शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

जिल्हाधिकाऱ्यांकडून राजकारण्यांचा ‘क्लास’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 22:57 IST

लोकसभा निवडणुकीची अधिसूचना गुरुवार दि. २८ मार्चला जारी होणार असून, तेव्हापासून ४ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. या पार्श्वभूमीवर उमेदवारी

ठळक मुद्दे सांगलीत बैठक : लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याविषयी केले मार्गदर्शन

सांगली : लोकसभा निवडणुकीची अधिसूचना गुरुवार दि. २८ मार्चला जारी होणार असून, तेव्हापासून ४ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्जाची माहिती व्हावी व त्यातील सर्व माहिती भरण्याविषयीच्या शंकांचे निरसन करण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.

उमेदवारी अर्जातील प्रत्येक घटकाबाबत माहिती देत, उमेदवारांनी द्यावयाच्या माहितीबाबतही त्यांनी सूचना दिल्या.उमेदवारी अर्ज भरताना आवश्यक प्रतिज्ञापत्रे, शपथपत्रे, अनामत रक्कम भरल्याबाबतची पावती, मतदार यादीतील माहिती द्यावी लागणार आहे. यातील एकही माहिती अपूर्ण भरल्यास अर्ज बाद होऊ शकतो. त्यामुळे उमेदवारांनी याची काळजी घेत, सर्व माहिती भरण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

२८ मार्चपासून ४ एप्रिलपर्यंत सकाळी ११ ते ३ पर्यंतच अर्ज दाखल करून घेतले जाणार आहेत. रविवारी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. उमेदवारी अर्ज दाखल करताना स्वत: उमेदवार अथवा सूचक उपस्थित राहणे आवश्यक आहे. ज्या राजकीय पक्षांकडून उमेदवारी दाखल केली जाणार आहे, त्याचे नाव, चिन्ह व महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक उमेदवाराने आपले नाव न चुकता लिहावे, याबाबत सूचना देण्यात आल्या.

उमेदवारांनी अर्ज दाखल करण्याच्या आदल्या दिवशी बॅँकेत खाते उघडणे आवश्यक असून, त्या दिवसापासून निकाल लागेपर्यंत या खात्यावरील व्यवहाराची माहिती प्रशासनाला सादर करावी. एखाद्या उमेदवारावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे असतील, तर त्याने ती माहिती न लपविता द्यावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी केले.कार्यालयासमोर गर्दी नकोजिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी म्हणाले, उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवारांनी व त्यांच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील १०० मीटर परिसरात वाहनांची गर्दी करू नये. अर्ज दाखल करताना केवळ पाचच व्यक्तींना परवानगी देण्यात येणार आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीPoliticsराजकारणElectionनिवडणूक