शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

महापालिका बरखास्तच करा

By admin | Updated: June 24, 2015 00:46 IST

शरद पाटील : हद्दवाढीस जनता दलाचा विरोध; कुपवाडचा विकास ठप्पच

सांगली : महापालिका स्थापन होऊन १७ वर्षांचा कालावधी लोटला तरी, अद्याप कुपवाड, वानलेसवाडीचा कोणताही विकास होऊ शकलेला नाही. त्यामुळे नव्या गावांचा समावेश करून हद्दवाढ करण्यास आमचा विरोध आहे. याउलट ही महापालिकाच बरखास्त करावी, अशी मागणी आम्ही राज्य शासनाकडे करणार आहोत, अशी माहिती जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. शरद पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले की, महापालिकेच्या बहुसंख्य वस्त्या अजूनही अविकसित आहेत. कुपवाड व वानलेसवाडी या दोन्ही गावांतील रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. अनेक रस्ते अद्याप खराब आहेत. सांडपाणी निचऱ्याची व्यवस्था नाही. पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर आहे. याठिकाणच्या शाळा अजूनही जिल्हा परिषदेमार्फत चालविल्या जातात. कुपवाड येथील महापालिकेचे विभागीय कार्यालय गेली पाच वर्षे अपूर्ण अवस्थेत आहे. अशा परिस्थितीत माधवनगर, धामणी, अंकली, हरिपूर या गावांचा समावेश महापालिका हद्दीत करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यामागचा उद्देश कळालेला नाही. सध्याच्या महापालिका क्षेत्रातच सुविधा न देऊ शकणाऱ्या या संस्थेने अन्य गावांच्या समावेशाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवू नये. संबंधित गावांच्या संमतीशिवाय महापालिकेने याबाबत कोणतेही पाऊल उचलू नये. महाआघाडीच्या कारभारावर लोकांनी नाराजी व्यक्त करीत पुन्हा काँग्रेसवर विश्वास व्यक्त केला. त्यांच्याकडून अपेक्षाभंग झालेला आहे. त्यामुळे ही पालिकाच बरखास्त करावी, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहोत. त्यासाठी चळवळही उभारण्यात येईल. (प्रतिनिधी)कर्नाटकसारखी भूमिका हवीमहाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील ४२ गावांच्या प्रश्नाबाबत शरद पाटील म्हणाले की, कर्नाटकातील सीमाभागातील काही गावांनी ज्यावेळी पाणी व अन्य सुविधांसाठी महाराष्ट्रात येण्याचा इशारा दिला होता, त्यावेळी कर्नाटक सरकारने तातडीने अडीचशे कोटी रुपये मंजूर करून या गावांतील सर्व प्रश्न सोडविले होते. ही गावे आता सुविधांबाबत सक्षम आहेत. महाराष्ट्र सरकारनेही या गावांची भावना समजून घेऊन तातडीने त्यांच्यासाठी निधीची तरतूद करून सुविधा पुरविल्या पाहिजेत. या गावांतील लोकांशी आम्ही प्रत्यक्ष भेटून संवाद साधणार आहोत. त्यांच्यासाठी शासनाकडे आम्ही पाठपुरावा करू. शेतकऱ्यांच्या पेन्शनप्रश्नी जनता दलाच्यावतीने २८ जुलै रोजी मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.