शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

अग्रणी पुनरुज्जीवनात राजकारण नका

By admin | Updated: June 15, 2015 00:19 IST

राजेंद्रसिंह राणा : नदीपात्रातील जलसंवर्धनाच्या कामांची पाहणीे

खानापूर : अग्रणी नदी पुनरुज्जीवनासाठी सर्वांच्या सहकार्याबरोबरच राजकारणविरहीत सहभागाची गरज आहे. शासनाबरोबर प्रत्येक माणसाने ठरवले तर अग्रणी नदी बारमाही होईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा यांनी केले. जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत अग्रणी पुनरुज्जीवनच्या पाहणीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार अनिल बाबर, प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सौ. अंजली मरोड, उपसभापती सुहास बाबर, जिल्हा परिषद सदस्य सुहास शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. राजेंद्रसिंह राणा म्हणाले, बलवडी (खा.) येथील एका बंधाऱ्याची प्रेरणा घेऊन राज्यात २४००० बंधारे उभा करण्याचे शासनाने प्रयत्न चालू आहेत. त्यापैकी ५००० बंधाऱ्यांचे काम सुरू आहे. आमदार अनिल बाबर यांनी अग्रणी नदी पुनरुज्जीवन करण्याची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे सुरक्षित हातात काम दिल्यामुळे हे काम प्रभावीपणे होणार आहे. तसेच पक्षविरहीत सहभागातून जनतेचे कल्याण होणार आहे. बिनपैशाचीसुध्दा मोठी कामे होऊ शकतात, हे या भागातील लोकांनी दाखवून दिले आहे. यापुढेसुध्दा लोकांच्या बरोबरीने जलबिरादरीचासुध्दा सहभाग राहील, अशी ग्वाही राजेंद्रसिंह राणा यांनी दिली. आमदार अनिल बाबर म्हणाले, आम्ही सर्वांना सोबत घेऊन ही अग्रणी नदी पुनरुज्जीवित करणार आहोत. जिथे गरज असेल, तेथे बंधारे उभे करण्यास मदत करू. या प्रकल्पात राजकीय पक्ष व राजकारण बाजूला ठेवून एकत्रपणे काम करू. लोकांच्या सहकार्याबरोबरच प्रशासनाचा पुढाकार असल्यामुळे या प्रकल्पात कोणतीही अडचण येणार नाही. बाहेरून पाणी, आणून अग्रणी बारमाही होईलच, परंतु लोकसहभागातून पाणी उभा राहिल्यास ती शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद महत्त्वाचा ठरेल. पंचायत समिती, खरेदी-विक्री संघ, मार्केट कमिटी हे सुध्दा अग्रणी नदी पुनरुज्जीवनासाठी मदत करणार आहेत. कृषी विभाग व पंचायत समितीने या कामाच्या गुणवत्तेसाठी प्रयत्न करावेत. कोणतेही काम हे उत्कृष्टच झाले पाहिजे, याबाबत दक्षता घ्यावी, असे आमदार बाबर म्हणाले. पुढे जाऊन प्रशासन कामे करणार आहे. लोकसहभाग आणि शासन यांची सांगड घालून ही कामे करण्यात येणार आहेत. यासाठी विशेष मदत जिल्हाधिकारी शेखर गायकवाड व प्रांताधिकारी सचिन इथापे यांची मिळत आहे. तसेच जलबिरादरीचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. यावेळी जिल्हा कृषी अधिकारी जमदाडे, जि. प. कार्यकारी अभियंता एल. डी. हवेलीकर, तालुका कृषी अधिकारी डुबल, बेणापूर सोसायटीचे अध्यक्ष गणपतराव भोसले, जि. प. सदस्य फिरोज शेख, जलबिरादरीचे डॉ. सुनील जोशी, डॉ. रवींद्र व्होरा, विनोद बोधनकर, संपतराव पवार, नरेंद्र न्युग, देवयानी कुलकर्णी, उपअभियंता डी. डी. कांबळे, पोसेवाडी, बलवडी, ऐनवाडी, गोरेवाडीचे सरपंच राजेंद्र शिंदे, कृष्णदेव शिंदे, बाळासाहेब जाधव, परशराम गायकवाड, सुभाष आप्पा गायकवाड, तसेच तलाठी, ग्रामसेवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजेंद्रसिंह राणा यांनी तामखडी, अडसरवाडी येथील जालिंदरनाथ करी, बलवडी, आपटेमळा, विठ्ठलनगर, बेणापूर, सुलतानगादे, करंजे येथे सुरू असलेल्या अग्रणी नदी पुनरुज्जीवनच्या कामांना भेटी दिल्या. (वार्ताहर) भविष्यात फायदा अग्रणी नदी बारमाही करण्यासाठी जे बंधारे बांधण्यात आले, ते महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात मॉडेल म्हणून पुढे आले आहे. लोकसहभागाबरोबरच राजकारणविरहीत चळवळ उभारण्यात आल्याचा मोठा फायदा झाला आहे. अग्रणी पुनरुज्जीवन हे भल्याचे काम आहे. हे काम बचत खात्यासारखे असून, भविष्यात याचा नक्कीच फायदा होणार आहे.