शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
5
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
6
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
9
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
10
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
11
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
12
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
13
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
14
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
15
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
16
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
17
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
18
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
19
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
20
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS

महाविद्यालयांकडून शिष्यवृत्ती वसूली नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 16:56 IST

२००९ ते २०१५ अखेर शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेले अनेक विद्यार्थी महाविद्यालयातून बाहेर पडले आहेत. अशास्थितीत विद्यार्थ्यांनी घेतलेल्या शिष्यवृत्तीच्या लाभाची रक्कम महाविद्यालयाकडून वसूल करण्याचा शासनाने काढलेला फतवा चुकीचा आहे. याला महाविद्यालय जबाबदार नाही. त्यामुळे ती रक्कम आमच्याकडून वसूल करु नये, अशी मागणी सांगली जिल्हा प्राचार्य असोसिएशनतर्फे समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांकडे केली आहे. 

ठळक मुद्देसांगली जिल्हा प्राचार्य असोसिएशनतर्फे समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांकडे मागणी रक्कम आमच्याकडून वसूल करु नये : आयुक्तांना निवेदन

सांगली,5  : २००९ ते २०१५ अखेर शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेले अनेक विद्यार्थी महाविद्यालयातून बाहेर पडले आहेत. अशास्थितीत विद्यार्थ्यांनी घेतलेल्या शिष्यवृत्तीच्या लाभाची रक्कम महाविद्यालयाकडून वसूल करण्याचा शासनाने काढलेला फतवा चुकीचा आहे. याला महाविद्यालय जबाबदार नाही. त्यामुळे ती रक्कम आमच्याकडून वसूल करु नये, अशी मागणी सांगली जिल्हा प्राचार्य असोसिएशनतर्फे समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांकडे केली आहे. 

शिष्यवृत्तीधारक मागासवर्गीय विद्यार्थी व समाज कल्याण विभाग यांच्यातील मध्यस्थी म्हणून महाविद्यालयांनी काम केले आहे. शिष्यवृत्तीची रक्कम वितरीत करण्याचे काम महाविद्यालयांनी केले आहे. अनेक विद्यार्थी अभ्यासक्रम पूर्ण करुन बाहेर पडले आहेत. आता त्यांनी घेतलेली शिष्यवृत्तीची रक्कम कशी वसूल करणार? नवीन शैक्षणिक धोरणानुसार काही अभ्यासक्रमांची शिष्यवृत्ती बंद केली आहे. हे अत्यंत चुकीचे आहे.

विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळ्य विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती सुरु ठेवावी. विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय थांबवावा. शिष्यवृत्ती वसूलीबाबत महाविद्यालयांना दिलेली पत्रे रद्द करावीत, अशी मागणी केली आहे.

यावेळी अध्यक्ष प्राचार्य डॉ. डी. जी. कसणे, उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र कुरळपकर, उज्वला पाटील, सचिव डॉ. एस. आर. पाटील, खजिनदार डॉ. बी. व्ही. ताम्हणकर उपस्थित होते.