शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कर्ज सवलतीवर दाटले त्रुटींचे ढग

By admin | Updated: March 15, 2016 00:24 IST

जिल्हा बँक : जुन्या थकबाकीदारांना लाभ मिळणार नाही

सांगली : जिल्ह्यातील ३६३ टंचाईग्रस्त गावांमधील पीककर्जाच्या वसुलीला स्थगिती देऊन कर्जाच्या पुनर्गठनाचे आदेश राज्य शासनाने दिले असले तरी या सवलतींवर निर्णयातील त्रुटींचे ढग दाटले आहेत. जुन्या थकबादीरांना लाभ न मिळण्याबरोबरच पुनर्गठनातील व्याजाच्या अडचणींमुळे सवलतीच्या योजनेवर पाणी पडण्याची चिन्हे आहेत. सांगली जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांमध्ये गत जिरायत पिकांना ३२५ कोटींच्या पीककर्जाचे वाटप करण्यात आले आहे. या सर्व शेतकऱ्यांना आता शासनाच्या आदेशानुसार कर्जाच्या पुनर्गठनाचा लाभ लागू झाला आहे. याशिवाय जिल्हा बॅँकेला कर्जाची वसुली थांबविण्याचे आदेशही दिले आहेत. या योजनेत २०१५-१६ या आर्थिक वर्षातील कर्जदार शेतकऱ्यांचाच समावेश होणार आहे. त्यापूर्वीच्या वर्षामध्येही दुष्काळ होता. तरीही जुन्या थकबाकीदारांना योजनेचा लाभ मिळणार नाही. याशिवाय कर्जपुनर्गठन करताना व्याजाची टक्केवारी ६ वरून १३ टक्क्यांवर जाते. त्यामुळे यापूर्वीही गारपीट आणि दुष्काळी सवलतीचा लाभ घेण्यासाठी आणि कर्जाच्या पुनर्गठनासाठी टंचाईग्रस्त गावांमधून प्रतिसाद मिळाला नव्हता. कर्जाच्या पुनर्गठनामुळे शासनाच्या व्याज सवलतीचा लाभ या शेतकऱ्यांना मिळत नाही. वेळेत कर्ज परतफेड केल्यानंतर व्याजात मिळणारी सवलत चांगली असल्याने पुनर्गठनाऐवजी टंचाईतही तजवीज करून शेतकरी कर्ज भरत असतात. कर्जवसुलीला स्थगिती आणि पुनर्गठनाचा हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचाच प्रकार आहे. दुष्काळ आणि गारपीट झाल्यानंतर अशीच सवलत शासनाने लागू केली होती. त्यावेळी जिल्ह्यातून केवळ १२ ते १५ शेतकऱ्यांनीच पुनर्गठनाचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सवलतीच्या या निर्णयात असलेल्या त्रुटी दूर होण्याची गरज आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सवलतींच्या नावाखाली असे कुचकामी आदेश निघत असल्याने शेतकऱ्यांना त्याचा योग्य लाभ होत नसल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)तालुकानिहाय लाभार्थी गावेमिरज : ४१कवठेमहांकाळ : ६०जत : ५३तासगाव : ६९कडेगाव : ३९विटा : ६७वाळवा : ८आटपाडी : २६बागायतीला आदेशाची अटजिरायत पिकांसाठी ही योजना लागू होत असताना, बागायतदारांना सवलतीसाठी महसूल अधिकाऱ्याच्या दाखल्याची अट राहणार आहे. तलाठी किंवा संबंधित तहसीलदाराने नुकसानीबाबतचा दाखला दिल्यानंतरच त्यांना सवलतीला लाभ मिळणार आहे. कर्जाच्या वाटपाचा विचार केला, तर बागायत पिकांनाही मोठ्या प्रमाणावर कर्जवाटप करण्यात आले आहे. त्यामुळे बागायतदारांना अधिकाऱ्यांचा दाखला सादर करावा लागणार आहे.