शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

मदतीची घोषणा नको, लेखी आदेश काढा, निवडणुका पुढे ढकला : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 17:05 IST

पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीचा लेखी आदेश काढून त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. जोपर्यंत पूरग्रस्तांचे पुनर्वसन होणार नाही, तोपर्यंत विधानसभेच्या निवडणुका पुढे ढकलाव्यात, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खा. राजू शेट्टी यांनी सांगलीतील पत्रकार परिषदेत केली. या मागणीसाठीच दि. ३१ आॅगस्ट रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देमदतीची घोषणा नको, लेखी आदेश काढा : राजू शेट्टी निवडणुका पुढे ढकला : सांगलीतील पत्रकार परिषदेत मागणी

सांगली : पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीचा लेखी आदेश काढून त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. जोपर्यंत पूरग्रस्तांचे पुनर्वसन होणार नाही, तोपर्यंत विधानसभेच्या निवडणुका पुढे ढकलाव्यात, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खा. राजू शेट्टी यांनी सांगलीतील पत्रकार परिषदेत केली. या मागणीसाठीच दि. ३१ आॅगस्ट रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.ते पुढे म्हणाले, कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला आलेला महापूर हा निसर्ग आणि मानवनिर्मितही आहे. धरणांतून पाणी सोडताना कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांमध्ये कोणताही समन्वय नव्हता. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनाही अलमट्टीच्या अधिकाऱ्यांनी विसर्गाबाबत चुकीची माहिती देऊन फसवणूक केली आहे. म्हणूनच महापूर राष्ट्रीय आपत्ती घोषित करुन केंद्र सरकारने पूरग्रस्तांसाठी २५ हजार कोटींची मदत देण्याची गरज आहे. भविष्यात महापूर येऊच नयेत, यासाठी केंद्रीय जल आयोगाकडेच धरणातील विसर्गाची जबाबदारी सोपविण्यात यावी. तरच भविष्यातील महापूर टाळता येणार आहे.नुकसानीचाच विचार करायचे म्हटले, तर वारणा आणि कृष्णा नदीला आलेला महापूर दहा दिवस होता. ऊस, सोयाबीन, केळी, द्राक्ष, हळद आणि भाजीपाला पीक पाण्यात राहिल्यामुळे कुजले असून त्याचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे एकरी लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना शासन वीस हजाराची मदत करुन त्यांचे नुकसान भरुन येणार नाही. घराची पडझड झाली आहे. या शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी दोन हेक्टरपर्यंतची शंभर टक्के कर्जमाफी द्यावी, वीज बिल, पाणीपट्टी उपसा कर माफ करावा.बुडालेल्या विद्युत मोटारी, मीटर, ठिबक सिंचन संच, ग्रीन हाऊस, गोठा, पोल्ट्री, गुऱ्हाळांचे मोठे नुकसान झाले असून शंभर टक्के भरपाई शासनाने दिली पाहिजे. मृत गाई, म्हशी, बैलांसाठी ५० हजार रुपये आणि मृत शेळी व मेंढी, वासरांना प्रत्येकी दहा हजार रुपये देण्याची गरज आहे. पूरबाधित पशुपालकांना १५ आॅक्टोबरपर्यंत चारा शासनाने उपलब्ध करुन दिला पाहिजे. विहीर दुुरुस्तीसाठी ५० हजाराची मदत मिळाली पाहिजे.

पुरात बुडालेल्या वाहनांना भरपाई देण्याचीही तरतूद शासनाने केली पाहिजे, आदी प्रमुख मागण्यांसाठी दि. ३१ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी ११ वाजता मोर्चा काढणार आहे, असेही माजी खा. शेट्टी यांनी सांगितले. या मोर्चात सर्व पक्ष, संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

मदतीची घोषणा नको, लेखी आदेश काढासांगली : पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीचा लेखी आदेश काढून त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. जोपर्यंत पूरग्रस्तांचे पुनर्वसन होणार नाही, तोपर्यंत विधानसभेच्या निवडणुका पुढे ढकलाव्यात, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खा. राजू शेट्टी यांनी बुधवारी सांगलीतील पत्रकार परिषदेत केली. या मागणीसाठीच दि. ३१ आॅगस्ट रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.ते पुढे म्हणाले, कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला आलेला महापूर हा निसर्ग आणि मानवनिर्मितही आहे. धरणांतून पाणी सोडताना कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांमध्ये कोणताही समन्वय नव्हता. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनाही अलमट्टीच्या अधिकाऱ्यांनी विसर्गाबाबत चुकीची माहिती देऊन फसवणूक केली आहे. म्हणूनच महापूर राष्ट्रीय आपत्ती घोषित करुन केंद्र सरकारने पूरग्रस्तांसाठी २५ हजार कोटींची मदत देण्याची गरज आहे. भविष्यात महापूर येऊच नयेत, यासाठी केंद्रीय जल आयोगाकडेच धरणातील विसर्गाची जबाबदारी सोपविण्यात यावी. तरच भविष्यातील महापूर टाळता येणार आहे.नुकसानीचाच विचार करायचे म्हटले, तर वारणा आणि कृष्णा नदीला आलेला महापूर दहा दिवस होता. ऊस, सोयाबीन, केळी, द्राक्ष, हळद आणि भाजीपाला पीक पाण्यात राहिल्यामुळे कुजले असून त्याचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे एकरी लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना शासन वीस हजाराची मदत करुन त्यांचे नुकसान भरुन येणार नाही. घराची पडझड झाली आहे. या शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी दोन हेक्टरपर्यंतची शंभर टक्के कर्जमाफी द्यावी, वीज बिल, पाणीपट्टी उपसा कर माफ करावा.बुडालेल्या विद्युत मोटारी, मीटर, ठिबक सिंचन संच, ग्रीन हाऊस, गोठा, पोल्ट्री, गुºहाळांचे मोठे नुकसान झाले असून शंभर टक्के भरपाई शासनाने दिली पाहिजे. मृत गाई, म्हशी, बैलांसाठी ५० हजार रुपये आणि मृत शेळी व मेंढी, वासरांना प्रत्येकी दहा हजार रुपये देण्याची गरज आहे. पूरबाधित पशुपालकांना १५ आॅक्टोबरपर्यंत चारा शासनाने उपलब्ध करुन दिला पाहिजे.

विहीर दुुरुस्तीसाठी ५० हजाराची मदत मिळाली पाहिजे. पुरात बुडालेल्या वाहनांना भरपाई देण्याचीही तरतूद शासनाने केली पाहिजे, आदी प्रमुख मागण्यांसाठी दि. ३१ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी ११ वाजता मोर्चा काढणार आहे, असेही माजी खा. शेट्टी यांनी सांगितले. या मोर्चात सर्व पक्ष, संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीSangli Floodसांगली पूर