के वीजबिलबाबत लवकरच जनसुनावणी होणार आहे. त्यामुळे पाणीपट्टी भरण्यास शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करावा. बळिराजा धरण पात्रातील गाळ काढण्यासाठी किमान १५ दिवस पात्र कोरडे ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे. तरच नदीपात्र स्वच्छ करता येणे शक्य असल्याचे डॉ. पाटणकर यावेळी बोलताना म्हणाले. यावेळी अ‍ॅड. कृष्णा पाटील, विलास पाटील, आनंदराव पाटील, देवकुमार दुपटे यांनी मनोगत व्यक्त केले. मच्छिंद्र पवार यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमास माजी सरपंच रघुनाथ पवार, पांडुरंग चव्हाण, विक्रम चव्हाण, हसिना मुल्ला, सुरेश चव्हाण, विश्वास दुपटे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर) अग्रणी बारमाही : काम चुकीच्या पध्दतीने खानापूर तालुक्यात मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या अग्रणी नदी बारमाही करण्याचे काम चुकीच्या पध्दतीने झालेले आहे. नदीपात्रातील गाळ काढून बाजूला टाकला होता. तो गाळ पावसाने पुन्हा नदीपात्रात आला आहे. त्यामुळे नदीकाठावर असणाऱ्या विहिरींचे पाणी कमी झाले आहे. मराठवाड्यातील मांजरा नदीचेही काम अशा चुकीच्या पध्दतीने झाल्याचा आरोप डॉ. भारत पाटणकर यांनी यावेळी बोलताना केला.