शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा ७७.३ टक्के जादा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 23:47 IST

सांगली : जिल्ह्यात मान्सूनची हजेरी उशिरा लागली असली तरी, दि. ७ सप्टेंबर २०१८ च्या तुलनेत ७ सप्टेंबर २०१९ मध्ये ...

सांगली : जिल्ह्यात मान्सूनची हजेरी उशिरा लागली असली तरी, दि. ७ सप्टेंबर २०१८ च्या तुलनेत ७ सप्टेंबर २०१९ मध्ये ७७.३ टक्के जादा पाऊस झाला आहे. वाळवा, कवठेमहांकाळ, पलूस, आटपाडी, तासगाव तालुक्यात तर दुपटीने पाऊस झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.सप्टेंबर २०१८ मध्ये जिल्ह्यात सरासरी ३२९.८ मिलिमीटर पाऊस झाला. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्यात दोनशे मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे तिथे तीन लाख नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची प्रतीक्षा करावी लागत होती; तर पशुधनासाठी शासनाला चारा छावण्या सुरू केल्या होत्या. यावर्षी म्हणजे २०१९ मध्ये गतवर्षीपेक्षा आणखी बिकट परिस्थिती निर्माण होईल, असेच जिल्ह्यात चित्र होते. जुलैअखेरपर्यंत जिल्ह्यात मान्सून दाखल झाला नव्हता. यामुळे शेतकऱ्यांसह जिल्हा प्रशासनही चिंतेत होते. तोपर्यंत दि. २४ जुलैपासून राज्यभर संततधार पावसाने हजेरी लावली. आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात महापुरामुळे सर्वत्र हाहाकार झाला होता. दि. ७ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात सरासरी ५७८.४ मिलिमीटर पाऊस झाला असून, गतवर्षीच्या तुलनेत २४८.६ मिलिमीटर जादा पाऊस झाला. टक्केवारीचा विचार केल्यास, ७७.३ टक्के जादा पाऊस झाला आहे.दुष्काळी भागात जोराचा नसला तरी, रिमझिम पावसाने हजेरी लावल्यामुळे खरिपाची पिके शेतकºयांच्या कशी तरी पदरात पडतील, अशीच परिस्थिती आहे. मिरज तालुक्यात ५९.७ टक्के, जत ४८ टक्के, खानापूर ४१.९ टक्के, वाळवा १०८.१, तासगाव १००.६, शिराळा ४१.६, आटपाडी १११.७, कवठेमहांकाळ ८५.४, पलूस ९० आणि कडेगाव तालुक्यात ८९.५ टक्के जादा पाऊस यावर्षी जादा झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.जिल्ह्यातील पाऊस (मिलिमीटर)तालुका २०१९ २०१८मिरज ५११.२ ३२४.७जत २६४.५ १४४.६खानापूर ३०१.४ २६२.६वाळवा ७५८.४ ३३६.७तासगाव ४४६.७ १४९.८शिराळा १४४३ ११५४.६आटपाडी २४१.१ ५३.७कवठेमहांकाळ ३६७.१ १६२.४पलूस ५०९.२ २४२कडेगाव ५५५.६ ३१४.६एकूण ५७८.४ ३२९.८