शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

मदतीची घोषणा नको, लेखी आदेश काढा, निवडणुका पुढे ढकला : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 17:05 IST

पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीचा लेखी आदेश काढून त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. जोपर्यंत पूरग्रस्तांचे पुनर्वसन होणार नाही, तोपर्यंत विधानसभेच्या निवडणुका पुढे ढकलाव्यात, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खा. राजू शेट्टी यांनी सांगलीतील पत्रकार परिषदेत केली. या मागणीसाठीच दि. ३१ आॅगस्ट रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देमदतीची घोषणा नको, लेखी आदेश काढा : राजू शेट्टी निवडणुका पुढे ढकला : सांगलीतील पत्रकार परिषदेत मागणी

सांगली : पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीचा लेखी आदेश काढून त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. जोपर्यंत पूरग्रस्तांचे पुनर्वसन होणार नाही, तोपर्यंत विधानसभेच्या निवडणुका पुढे ढकलाव्यात, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खा. राजू शेट्टी यांनी सांगलीतील पत्रकार परिषदेत केली. या मागणीसाठीच दि. ३१ आॅगस्ट रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.ते पुढे म्हणाले, कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला आलेला महापूर हा निसर्ग आणि मानवनिर्मितही आहे. धरणांतून पाणी सोडताना कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांमध्ये कोणताही समन्वय नव्हता. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनाही अलमट्टीच्या अधिकाऱ्यांनी विसर्गाबाबत चुकीची माहिती देऊन फसवणूक केली आहे. म्हणूनच महापूर राष्ट्रीय आपत्ती घोषित करुन केंद्र सरकारने पूरग्रस्तांसाठी २५ हजार कोटींची मदत देण्याची गरज आहे. भविष्यात महापूर येऊच नयेत, यासाठी केंद्रीय जल आयोगाकडेच धरणातील विसर्गाची जबाबदारी सोपविण्यात यावी. तरच भविष्यातील महापूर टाळता येणार आहे.नुकसानीचाच विचार करायचे म्हटले, तर वारणा आणि कृष्णा नदीला आलेला महापूर दहा दिवस होता. ऊस, सोयाबीन, केळी, द्राक्ष, हळद आणि भाजीपाला पीक पाण्यात राहिल्यामुळे कुजले असून त्याचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे एकरी लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना शासन वीस हजाराची मदत करुन त्यांचे नुकसान भरुन येणार नाही. घराची पडझड झाली आहे. या शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी दोन हेक्टरपर्यंतची शंभर टक्के कर्जमाफी द्यावी, वीज बिल, पाणीपट्टी उपसा कर माफ करावा.बुडालेल्या विद्युत मोटारी, मीटर, ठिबक सिंचन संच, ग्रीन हाऊस, गोठा, पोल्ट्री, गुऱ्हाळांचे मोठे नुकसान झाले असून शंभर टक्के भरपाई शासनाने दिली पाहिजे. मृत गाई, म्हशी, बैलांसाठी ५० हजार रुपये आणि मृत शेळी व मेंढी, वासरांना प्रत्येकी दहा हजार रुपये देण्याची गरज आहे. पूरबाधित पशुपालकांना १५ आॅक्टोबरपर्यंत चारा शासनाने उपलब्ध करुन दिला पाहिजे. विहीर दुुरुस्तीसाठी ५० हजाराची मदत मिळाली पाहिजे.

पुरात बुडालेल्या वाहनांना भरपाई देण्याचीही तरतूद शासनाने केली पाहिजे, आदी प्रमुख मागण्यांसाठी दि. ३१ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी ११ वाजता मोर्चा काढणार आहे, असेही माजी खा. शेट्टी यांनी सांगितले. या मोर्चात सर्व पक्ष, संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

मदतीची घोषणा नको, लेखी आदेश काढासांगली : पूरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीचा लेखी आदेश काढून त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. जोपर्यंत पूरग्रस्तांचे पुनर्वसन होणार नाही, तोपर्यंत विधानसभेच्या निवडणुका पुढे ढकलाव्यात, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खा. राजू शेट्टी यांनी बुधवारी सांगलीतील पत्रकार परिषदेत केली. या मागणीसाठीच दि. ३१ आॅगस्ट रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.ते पुढे म्हणाले, कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला आलेला महापूर हा निसर्ग आणि मानवनिर्मितही आहे. धरणांतून पाणी सोडताना कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांमध्ये कोणताही समन्वय नव्हता. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनाही अलमट्टीच्या अधिकाऱ्यांनी विसर्गाबाबत चुकीची माहिती देऊन फसवणूक केली आहे. म्हणूनच महापूर राष्ट्रीय आपत्ती घोषित करुन केंद्र सरकारने पूरग्रस्तांसाठी २५ हजार कोटींची मदत देण्याची गरज आहे. भविष्यात महापूर येऊच नयेत, यासाठी केंद्रीय जल आयोगाकडेच धरणातील विसर्गाची जबाबदारी सोपविण्यात यावी. तरच भविष्यातील महापूर टाळता येणार आहे.नुकसानीचाच विचार करायचे म्हटले, तर वारणा आणि कृष्णा नदीला आलेला महापूर दहा दिवस होता. ऊस, सोयाबीन, केळी, द्राक्ष, हळद आणि भाजीपाला पीक पाण्यात राहिल्यामुळे कुजले असून त्याचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे एकरी लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना शासन वीस हजाराची मदत करुन त्यांचे नुकसान भरुन येणार नाही. घराची पडझड झाली आहे. या शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी दोन हेक्टरपर्यंतची शंभर टक्के कर्जमाफी द्यावी, वीज बिल, पाणीपट्टी उपसा कर माफ करावा.बुडालेल्या विद्युत मोटारी, मीटर, ठिबक सिंचन संच, ग्रीन हाऊस, गोठा, पोल्ट्री, गुºहाळांचे मोठे नुकसान झाले असून शंभर टक्के भरपाई शासनाने दिली पाहिजे. मृत गाई, म्हशी, बैलांसाठी ५० हजार रुपये आणि मृत शेळी व मेंढी, वासरांना प्रत्येकी दहा हजार रुपये देण्याची गरज आहे. पूरबाधित पशुपालकांना १५ आॅक्टोबरपर्यंत चारा शासनाने उपलब्ध करुन दिला पाहिजे.

विहीर दुुरुस्तीसाठी ५० हजाराची मदत मिळाली पाहिजे. पुरात बुडालेल्या वाहनांना भरपाई देण्याचीही तरतूद शासनाने केली पाहिजे, आदी प्रमुख मागण्यांसाठी दि. ३१ आॅगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी ११ वाजता मोर्चा काढणार आहे, असेही माजी खा. शेट्टी यांनी सांगितले. या मोर्चात सर्व पक्ष, संघटनांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीSangli Floodसांगली पूर