शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

आटपाडीत नाही प्यायला पाणी... आणि म्हणे दीड लाख रोपे लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 23:43 IST

अविनाश बाड । लोकमत न्यूज नेटवर्क आटपाडी : भीषण दुष्काळाचा सामना करणाऱ्या आटपाडी तालुक्यात जिथे पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकर आणि ...

अविनाश बाड ।लोकमत न्यूज नेटवर्कआटपाडी : भीषण दुष्काळाचा सामना करणाऱ्या आटपाडी तालुक्यात जिथे पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकर आणि जनावरांसाठी चारा छावण्या सुरू आहेत, तिथे वनीकरण विभागाने रोपे विक्री करण्याचे दुकान थाटले आहे! विशेष म्हणजे येथे दीड लाख रोपे विक्री करण्याचे उद्दिष्ट दिले आहे.आटपाडीत जानेवारीत १५ टन मक्याचे बियाणे चाºयासाठी वाटप करण्यात आले. त्याचा काहीच उपयोग झाला नाही. आता वनीकरण विभाग १ जुलै ते ३० सप्टेंबर या तीन महिन्यात म्हणे दीड लाख रोपे लावणार आहे. तालुक्यात सध्या पिण्याच्या पाण्याचे ३७ टॅँकर दररोज १०९ खेपा टाकून लोकांची पिण्याच्या पाण्याची तहान कशी-बशी भागवत आहे. १४ गावे व २२८ वाड्या-वस्त्यांवरील ४९७२२ लोकसंख्या दररोज पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकरची वाट पाहत आहे. २७ छावण्यांमध्ये १८९१२ जनावरे जगण्यासाठी दाखल आहेत.असे असतानाही तालुक्यात वृक्ष लागवड करण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागाने कंबर कसली आहे. खासगी रोपवाटिकेत १५ ते २० रुपयांना मिळणारी रोपे ८ रुपयांना विक्री करून तालुक्यात काम सुरू आहे. दीड लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी तहसील कार्यालयाच्या दारात मंडप ठोकून रोपे विक्रीचे दुकान नव्हे, तर स्टॉल सुरू केला आहे.तालुक्यात पाऊसच नाही, तर लोकांना त्यांच्या शेतात किंवा शासकीय जागेत झाडे लावणे सध्या तरी कठीणच बनले आहे. दि. १ जुलैपासून आजपर्यंत तब्बल ६२ रोपांची विक्री झाली आहे! म्हणजे दररोज ७ ते ८ रोपे विकली जात आहेत. या गतीने रोपे विकली, तर दीड लाख रोपे विकायला १८७५० दिवस म्हणजे ६२५ महिने, म्हणजेच ५२ वर्षे लागतील!वनीकरण नव्हे, पैशाचे कुरण!आटपाडीत दोन वनीकरण विभाग कार्यरत आहेत. ते दरवर्षी लाखोच्या संख्येने कागदोपत्री वृक्ष लागवड करून उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे सांगतात. पण प्रत्यक्षात वाढलेली झाडे कुठेच दिसत नाहीत. ते केवळ भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे. सध्या जांभूळ, आवळा, चिंच, सीताफळ, गुलमोहर, गूळभेंडी, शिसव, करंज, काशीद या झाडांची रोपे दिली जात आहेत. यापैकी अनेक वृक्षांची लागवड परंपरेनुसार केली जात नाही.