शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा ७७.३ टक्के जादा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 23:47 IST

सांगली : जिल्ह्यात मान्सूनची हजेरी उशिरा लागली असली तरी, दि. ७ सप्टेंबर २०१८ च्या तुलनेत ७ सप्टेंबर २०१९ मध्ये ...

सांगली : जिल्ह्यात मान्सूनची हजेरी उशिरा लागली असली तरी, दि. ७ सप्टेंबर २०१८ च्या तुलनेत ७ सप्टेंबर २०१९ मध्ये ७७.३ टक्के जादा पाऊस झाला आहे. वाळवा, कवठेमहांकाळ, पलूस, आटपाडी, तासगाव तालुक्यात तर दुपटीने पाऊस झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.सप्टेंबर २०१८ मध्ये जिल्ह्यात सरासरी ३२९.८ मिलिमीटर पाऊस झाला. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्यात दोनशे मिलिमीटरपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे तिथे तीन लाख नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची प्रतीक्षा करावी लागत होती; तर पशुधनासाठी शासनाला चारा छावण्या सुरू केल्या होत्या. यावर्षी म्हणजे २०१९ मध्ये गतवर्षीपेक्षा आणखी बिकट परिस्थिती निर्माण होईल, असेच जिल्ह्यात चित्र होते. जुलैअखेरपर्यंत जिल्ह्यात मान्सून दाखल झाला नव्हता. यामुळे शेतकऱ्यांसह जिल्हा प्रशासनही चिंतेत होते. तोपर्यंत दि. २४ जुलैपासून राज्यभर संततधार पावसाने हजेरी लावली. आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात महापुरामुळे सर्वत्र हाहाकार झाला होता. दि. ७ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात सरासरी ५७८.४ मिलिमीटर पाऊस झाला असून, गतवर्षीच्या तुलनेत २४८.६ मिलिमीटर जादा पाऊस झाला. टक्केवारीचा विचार केल्यास, ७७.३ टक्के जादा पाऊस झाला आहे.दुष्काळी भागात जोराचा नसला तरी, रिमझिम पावसाने हजेरी लावल्यामुळे खरिपाची पिके शेतकºयांच्या कशी तरी पदरात पडतील, अशीच परिस्थिती आहे. मिरज तालुक्यात ५९.७ टक्के, जत ४८ टक्के, खानापूर ४१.९ टक्के, वाळवा १०८.१, तासगाव १००.६, शिराळा ४१.६, आटपाडी १११.७, कवठेमहांकाळ ८५.४, पलूस ९० आणि कडेगाव तालुक्यात ८९.५ टक्के जादा पाऊस यावर्षी जादा झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.जिल्ह्यातील पाऊस (मिलिमीटर)तालुका २०१९ २०१८मिरज ५११.२ ३२४.७जत २६४.५ १४४.६खानापूर ३०१.४ २६२.६वाळवा ७५८.४ ३३६.७तासगाव ४४६.७ १४९.८शिराळा १४४३ ११५४.६आटपाडी २४१.१ ५३.७कवठेमहांकाळ ३६७.१ १६२.४पलूस ५०९.२ २४२कडेगाव ५५५.६ ३१४.६एकूण ५७८.४ ३२९.८