शहरं
Join us  
Trending Stories
1
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
2
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
3
"विविहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
4
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
5
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
6
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
7
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
8
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
9
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
10
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
11
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
12
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
13
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
14
याला म्हणतात ढासू स्टॉक...! पॉवर कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 30% नं वधारला; दिलाय 6500% चा बंपर परतावा, करतोय मालामाल
15
"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
16
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
17
"मी पोहून आलो, सकाळी घरी..."; बॉन्डी बीचवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्याचा आईला कॉल
18
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
19
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
20
Astrology: नवीन वर्षात नवीन वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी २०२६ मधील तारखा आणि शुभ मुहूर्त 
Daily Top 2Weekly Top 5

मदतीची घोषणा नको, लेखी आदेश काढा, निवडणुका पुढे ढकला : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 17:05 IST

पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीचा लेखी आदेश काढून त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. जोपर्यंत पूरग्रस्तांचे पुनर्वसन होणार नाही, तोपर्यंत विधानसभेच्या निवडणुका पुढे ढकलाव्यात, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खा. राजू शेट्टी यांनी सांगलीतील पत्रकार परिषदेत केली. या मागणीसाठीच दि. ३१ आॅगस्ट रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देमदतीची घोषणा नको, लेखी आदेश काढा : राजू शेट्टी निवडणुका पुढे ढकला : सांगलीतील पत्रकार परिषदेत मागणी

सांगली : पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीचा लेखी आदेश काढून त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. जोपर्यंत पूरग्रस्तांचे पुनर्वसन होणार नाही, तोपर्यंत विधानसभेच्या निवडणुका पुढे ढकलाव्यात, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खा. राजू शेट्टी यांनी सांगलीतील पत्रकार परिषदेत केली. या मागणीसाठीच दि. ३१ आॅगस्ट रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.ते पुढे म्हणाले, कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला आलेला महापूर हा निसर्ग आणि मानवनिर्मितही आहे. धरणांतून पाणी सोडताना कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांमध्ये कोणताही समन्वय नव्हता. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनाही अलमट्टीच्या अधिकाऱ्यांनी विसर्गाबाबत चुकीची माहिती देऊन फसवणूक केली आहे. म्हणूनच महापूर राष्ट्रीय आपत्ती घोषित करुन केंद्र सरकारने पूरग्रस्तांसाठी २५ हजार कोटींची मदत देण्याची गरज आहे. भविष्यात महापूर येऊच नयेत, यासाठी केंद्रीय जल आयोगाकडेच धरणातील विसर्गाची जबाबदारी सोपविण्यात यावी. तरच भविष्यातील महापूर टाळता येणार आहे.नुकसानीचाच विचार करायचे म्हटले, तर वारणा आणि कृष्णा नदीला आलेला महापूर दहा दिवस होता. ऊस, सोयाबीन, केळी, द्राक्ष, हळद आणि भाजीपाला पीक पाण्यात राहिल्यामुळे कुजले असून त्याचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे एकरी लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना शासन वीस हजाराची मदत करुन त्यांचे नुकसान भरुन येणार नाही. घराची पडझड झाली आहे. या शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी दोन हेक्टरपर्यंतची शंभर टक्के कर्जमाफी द्यावी, वीज बिल, पाणीपट्टी उपसा कर माफ करावा.बुडालेल्या विद्युत मोटारी, मीटर, ठिबक सिंचन संच, ग्रीन हाऊस, गोठा, पोल्ट्री, गुऱ्हाळांचे मोठे नुकसान झाले असून शंभर टक्के भरपाई शासनाने दिली पाहिजे. मृत गाई, म्हशी, बैलांसाठी ५० हजार रुपये आणि मृत शेळी व मेंढी, वासरांना प्रत्येकी दहा हजार रुपये देण्याची गरज आहे. पूरबाधित पशुपालकांना १५ आॅक्टोबरपर्यंत चारा शासनाने उपलब्ध करुन दिला पाहिजे. विहीर दुुरुस्तीसाठी ५० हजाराची मदत मिळाली पाहिजे.

पुरात बुडालेल्या वाहनांना भरपाई देण्याचीही तरतूद शासनाने केली पाहिजे, आदी प्रमुख मागण्यांसाठी दि. ३१ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी ११ वाजता मोर्चा काढणार आहे, असेही माजी खा. शेट्टी यांनी सांगितले. या मोर्चात सर्व पक्ष, संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

मदतीची घोषणा नको, लेखी आदेश काढासांगली : पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीचा लेखी आदेश काढून त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. जोपर्यंत पूरग्रस्तांचे पुनर्वसन होणार नाही, तोपर्यंत विधानसभेच्या निवडणुका पुढे ढकलाव्यात, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खा. राजू शेट्टी यांनी बुधवारी सांगलीतील पत्रकार परिषदेत केली. या मागणीसाठीच दि. ३१ आॅगस्ट रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.ते पुढे म्हणाले, कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला आलेला महापूर हा निसर्ग आणि मानवनिर्मितही आहे. धरणांतून पाणी सोडताना कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांमध्ये कोणताही समन्वय नव्हता. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनाही अलमट्टीच्या अधिकाऱ्यांनी विसर्गाबाबत चुकीची माहिती देऊन फसवणूक केली आहे. म्हणूनच महापूर राष्ट्रीय आपत्ती घोषित करुन केंद्र सरकारने पूरग्रस्तांसाठी २५ हजार कोटींची मदत देण्याची गरज आहे. भविष्यात महापूर येऊच नयेत, यासाठी केंद्रीय जल आयोगाकडेच धरणातील विसर्गाची जबाबदारी सोपविण्यात यावी. तरच भविष्यातील महापूर टाळता येणार आहे.नुकसानीचाच विचार करायचे म्हटले, तर वारणा आणि कृष्णा नदीला आलेला महापूर दहा दिवस होता. ऊस, सोयाबीन, केळी, द्राक्ष, हळद आणि भाजीपाला पीक पाण्यात राहिल्यामुळे कुजले असून त्याचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे एकरी लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना शासन वीस हजाराची मदत करुन त्यांचे नुकसान भरुन येणार नाही. घराची पडझड झाली आहे. या शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी दोन हेक्टरपर्यंतची शंभर टक्के कर्जमाफी द्यावी, वीज बिल, पाणीपट्टी उपसा कर माफ करावा.बुडालेल्या विद्युत मोटारी, मीटर, ठिबक सिंचन संच, ग्रीन हाऊस, गोठा, पोल्ट्री, गुºहाळांचे मोठे नुकसान झाले असून शंभर टक्के भरपाई शासनाने दिली पाहिजे. मृत गाई, म्हशी, बैलांसाठी ५० हजार रुपये आणि मृत शेळी व मेंढी, वासरांना प्रत्येकी दहा हजार रुपये देण्याची गरज आहे. पूरबाधित पशुपालकांना १५ आॅक्टोबरपर्यंत चारा शासनाने उपलब्ध करुन दिला पाहिजे.

विहीर दुुरुस्तीसाठी ५० हजाराची मदत मिळाली पाहिजे. पुरात बुडालेल्या वाहनांना भरपाई देण्याचीही तरतूद शासनाने केली पाहिजे, आदी प्रमुख मागण्यांसाठी दि. ३१ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी ११ वाजता मोर्चा काढणार आहे, असेही माजी खा. शेट्टी यांनी सांगितले. या मोर्चात सर्व पक्ष, संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीSangli Floodसांगली पूर