शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

चौकशीसत्राने जिल्हा बॅँक हैराण...

By admin | Updated: January 9, 2017 00:27 IST

एकही आक्षेप नाही : रिझर्व्ह बॅँक, नाबार्डच्या धोरणांबद्दल संशयकल्लोळ

सांगली : नाबार्ड, आयकर, फायनान्स इन्टेलिजन्स युनिट, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) अशा अनेक संस्थांमार्फत सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत चौकशीचे सत्र सुरू झाल्याने, बँक प्रशासन हैराण झाले आहे. एकाही तपासणीत काही आढळल्याचे या शासकीय यंत्रणांनी स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे रिझर्व्ह बँक आणि नाबार्डने, जिल्हा बँकेबाबत स्वीकारलेल्या धोरणाबद्दल संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. केंद्र शासनाकडून जिल्हा बँकांकडे राजकीय चष्म्यातून पाहिले जात असल्याची टीका अनेक नेत्यांनी यापूर्वी केली आहे. तपासण्यांचे एकापाठोपाठ एक पथक जिल्हा बँकेत दाखल होऊ लागल्याने, या टीकेला बळ मिळू लागले आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर सुरुवातीला जिल्हा बँकांना अन्य बँकांपेक्षा वेगळा नियम लागू करण्यात आला. या बँकांना जुन्या नोटा स्वीकारण्यास बंदी घातली. त्यानंतर नव्या नोटा उपलब्ध करून देण्यावरही निर्बंध आणले. ज्या बँकांची खाती जिल्हा बँकेत आहेत, अशा अनेक बँकांना सर्व व्यवहारांबद्दल मुभा दिल्याने, रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात आले. ग्रामीण अर्थव्यवस्था सर्वस्वी जिल्हा बँकेवर अवलंबून असतानाही जिल्हा बँकेस नव्या चलनाचा पुरवठा केलेला नाही. जिल्हा बँकेचे आर्थिक खच्चीकरण केले जात असतानाच, नाबार्डने नोटाबंदीनंतरच्या सर्व व्यवहारांची माहिती मागविली. केवायसी पूर्ततेबद्दलही माहिती मागविली. नाबार्डमार्फत व्यवहारांची तपासणी सुरू असतानाच अचानक आयकरने छापा टाकला. त्यांनी दोन दिवस चौकशी केली. या चौकशीत नेमके काय आढळले, याची कोणतीही माहिती त्यांनी जाहीर केली नाही. बँकेलाही कोणत्या सूचना आयकर विभागाकडून मिळालेल्या नाहीत. त्यामुळे बँकेने सुटकेचा सुस्कारा सोडला. त्यानंतर लगेचच फायनान्स इन्टेलिजन्स युनिट (वित्तीय आसूचना विभाग) ने ज्या खात्यात १ लाखावर रक्कम जमा असेल, अशा खातेदारांची यादी मागविली. त्यानंतर लगेचच अंमलबजावणी संचालनालयाने पुन्हा करन्सी चेस्टकडे जमा केलेल्या ५२ कोटी रुपयांच्या स्रोताची तपासणी केली. चौकशांचे हे सत्र अजूनही सुरूच आहे. यातील एकाही चौकशीत जिल्हा बँकेवर एकाही यंत्रणेने आक्षेप नोंदविलेले नाहीत. तरीही चलन पुरवठ्याबद्दल अजूनही रिझर्व्ह बँकेचा हात आखडताच आहे. त्यामुळे आता रिझर्व्ह बँक आणि नाबार्डच्या चष्म्याबद्दल संशयाचे वातावरण तयार झाले आहे. (प्रतिनिधी)तपासणीचा फार्स : चलनाचा गोंधळतपासणीचे सत्र चालू ठेवताना किमान नवे चलन उपलब्ध करून दिले असते, तर ग्रामीण भागातील जनतेला मोठा दिलासा मिळाला असता. रिझर्व्ह बँक, नाबार्डकडून असे कोणतेही प्रयत्न सध्या दिसत नाहीत. नोटाबंदीच्या निर्णयास असलेली मुदत संपल्यानंतरही चलनाचा गोंधळ कायम ठेवण्यात आला आहे. पुन्हा तपासणीकेवायसी प्रक्रिया पूर्ण करणारी बँक म्हणून यापूर्वीच रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकेला प्रमाणपत्र दिले आहे. तरीही केवायसीबद्दल पुन्हा कागदपत्रे तपासली जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.