शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

 पूरग्रस्त भागातील पशुधनासाठी पशुखाद्य व चारा वितरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 14:10 IST

सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील पशुधनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त होणारे पशुखाद्य व चारा पूरबाधित तालुक्यातील पशुपालकांना वितरीत करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. ​​​​​​​

सांगली : सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील पशुधनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त होणारे पशुखाद्य व चारा पूरबाधित तालुक्यातील पशुपालकांना वितरीत करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.वारणा सहकारी दूध उत्पादक संघाकडून हायग्रेन प्यालेट ५० नग, महाड मॅन्यूफॅक्चर असोसीएशनकडून ५० किलोच्या २०० पशुखाद्य पिशव्या, सुमित ट्रेडर्स मुंबई जनरल मॅनेजर, देवनार गोवंडी यांच्याकडून 360 ब्लिचिंग पावडर पिशव्या, उत्तम कोळेकर भिवंडी मंबई यांच्याकडून ६० ब्लिचिंग पावडर पिशव्या, पशुधन विकास विभाग रत्नागिरी विभाग रत्नागिरी यांच्याकडून प्राप्त पशुखाद्य, बारामती ॲग्रो लिमिटेड यांच्याकडून १० टन पशुखाद्य, पालघर एमएमए संस्था महाड यांच्याकडून ६१० पोती मीठ, व्यवस्थापक आयआरबी रायगड यांच्याकडून ५ टन हिरवा चारा पूरग्रस्त भागात वितरीत करण्यात आले आहे.

मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाकडून २५० पिशव्या पशुखाद्य, जिल्हा प्रशासन रायगड व पशुधन विकास अधिकारी माणगाव कर्मचारी संघटना यांच्याकडून ३ टन ओला चारा, ७ टन सुखा चारा, कडबा कुट्टी २५ किलो, भाताचा कोंडा २५ किलो आणि नेचर डेअरी कळस इंदापूर यांच्याकडून ८ हजार ३७० किलो ऊस व जयहिंद गोळी पेंड १०० पिशव्या, रायगड जिल्ह्यातून ६ टन चारा प्राप्त झाला आहे. पशुधनासाठी प्राप्त चारा व खाद्य पूरग्रस्त भागात वितरीत करण्यात आले आहे. 

पूरग्रस्त बाधित कुटुंबांना 13 कोटी 92 लाखाचे सानुग्रह वाटपसांगली  जिल्ह्यात पुरामूळे बाधित झालेल्या कुटूंबांना रूपये ५ हजार प्रमाणे सानुग्रह अनुदान वितरीत करण्यात येत आहे. दिनांक १७ ऑगस्ट अखेर ग्रामीण भागातील १९ हजार १३९ आणि शहरी भागातील ८ हजार ७०१ कुटूंबांना १३ कोटी ९२ लाखाचे सानुग्रह अनुदान पूरग्रस्त कुटूंबांना वितरीत करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.पूरग्रस्त कुटुंबांना ग्रामीण भागात १० हजार आणि शहरी भागात १५ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येत आहे. त्यापैकी ५ हजार रुपयांचा रोख वाटप करण्यात येत आहे. उर्वरित कुटुंबांनाही अनुदान वाटप सुरु आहे.जिल्ह्यात पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना २०० टीममार्फत सानुग्रह अनुदानाचे वितरण करण्यात येत आहे. सानुग्रह वितरणाच्या मदतीसाठी सोलापूर जिल्ह्यातून महसूलचे ५२ कर्मचारी उपलब्ध झाले असून यामध्ये ४७ तलाठी आणि ५ सर्कल कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अधिकचे मनुष्यबळ उपलब्ध झाल्याने सानुग्रह अनुदान वितरण करण्यास मदत होणार आहे, असे अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी सांगितले.मिरज तालुक्यातील पूरबाधितांना वाटपासाठी ११४० किट रवानापूरग्रस्तांना अनेक सेवाभावी, स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती यांच्याकडून प्राप्त होणारी मदतीचे जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे किट तयार केले जात आहे. आम्ही पंचवटीकर साई निर्माण संस्था महाड आणि जितो (जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायजेशन) यांच्याकडून प्राप्त झालेल्या मदतीतून जीवनावश्यक वस्तूचे तयार केलेले ११४० किट मिरज तालुक्यातील पूरबाधित कुटूंबांना वाटप करण्यासाठी रवाना झाले. 

टॅग्स :Sangli Floodसांगली पूरcollectorजिल्हाधिकारी