शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

आटपाडीत नाही प्यायला पाणी... आणि म्हणे दीड लाख रोपे लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 23:43 IST

अविनाश बाड । लोकमत न्यूज नेटवर्क आटपाडी : भीषण दुष्काळाचा सामना करणाऱ्या आटपाडी तालुक्यात जिथे पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकर आणि ...

अविनाश बाड ।लोकमत न्यूज नेटवर्कआटपाडी : भीषण दुष्काळाचा सामना करणाऱ्या आटपाडी तालुक्यात जिथे पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकर आणि जनावरांसाठी चारा छावण्या सुरू आहेत, तिथे वनीकरण विभागाने रोपे विक्री करण्याचे दुकान थाटले आहे! विशेष म्हणजे येथे दीड लाख रोपे विक्री करण्याचे उद्दिष्ट दिले आहे.आटपाडीत जानेवारीत १५ टन मक्याचे बियाणे चाºयासाठी वाटप करण्यात आले. त्याचा काहीच उपयोग झाला नाही. आता वनीकरण विभाग १ जुलै ते ३० सप्टेंबर या तीन महिन्यात म्हणे दीड लाख रोपे लावणार आहे. तालुक्यात सध्या पिण्याच्या पाण्याचे ३७ टॅँकर दररोज १०९ खेपा टाकून लोकांची पिण्याच्या पाण्याची तहान कशी-बशी भागवत आहे. १४ गावे व २२८ वाड्या-वस्त्यांवरील ४९७२२ लोकसंख्या दररोज पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकरची वाट पाहत आहे. २७ छावण्यांमध्ये १८९१२ जनावरे जगण्यासाठी दाखल आहेत.असे असतानाही तालुक्यात वृक्ष लागवड करण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागाने कंबर कसली आहे. खासगी रोपवाटिकेत १५ ते २० रुपयांना मिळणारी रोपे ८ रुपयांना विक्री करून तालुक्यात काम सुरू आहे. दीड लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी तहसील कार्यालयाच्या दारात मंडप ठोकून रोपे विक्रीचे दुकान नव्हे, तर स्टॉल सुरू केला आहे.तालुक्यात पाऊसच नाही, तर लोकांना त्यांच्या शेतात किंवा शासकीय जागेत झाडे लावणे सध्या तरी कठीणच बनले आहे. दि. १ जुलैपासून आजपर्यंत तब्बल ६२ रोपांची विक्री झाली आहे! म्हणजे दररोज ७ ते ८ रोपे विकली जात आहेत. या गतीने रोपे विकली, तर दीड लाख रोपे विकायला १८७५० दिवस म्हणजे ६२५ महिने, म्हणजेच ५२ वर्षे लागतील!वनीकरण नव्हे, पैशाचे कुरण!आटपाडीत दोन वनीकरण विभाग कार्यरत आहेत. ते दरवर्षी लाखोच्या संख्येने कागदोपत्री वृक्ष लागवड करून उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे सांगतात. पण प्रत्यक्षात वाढलेली झाडे कुठेच दिसत नाहीत. ते केवळ भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे. सध्या जांभूळ, आवळा, चिंच, सीताफळ, गुलमोहर, गूळभेंडी, शिसव, करंज, काशीद या झाडांची रोपे दिली जात आहेत. यापैकी अनेक वृक्षांची लागवड परंपरेनुसार केली जात नाही.