शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
3
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
4
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
5
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
6
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
7
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
8
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
9
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
10
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
11
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
12
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
13
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
14
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
15
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
16
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
17
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
18
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
19
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
20
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक

अग्रणी पुनरुज्जीवनात राजकारण नका

By admin | Updated: June 15, 2015 00:19 IST

राजेंद्रसिंह राणा : नदीपात्रातील जलसंवर्धनाच्या कामांची पाहणीे

खानापूर : अग्रणी नदी पुनरुज्जीवनासाठी सर्वांच्या सहकार्याबरोबरच राजकारणविरहीत सहभागाची गरज आहे. शासनाबरोबर प्रत्येक माणसाने ठरवले तर अग्रणी नदी बारमाही होईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा यांनी केले. जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत अग्रणी पुनरुज्जीवनच्या पाहणीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार अनिल बाबर, प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सौ. अंजली मरोड, उपसभापती सुहास बाबर, जिल्हा परिषद सदस्य सुहास शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. राजेंद्रसिंह राणा म्हणाले, बलवडी (खा.) येथील एका बंधाऱ्याची प्रेरणा घेऊन राज्यात २४००० बंधारे उभा करण्याचे शासनाने प्रयत्न चालू आहेत. त्यापैकी ५००० बंधाऱ्यांचे काम सुरू आहे. आमदार अनिल बाबर यांनी अग्रणी नदी पुनरुज्जीवन करण्याची जबाबदारी घेतली आहे. त्यामुळे सुरक्षित हातात काम दिल्यामुळे हे काम प्रभावीपणे होणार आहे. तसेच पक्षविरहीत सहभागातून जनतेचे कल्याण होणार आहे. बिनपैशाचीसुध्दा मोठी कामे होऊ शकतात, हे या भागातील लोकांनी दाखवून दिले आहे. यापुढेसुध्दा लोकांच्या बरोबरीने जलबिरादरीचासुध्दा सहभाग राहील, अशी ग्वाही राजेंद्रसिंह राणा यांनी दिली. आमदार अनिल बाबर म्हणाले, आम्ही सर्वांना सोबत घेऊन ही अग्रणी नदी पुनरुज्जीवित करणार आहोत. जिथे गरज असेल, तेथे बंधारे उभे करण्यास मदत करू. या प्रकल्पात राजकीय पक्ष व राजकारण बाजूला ठेवून एकत्रपणे काम करू. लोकांच्या सहकार्याबरोबरच प्रशासनाचा पुढाकार असल्यामुळे या प्रकल्पात कोणतीही अडचण येणार नाही. बाहेरून पाणी, आणून अग्रणी बारमाही होईलच, परंतु लोकसहभागातून पाणी उभा राहिल्यास ती शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद महत्त्वाचा ठरेल. पंचायत समिती, खरेदी-विक्री संघ, मार्केट कमिटी हे सुध्दा अग्रणी नदी पुनरुज्जीवनासाठी मदत करणार आहेत. कृषी विभाग व पंचायत समितीने या कामाच्या गुणवत्तेसाठी प्रयत्न करावेत. कोणतेही काम हे उत्कृष्टच झाले पाहिजे, याबाबत दक्षता घ्यावी, असे आमदार बाबर म्हणाले. पुढे जाऊन प्रशासन कामे करणार आहे. लोकसहभाग आणि शासन यांची सांगड घालून ही कामे करण्यात येणार आहेत. यासाठी विशेष मदत जिल्हाधिकारी शेखर गायकवाड व प्रांताधिकारी सचिन इथापे यांची मिळत आहे. तसेच जलबिरादरीचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. यावेळी जिल्हा कृषी अधिकारी जमदाडे, जि. प. कार्यकारी अभियंता एल. डी. हवेलीकर, तालुका कृषी अधिकारी डुबल, बेणापूर सोसायटीचे अध्यक्ष गणपतराव भोसले, जि. प. सदस्य फिरोज शेख, जलबिरादरीचे डॉ. सुनील जोशी, डॉ. रवींद्र व्होरा, विनोद बोधनकर, संपतराव पवार, नरेंद्र न्युग, देवयानी कुलकर्णी, उपअभियंता डी. डी. कांबळे, पोसेवाडी, बलवडी, ऐनवाडी, गोरेवाडीचे सरपंच राजेंद्र शिंदे, कृष्णदेव शिंदे, बाळासाहेब जाधव, परशराम गायकवाड, सुभाष आप्पा गायकवाड, तसेच तलाठी, ग्रामसेवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजेंद्रसिंह राणा यांनी तामखडी, अडसरवाडी येथील जालिंदरनाथ करी, बलवडी, आपटेमळा, विठ्ठलनगर, बेणापूर, सुलतानगादे, करंजे येथे सुरू असलेल्या अग्रणी नदी पुनरुज्जीवनच्या कामांना भेटी दिल्या. (वार्ताहर) भविष्यात फायदा अग्रणी नदी बारमाही करण्यासाठी जे बंधारे बांधण्यात आले, ते महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात मॉडेल म्हणून पुढे आले आहे. लोकसहभागाबरोबरच राजकारणविरहीत चळवळ उभारण्यात आल्याचा मोठा फायदा झाला आहे. अग्रणी पुनरुज्जीवन हे भल्याचे काम आहे. हे काम बचत खात्यासारखे असून, भविष्यात याचा नक्कीच फायदा होणार आहे.