शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

मराठा आरक्षणाबाबत श्वेतपत्रिका काढा

By admin | Updated: November 2, 2016 00:00 IST

भारत पाटणकर : बलवडी (भा.) येथे बळिराजा धरणाचा वर्धापन दिन कार्यक्रम

आळसंद : राज्यातील एकूण लोकसंख्येनुसार मराठा समाजाची लोकसंख्या सहा कोटी इतकी आहे. मात्र, मराठा समाज आजही विकासापासून वंचित व मागासलेला आहे. त्यामुळे ही वस्तुस्थिती असल्याने सरकारने मराठा आरक्षणाबाबत श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी केले. बलवडी (भा.) तांदळगाव (ता. खानापूर) येथील येरळा नदीवर लोकसहभागातून बांधण्यात आलेल्या बळिराजा धरणाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. पाटणकर बोलत होते. यावेळी सरपंच मनीषा दुपटे, मोहनराव कदम, अ‍ॅड. कृष्णा पाटील, डॉ. प्रशांत पन्हाळकर, अनिल पाटील, विलास चव्हाण यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. डॉ. पाटणकर म्हणाले, राज्यातील युती शासनाला दोन वर्षे झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत राज्यातील शेतकऱ्यांना पाणी देणे अवघड आहे. हे विधान फडणवीस यांनी मागे घ्यावे. २५ एप्रिलला झालेल्या बैठकीत सर्वांना समन्यायी पाणी वाटप पध्दतीने पाणी देता येईल. गेल्या वीस वर्षांपासून चळवळीच्या माध्यमातून पाण्यासाठी लढा सुरू आहे. त्याला आता यश आले आहे. टेंभू, ताकारी योजनेचे वीज बिल शासनाने १०० टक्के भरावे, दुष्काळी भागातील लोक उंचावर राहिले आहे. हा त्यांचा गुन्हा आहे का? असा सवाल करत सध्या ८० टक्के वीज बिल शासन, तर २० टक्के वीजबिलबाबत लवकरच जनसुनावणी होणार आहे. त्यामुळे पाणीपट्टी भरण्यास शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करावा. बळिराजा धरण पात्रातील गाळ काढण्यासाठी किमान १५ दिवस पात्र कोरडे ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे. तरच नदीपात्र स्वच्छ करता येणे शक्य असल्याचे डॉ. पाटणकर यावेळी बोलताना म्हणाले. यावेळी अ‍ॅड. कृष्णा पाटील, विलास पाटील, आनंदराव पाटील, देवकुमार दुपटे यांनी मनोगत व्यक्त केले. मच्छिंद्र पवार यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमास माजी सरपंच रघुनाथ पवार, पांडुरंग चव्हाण, विक्रम चव्हाण, हसिना मुल्ला, सुरेश चव्हाण, विश्वास दुपटे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर) अग्रणी बारमाही : काम चुकीच्या पध्दतीने खानापूर तालुक्यात मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या अग्रणी नदी बारमाही करण्याचे काम चुकीच्या पध्दतीने झालेले आहे. नदीपात्रातील गाळ काढून बाजूला टाकला होता. तो गाळ पावसाने पुन्हा नदीपात्रात आला आहे. त्यामुळे नदीकाठावर असणाऱ्या विहिरींचे पाणी कमी झाले आहे. मराठवाड्यातील मांजरा नदीचेही काम अशा चुकीच्या पध्दतीने झाल्याचा आरोप डॉ. भारत पाटणकर यांनी यावेळी बोलताना केला.