शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणाबाबत श्वेतपत्रिका काढा

By admin | Updated: November 2, 2016 00:00 IST

भारत पाटणकर : बलवडी (भा.) येथे बळिराजा धरणाचा वर्धापन दिन कार्यक्रम

आळसंद : राज्यातील एकूण लोकसंख्येनुसार मराठा समाजाची लोकसंख्या सहा कोटी इतकी आहे. मात्र, मराठा समाज आजही विकासापासून वंचित व मागासलेला आहे. त्यामुळे ही वस्तुस्थिती असल्याने सरकारने मराठा आरक्षणाबाबत श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी केले. बलवडी (भा.) तांदळगाव (ता. खानापूर) येथील येरळा नदीवर लोकसहभागातून बांधण्यात आलेल्या बळिराजा धरणाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. पाटणकर बोलत होते. यावेळी सरपंच मनीषा दुपटे, मोहनराव कदम, अ‍ॅड. कृष्णा पाटील, डॉ. प्रशांत पन्हाळकर, अनिल पाटील, विलास चव्हाण यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. डॉ. पाटणकर म्हणाले, राज्यातील युती शासनाला दोन वर्षे झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत राज्यातील शेतकऱ्यांना पाणी देणे अवघड आहे. हे विधान फडणवीस यांनी मागे घ्यावे. २५ एप्रिलला झालेल्या बैठकीत सर्वांना समन्यायी पाणी वाटप पध्दतीने पाणी देता येईल. गेल्या वीस वर्षांपासून चळवळीच्या माध्यमातून पाण्यासाठी लढा सुरू आहे. त्याला आता यश आले आहे. टेंभू, ताकारी योजनेचे वीज बिल शासनाने १०० टक्के भरावे, दुष्काळी भागातील लोक उंचावर राहिले आहे. हा त्यांचा गुन्हा आहे का? असा सवाल करत सध्या ८० टक्के वीज बिल शासन, तर २० टक्के वीजबिलबाबत लवकरच जनसुनावणी होणार आहे. त्यामुळे पाणीपट्टी भरण्यास शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करावा. बळिराजा धरण पात्रातील गाळ काढण्यासाठी किमान १५ दिवस पात्र कोरडे ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे. तरच नदीपात्र स्वच्छ करता येणे शक्य असल्याचे डॉ. पाटणकर यावेळी बोलताना म्हणाले. यावेळी अ‍ॅड. कृष्णा पाटील, विलास पाटील, आनंदराव पाटील, देवकुमार दुपटे यांनी मनोगत व्यक्त केले. मच्छिंद्र पवार यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमास माजी सरपंच रघुनाथ पवार, पांडुरंग चव्हाण, विक्रम चव्हाण, हसिना मुल्ला, सुरेश चव्हाण, विश्वास दुपटे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर) अग्रणी बारमाही : काम चुकीच्या पध्दतीने खानापूर तालुक्यात मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेल्या अग्रणी नदी बारमाही करण्याचे काम चुकीच्या पध्दतीने झालेले आहे. नदीपात्रातील गाळ काढून बाजूला टाकला होता. तो गाळ पावसाने पुन्हा नदीपात्रात आला आहे. त्यामुळे नदीकाठावर असणाऱ्या विहिरींचे पाणी कमी झाले आहे. मराठवाड्यातील मांजरा नदीचेही काम अशा चुकीच्या पध्दतीने झाल्याचा आरोप डॉ. भारत पाटणकर यांनी यावेळी बोलताना केला.