शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

जिल्हा पोलीस दल आधुनिक करण्यास प्राधान्य देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : पोलिसांनी केवळ कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठीच काम केले नसून कोरोना कालावधीत समाजावरही नियंत्रण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : पोलिसांनी केवळ कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठीच काम केले नसून कोरोना कालावधीत समाजावरही नियंत्रण ठेवले आहे. जनतेच्या सुरक्षेप्रती काम करणाऱ्या पोलिसांना साधनसुविधांचीही आवश्यक असते. ती पूर्ण करण्यासाठी व जिल्हा पोलीस दल अधिक आधुनिक करण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री जयंत पाटील यांनी शनिवारी सांगलीत केले.

जिल्हा नियोजन समिती निधीतून पोलीस दलास मिळालेल्या २५ चारचाकी व ५० दुचाकी वाहनांच्या लोकार्पण कार्यक्रमात पालकमंत्री पाटील बोलत हाेते. यावेळी कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री पाटील म्हणाले, कोरोनाचा संसर्ग वाढला असताना, लॉकडाऊनमध्ये लोकांनी घराबाहेर पडू नये यासाठीही पोलिसांनी काम केले. आवश्यकता असते त्यावेळी सामाजिक गरज ओळखून पोलीस काम करीत असतात. त्यामुळेच त्यांच्या गरजा पूर्ण करणे आवश्यक आहे. सुरक्षेच्या दृष्टीने शहरासह जिल्ह्यात सीसीटीव्ही यंत्रणेचे जाळे महत्त्वाचे आहे. आता शहरातील कोपरा न कोपरा सीसीटीव्हीच्या नजरेत येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी आवश्यक तो निधी दिला जाईल.

विश्वजित कदम म्हणाले, पोलीस दलास आवश्यक त्या साधनांचा पुरवठा केला तर अधिक चांगल्याप्रकारे काम होईल. त्यामुळेच जिल्हा नियोजनच्या निधीतून पाेलीस दलासाठी तरतूद करण्यात आली आहे. पोलीस दलाचे मनोबल उंचाविण्यासाठी अजूनही काही उपक्रम राबविण्यास प्राधान्य देण्यात येईल.

पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी प्रास्ताविकात कामकाजाचा आढावा घेत, मिळालेल्या साधनांमुळे पोलीस दलाच्या कामकाजातील गतिमानता वाढणार असल्याचे सांगितले. अप्पर अधीक्षक मनीषा दुबुले यांनी आभार मानले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्राजक्ता कोरे, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आमदार सुरेश खाडे, अनिल बाबर, सुमनताई पाटील, अरुण लाड, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, आदी उपस्थित होते.

चाैकट -

दीक्षित गेडाम यांच्या कामाचे कौतुक

पालकमंत्री पाटील म्हणाले, अधीक्षक म्हणून गेडाम यांनी सूत्रे स्वीकारल्यापासून अनेक चांगले उपक्रम होत आहेत. चांगले अधिकारी म्हणून त्यांची ओळख असल्यानेच त्यांना मुख्यमंत्र्यांनी सांगलीत संधी दिली आहे. त्यांनी पोलिसांच्या पाल्यांसाठी प्लेसमेंट शिबिर घेतले हे कौतुकास्पद असून, तीस वर्षांत पहिल्यांदाच अधीक्षकांनी असा उपक्रम राबविला आहे.

चौकट

पोलीस कर्मचाऱ्यांसाठी ‘भारती’तर्फे मोफत शिबिर

कृषी राज्यमंत्री डॉ. कदम म्हणाले, पाेलीस कर्मचारी नेहमीच कर्तव्यावर असल्याने त्यांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे भारती रुग्णालयातर्फे पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिर आयोजित करणार आहे.