शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पाटबंधारे महामंडळे बरखास्त करून नदी खोरे प्राधिकरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:27 IST

सांगलीत जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांनी पश्चिम महाराष्ट्रातील महापुराविषयी विवेचन केले. लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : पाटबंधारे महामंडळे बरखास्त करून ...

सांगलीत जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांनी पश्चिम महाराष्ट्रातील महापुराविषयी विवेचन केले.

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : पाटबंधारे महामंडळे बरखास्त करून नदी खोरे प्राधिकरण स्थापन करावे, असे प्रतिपादन जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांनी केले. पूल आणि रस्त्यांमुळे नद्यांचे गळे आवळलेत, असे ते म्हणाले.

सहकार भारती, सांगली अर्बन बॅंक आणि विद्यार्थी विकास प्रतिष्ठानतर्फे आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. सांगली, सातारा व कोल्हापुरातील महापुराची कारणे व निराकरण या विषयावर त्यांनी भूमिका मांडली.

ते म्हणाले, महामंडळे बरखास्तीची शिफारस चितळे समितीनेच केली आहे. महापुरासाठी अतिवृष्टी कारण असले तरी शास्त्रशुद्ध अभ्यासासाठी शासनाकडे जलतज्ज्ञच नाहीत. त्यासाठी लोकचळवळींद्वारे दबाव आणायला हवा. हवामान विभागाकडील अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्याची पाटबंधारेची तयारी नाही. स्वतंत्र पूरनीती, पूर व्यवस्थापन कायदा यांची महाराष्ट्राला गरज आहे. पाटबंधारे म्हणजे शासन व जलसंपदाची मक्तेदारी बनलीय, त्यामध्ये चांगल्या विचारांचे लोक यायला हवेत. पूर नियंत्रण अशक्य आहे, पुराचे व्यवस्थापन करायला हवे. आजवरचा पाऊस, पूर व त्यावेळचे धरण साठे यांच्या अभ्यासातून धरणातील साठे ठरवावे लागतील.

पुरंदरे म्हणाले, आयर्विन पूल व राजापूर बंधाऱ्यातील पाण्याच्या प्रवाहाची आकडेवारी आपण स्वीकारतो, पण तेथे मोजणी केंद्रेच नाहीत. १० हजार किलोमीटरवरून सांगलीतील क्युसेक ठरविणाऱ्या संस्थेचे आकडे आपण स्वीकारतो. ते कितपत व्यवहार्य असतील? सांगली, कोल्हापुरातील महापुराचा

अलमट्टीशी संबंध नसल्यास चांगलीच बाब आहे, मग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री अलमट्टीतून पाणी सोडण्यासाठी कर्नाटकला विनंती का करतात? असा प्रश्न आहे. त्यातून विनाकारण गैरसमज, गोंधळ निर्माण होतात. फक्त आकडेवारीवर न विसंबता संपूर्ण नदीखोऱ्याचा उपग्रहाद्वारे अभ्यास व्हावा.

यावेळी बॅंकेचे उपाध्यक्ष एच. वाय. पाटील, संचालक संजय परमणे, श्रीकांत पटवर्धन, नीता केळकर, विद्या पुरंदरे, निवृत्त अभियंता कुमार तिप्पन्नावर, एस. जे. पाटील, रवींद्र खिलारे, उत्कर्षा लाडे आदी उपस्थित होते.

चौकट

नदीकाठची अतिक्रमणे जलसंपदाचीच जबाबदारी

पुरंदरे म्हणाले, जलसंपदा विभाग पूररेषा ठरवतो, पण अतिक्रमणे हटविण्याची जबाबदारी महापालिका किंवा महसूलवर ढकलतो. कायद्यानुसार ही जबाबदारी जलसंपदाचीच आहे. सांगलीत वेंकटेशनगर, कलानगर, संजयनगर, रामनगर, इंदिरानगर, कृष्णामाईनगर येथे अतिक्रमणे झाल्याचे अभ्यासात आढळले आहे.

चौकट

पुरंदरे म्हणतात...

- महाराष्ट्रात सात टक्के पूरप्रवण क्षेत्र.

- शहरी पूर ही नवी संकल्पना रुढ होतेय.

- अतिक्रमणांमुळे शहरी पूर.

- हवामान बदल गृहित धरून काम हवे.

- पावसाची तीव्रता व कालावधी वाढतोय.

- हवामान विभागाच्या कामात धरणनिहाय अचूकता हवी.

- नद्यांच्या वहन क्षमतेचा विचार नाही, निळ्या, लाल रेषांचे पालनही नाही.

- कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेला लवादाने परवानगी नाकारली आहे.

- नदीजोड प्रकल्पाने पूरनियंत्रण अशक्य.

- जायकवडी, उजनी धरणातील गाळ उपसा अव्यवहार्य.

- नद्यांचे मूळ पात्र अस्तित्वात येईपर्यंत गाळ काढायला हवा.

- पावसाळ्यापूर्वी धरणांमध्ये पूरनियंत्रणासाठी जागा ठेवायला हवी.