शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
2
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
3
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
4
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
5
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
6
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
7
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
8
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
9
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
10
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
11
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
12
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
13
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
14
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
15
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
16
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
17
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
18
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
19
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात दुबार खरीप पेरणीचे संकट कायम

By admin | Updated: July 9, 2015 23:41 IST

दमदार पावसाची प्रतीक्षा : कवठेमहांकाळ, मिरज पूर्व भागात पिके कोमेजू लागली; शेतकरी चिंतेत

सोनी : मिरज तालुक्यातील सोनीसह परिसरातील पिके पावसाअभावी वाळू लागली असून, गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. दुबार पेरणीच्या संकटाबरोबरच हंगामही वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे. पेरणी केलेल्या पिकांना ज्या शेतकऱ्यांकडे पिकांना पाणी देण्याची सोय आहे, ते पाणी पाजत आहेत. पण सर्वसामान्य गरीब शेतकऱ्यांना मोठ्याप्रमाणात फटका बसत आहे. गावातील व्यवहारही मंदावले आहेत. सोनीसह परिसरातील भोसे, पाटगाव, करोली (एम) परिसरात जूनच्या मध्यंतरी दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी ९० टक्के पेरणी पूर्ण केली आहे. पेरणीच्या काळात पावसाने हजेरी लावल्याने गेल्या दोन वर्षांपासून खरीप हंगामापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांनी यावर्षी दमदार पिकाची आशा व्यक्त केली होती. पण पेरणीनंतर पावसाने पाठ फिरवली आहे. शेतातील पिके आता पाण्याअभावी करपू लागली आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे विहीर, कूपनलिका आहेत, ते पिके जगविण्याचा प्रयत्न करीत आहेत. पावसाच्या अभावामुळे गावातील व्यवहारावरही परिणाम झाला असून व्यवहार मंदावल्याचे व्यापारी सांगत आहेत. पावसाने दोन दिवसात हजेरी लावली तरच पिकांना जीवदान मिळण्याची आशा आहे. अन्यथा शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहणार आहे. देशिंग : कवठेमहांकाळ तालुक्यातील देशिंग परिसरासह बनेवाडी, मोरगाव, हरोली, अलकूड येथील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पेरण्या केल्या. पण पुन्हा पावसाने दडी मारल्याने जमिनीतून वर आलेले पिकांचे कोंब वाळू लागले आहेत.देशिंग परिसरात ७० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. परंतु वरुणराजाने सतत हुलकावणी देण्यास सुरुवात केल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. येथील शेतकऱ्यांनी ज्वारी, भुईमूग, सोयाबीन, विविध प्रकारची कडधान्ये आदी पिकांची पेरणी केली आहे. सध्या म्हैसाळ योजनेचे पाणीही बंद असल्याने पिकांना पाणी देण्याचा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. इथली बऱ्यापैकी शेती पावसावर अवलंबून आहे, तर देशिंग परिसरात द्राक्ष व ऊसशेती मोठ्या प्रमाणावर असल्याने, या शेतीला पाणी द्यायचे, की खरीप हंगामातील पिकांना पाणी द्यायचे, अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडले आहेत. त्यामुळे शेतकरी अजूनही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.येळापूर : जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या शिराळा तालुक्यात गेल्या १५ दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे हाता-तोंडाशी आलेली खरीप हंगामातील पिके वाया जाणार असल्याने शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त होत आहे. दोन दिवसात पावसाने सुरुवात केली नाही, तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येणार आहे.तालुक्यात खरीप हंगामातील जवळपास ९0 टक्के पेरण्या झाल्या असून या हंगामामध्ये धूळवाफेने पेरलेल्या भाताबरोबरच मका, भुईमूग, सोयाबीन, हायब्रीड आदी पिकांच्या पेरण्या करण्यात आल्या आहेत. तालुक्यातील बहुतांशी जमीन डोंगरउतारावर असून पाण्याचा निचरा मोठ्या प्रमाणात होतो. तसेच खडकाळ माळरानाची जमीन असल्यामुळे शेतात पाणी टिकून राहत नाही. त्यामुळे उंचावरील असणाऱ्या पिकांना पाणी कमी प्रमाणात मिळत असते. सध्या खरीप हंगामातील सर्व पिकांची चांगल्या पध्दतीने उगवण झाली आहे. मात्र पावसाने मोठी उघडीप दिल्याने पिके सुकू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा पेरणी करावी लागणार का? पुन्हा पेरणी केली, तर त्याची योग्य प्रमाणात उगवण होणार का? असाही प्रश्न आहे. पावसाच्या लहरीपणाचा चांगलाच फटका शेतकऱ्यांना बसला आहे. (वार्ताहर)कवठेमहांकाळ घाटमाथ्यावर चिंतेचे ढगघाटनांद्रे : कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटमाथ्यावरील कुची, जाखापूर, कुंडलापूर, गर्जेवाडी, वाघोली, तिसंगी व घाटनांद्रे या पट्ट्यामध्ये अद्याप एकही दमदार पाऊस झालेला नाही. मृग नक्षत्राच्या अखेरीस झालेल्या पावसाच्या किरकोळ सरीवर बळीराजाने मोठ्या धाडसाने पेरण्या केल्या. पण त्यानंतर गेले आठ दिवस झाले, पावसाने पाठ फिरविल्याने बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली आहे. पेरण्या झालेल्या व उगवून आलेल्या रोपांना आता खरी पावसाची गरज आहे. गेले आठ दिवस पावसाने पाठ फिरवली आहे. कडक ऊन्हामुळे उगवून आलेल्या कोंबांवर परिणाम होत आहे. रांजणीत शेतकरी हवालदिलकवठेमहांकाळ तालुक्यातील रांजणी, अग्रण धुळगाव, लोणारवाडी, पिंपळवाडी, अलकूड एस., कोकळे भागातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. जूनमध्ये मान्सून सक्रिय झाल्यावर या भागातील शेतकऱ्यांना खरिपाच्या मोठ्या आशा निर्माण झाल्या होत्या. काही शेतकऱ्यांनी बाजरी, तूर, मटकी, मका अशी पेरणी केली. पण मोठ्या पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.