शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

पाऊस येईपर्यंत गावांची वीज तोडू नका-: शिवाजीराव नाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 00:37 IST

शिराळा : पाऊस पडून पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होत नाही तोपर्यंत वीज वितरण कंपनीने कोणत्याही गावाच्या पिण्याच्या पाण्याचे वीज कनेक्शन ...

ठळक मुद्देशिराळा येथे ऊर्जामित्र बैठकीत महावितरण अधिकाऱ्यांना दिल्या सूचना

शिराळा : पाऊस पडून पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होत नाही तोपर्यंत वीज वितरण कंपनीने कोणत्याही गावाच्या पिण्याच्या पाण्याचे वीज कनेक्शन बंद करू नये, अशी सूचना आ. शिवाजीराव नाईक यांनी येथील तहसील कार्यालयात ऊर्जामित्र बैठकीत अधिकाऱ्यांना दिली.

आ. नाईक म्हणाले, सध्या तीव्र उन्हाळा आहे. त्यामुळे काही ठिकाणी पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाºयांनी क ोणत्याही परिस्थितीत गावाच्या पाण्याचे वीज कनेक्शन बंद करू नये. शासनाने सौरऊर्जेवर पाणी पंप वापरावेत असे सांगितले असले तरी, नदीकाठच्या शेतकºयांना याबाबत सक्ती करु नये. नदीकाठाला पावसाळ्यात नदीचे पाणी पात्राबाहेर येते. काहीवेळा पूरपरिस्थिती उद्भवते. त्यामुळे सौरऊर्जा युनिट बसविणे शेतकºयांना अडचणीचे व नुकसानकारक आहे. या बाबींची दखल घेऊन नदीकाठी शिथिलता द्यावी.

यावेळी कार्यकारी अभियंता रजनीकांत साखरे, उपअभियंता पी. एम. बुचडे, सुखदेव पाटील, रणजितसिंह नाईक, विजय पाटील, सागर पाटील, उपकार्यकारी अभियंता आर. बी. सूर्यवंशी, आर. बी. कसबे, ए. आर. कोरे, आर. एम. शेळके, पी. के. भिलवडे, अमर पाटील, आर. वाय. माने, धीरज वाघ, एम. एच. रसाळ, नगरसेवक बंडा डांगे, सौ. सीमा कदम उपस्थित होते.अडचणी सोडविल्या...वीज बिल, पाणी उपसा पंप, कनेक्शन व इतर महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक आणि इतर शेकडो वीज ग्राहकांच्या अडचणी या बैठकीत सोडविण्यात आल्या.शिराळा येथील ऊर्जामित्र बैठकीत आमदार शिवाजीराव नाईक यांनी वीज ग्राहकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांची सोडवणूक केली.

टॅग्स :Sangliसांगलीmahavitaranमहावितरण