शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

कर्ज सवलतीवर दाटले त्रुटींचे ढग

By admin | Updated: March 15, 2016 00:24 IST

जिल्हा बँक : जुन्या थकबाकीदारांना लाभ मिळणार नाही

सांगली : जिल्ह्यातील ३६३ टंचाईग्रस्त गावांमधील पीककर्जाच्या वसुलीला स्थगिती देऊन कर्जाच्या पुनर्गठनाचे आदेश राज्य शासनाने दिले असले तरी या सवलतींवर निर्णयातील त्रुटींचे ढग दाटले आहेत. जुन्या थकबादीरांना लाभ न मिळण्याबरोबरच पुनर्गठनातील व्याजाच्या अडचणींमुळे सवलतीच्या योजनेवर पाणी पडण्याची चिन्हे आहेत. सांगली जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांमध्ये गत जिरायत पिकांना ३२५ कोटींच्या पीककर्जाचे वाटप करण्यात आले आहे. या सर्व शेतकऱ्यांना आता शासनाच्या आदेशानुसार कर्जाच्या पुनर्गठनाचा लाभ लागू झाला आहे. याशिवाय जिल्हा बॅँकेला कर्जाची वसुली थांबविण्याचे आदेशही दिले आहेत. या योजनेत २०१५-१६ या आर्थिक वर्षातील कर्जदार शेतकऱ्यांचाच समावेश होणार आहे. त्यापूर्वीच्या वर्षामध्येही दुष्काळ होता. तरीही जुन्या थकबाकीदारांना योजनेचा लाभ मिळणार नाही. याशिवाय कर्जपुनर्गठन करताना व्याजाची टक्केवारी ६ वरून १३ टक्क्यांवर जाते. त्यामुळे यापूर्वीही गारपीट आणि दुष्काळी सवलतीचा लाभ घेण्यासाठी आणि कर्जाच्या पुनर्गठनासाठी टंचाईग्रस्त गावांमधून प्रतिसाद मिळाला नव्हता. कर्जाच्या पुनर्गठनामुळे शासनाच्या व्याज सवलतीचा लाभ या शेतकऱ्यांना मिळत नाही. वेळेत कर्ज परतफेड केल्यानंतर व्याजात मिळणारी सवलत चांगली असल्याने पुनर्गठनाऐवजी टंचाईतही तजवीज करून शेतकरी कर्ज भरत असतात. कर्जवसुलीला स्थगिती आणि पुनर्गठनाचा हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचाच प्रकार आहे. दुष्काळ आणि गारपीट झाल्यानंतर अशीच सवलत शासनाने लागू केली होती. त्यावेळी जिल्ह्यातून केवळ १२ ते १५ शेतकऱ्यांनीच पुनर्गठनाचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सवलतीच्या या निर्णयात असलेल्या त्रुटी दूर होण्याची गरज आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सवलतींच्या नावाखाली असे कुचकामी आदेश निघत असल्याने शेतकऱ्यांना त्याचा योग्य लाभ होत नसल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)तालुकानिहाय लाभार्थी गावेमिरज : ४१कवठेमहांकाळ : ६०जत : ५३तासगाव : ६९कडेगाव : ३९विटा : ६७वाळवा : ८आटपाडी : २६बागायतीला आदेशाची अटजिरायत पिकांसाठी ही योजना लागू होत असताना, बागायतदारांना सवलतीसाठी महसूल अधिकाऱ्याच्या दाखल्याची अट राहणार आहे. तलाठी किंवा संबंधित तहसीलदाराने नुकसानीबाबतचा दाखला दिल्यानंतरच त्यांना सवलतीला लाभ मिळणार आहे. कर्जाच्या वाटपाचा विचार केला, तर बागायत पिकांनाही मोठ्या प्रमाणावर कर्जवाटप करण्यात आले आहे. त्यामुळे बागायतदारांना अधिकाऱ्यांचा दाखला सादर करावा लागणार आहे.