शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पाटबंधारे महामंडळे बरखास्त करून नदी खोरे प्राधिकरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:27 IST

सांगलीत जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांनी पश्चिम महाराष्ट्रातील महापुराविषयी विवेचन केले. लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : पाटबंधारे महामंडळे बरखास्त करून ...

सांगलीत जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांनी पश्चिम महाराष्ट्रातील महापुराविषयी विवेचन केले.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : पाटबंधारे महामंडळे बरखास्त करून नदी खोरे प्राधिकरण स्थापन करावे, असे प्रतिपादन जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांनी केले. पूल आणि रस्त्यांमुळे नद्यांचे गळे आवळलेत, असे ते म्हणाले.

सहकार भारती, सांगली अर्बन बॅंक आणि विद्यार्थी विकास प्रतिष्ठानतर्फे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. सांगली, सातारा व कोल्हापुरातील महापुराची कारणे व निराकरण या विषयावर त्यांनी भूमिका मांडली.

ते म्हणाले, महामंडळे बरखास्तीची शिफारस चितळे समितीनेच केली आहे. महापुरासाठी अतिवृष्टी कारण असले तरी शास्त्रशुद्ध अभ्यासासाठी शासनाकडे जलतज्ज्ञच नाहीत. त्यासाठी लोकचळवळींद्वारे दबाव आणायला हवा. हवामान विभागाकडील अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्याची पाटबंधारेची तयारी नाही. स्वतंत्र पूरनीती, पूर व्यवस्थापन कायदा यांची महाराष्ट्राला गरज आहे. पाटबंधारे म्हणजे शासन व जलसंपदाची मक्तेदारी बनलीय, त्यामध्ये चांगल्या विचारांचे लोक यायला हवेत. पूर नियंत्रण अशक्य आहे, पुराचे व्यवस्थापन करायला हवे. आजवरचा पाऊस, पूर व त्यावेळचे धरण साठे यांच्या अभ्यासातून धरणातील साठे ठरवावे लागतील.

पुरंदरे म्हणाले, आयर्विन पूल व राजापूर बंधाऱ्यातील पाण्याच्या प्रवाहाची आकडेवारी आपण स्वीकारतो, पण तेथे मोजणी केंद्रेच नाहीत. १० हजार किलोमीटरवरून सांगलीतील क्युसेक ठरविणाऱ्या संस्थेचे आकडे आपण स्वीकारतो. ते कितपत व्यवहार्य असतील? सांगली, कोल्हापुरातील महापुराचा

अलमट्टीशी संबंध नसल्यास चांगलीच बाब आहे, मग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री अलमट्टीतून पाणी सोडण्यासाठी कर्नाटकला विनंती का करतात? असा प्रश्न आहे. त्यातून विनाकारण गैरसमज, गोंधळ निर्माण होतात. फक्त आकडेवारीवर न विसंबता संपूर्ण नदीखोऱ्याचा उपग्रहाद्वारे अभ्यास व्हावा.

यावेळी बॅंकेचे उपाध्यक्ष एच. वाय. पाटील, संचालक संजय परमणे, श्रीकांत पटवर्धन, नीता केळकर, विद्या पुरंदरे, निवृत्त अभियंता कुमार तिप्पन्नावर, एस. जे. पाटील, रवींद्र खिलारे, उत्कर्षा लाडे आदी उपस्थित होते.

चौकट

नदीकाठची अतिक्रमणे जलसंपदाचीच जबाबदारी

पुरंदरे म्हणाले, जलसंपदा विभाग पूररेषा ठरवतो, पण अतिक्रमणे हटविण्याची जबाबदारी महापालिका किंवा महसूलवर ढकलतो. कायद्यानुसार ही जबाबदारी जलसंपदाचीच आहे. सांगलीत वेंकटेशनगर, कलानगर, संजयनगर, रामनगर, इंदिरानगर, कृष्णामाईनगर येथे अतिक्रमणे झाल्याचे अभ्यासात आढळले आहे.

चौकट

पुरंदरे म्हणतात...

- महाराष्ट्रात सात टक्के पूरप्रवण क्षेत्र.

- शहरी पूर ही नवी संकल्पना रुढ होतेय.

- अतिक्रमणांमुळे शहरी पूर.

- हवामान बदल गृहित धरून काम हवे.

- पावसाची तीव्रता व कालावधी वाढतोय.

- हवामान विभागाच्या कामात धरणनिहाय अचूकता हवी.

- नद्यांच्या वहन क्षमतेचा विचार नाही, निळ्या, लाल रेषांचे पालनही नाही.

- कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेला लवादाने परवानगी नाकारली आहे.

- नदीजोड प्रकल्पाने पूरनियंत्रण अशक्य.

- जायकवडी, उजनी धरणातील गाळ उपसा अव्यवहार्य.

- नद्यांचे मूळ पात्र अस्तित्वात येईपर्यंत गाळ काढायला हवा.

- पावसाळ्यापूर्वी धरणांमध्ये पूरनियंत्रणासाठी जागा ठेवायला हवी.