शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये सरकार कोसळण्याचं संकट, घटकपक्षाने सोडली साथ; आतापर्यंत ३ मंत्र्यांनी दिले राजीनामे
2
Punjab Flood : पुराचे थैमान! पंजाबमधील मृतांचा आकडा ५१ वर; पिकं पाण्याखाली, शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा
3
दसरा मेळाव्यानंतर ठाकरेंना धक्का देणार, २ आमदार वगळता इतर संपर्कात; शिंदेसेनेच्या नेत्याचा दावा
4
Crime: 'तू माझ्या बायकोला फोन का करतो?' संतापलेल्या तरुणाने चुलत भावाला संपवलं!
5
उपराष्ट्रपती निवडणूक: मतदानाआधीच ३ माजी मुख्यमंत्र्यांनी 'गेम' बदलला; इंडिया आघाडीला धक्का
6
Nepal Currency Value: भारताच्या ५० रुपयांचं मूल्य नेपाळमध्ये किती असेल? आश्चर्यचकित करेल उत्तर!
7
"ते दोन पवित्र आत्मे पितृ पंधरवड्यात जमिनीवर आले तर काय प्रश्न विचारतील?’’ भाजपाचा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना टोला
8
डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका! ८३ मिलियन डॉलर्सच्या नूकसान भरपाईचा निर्णय कायम
9
"मीही बोलू शकले असते, पण.."; धनश्री वर्माचं मोठं विधान, चहलबद्दल म्हणाली- "त्याची अब्रू..."
10
गृहमंत्र्यांचा राजीनामा, २० जणांचा मृत्यू, सोशल मीडियावरील बंदी उठवली; नेपाळमध्ये काय काय घडले?
11
तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 'हे' ५ शेअर्स आहेत का? ब्रोकरेज फर्मने सांगितली बंपर कमाईची संधी
12
Shantanu Naidu: रतन टाटांचा तरुण सहकारी राहिलेल्या शंतनू नायडूने प्रेमाची कबुली दिली? तिच्यासोबतचे फोटो आले समोर
13
टायगर श्रॉफनं मुंबईमध्ये ₹१५.६० कोटींना विकलं लक्झरी अपार्टमेंट, पाहा डिटेल्स; कितीला खरेदी केलेली प्रॉपर्टी?
14
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
15
"मराठी सिनेसृष्टीने दोन कलाकार गमावले", प्रिया मराठेसोबत लावला फोटो, मरणाची बातमी पाहून मराठी अभिनेता संतापला
16
Post Office ची ही स्कीम करेल मालामाल; दर महिन्याला मिळेल ₹५,५०० चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
17
Asia Cup 2025, AFG vs HK Head to Head Record : 'चमत्कारी' संघासमोर ते चमत्कार दाखवतील का?
18
"आई शप्पथ गळा कापेन...", अली गोनीचा ट्रोलर्सला इशारा; 'त्या' व्हिडीओवरुन झालेला वाद
19
"तू बाहेर चल, तुझं तोंडच फोडतो…’’, ट्रम्प यांच्या डिनर पार्टीत वादावादी, वित्तमंत्री आणि फायनान्स अधिकारी भिडले
20
शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २६१ अंकांनी वधारला; Nifty मध्येही तेजी, 'या' स्टॉक्समध्ये मोठी तेजी

राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बॅँका बरखास्त करा

By admin | Updated: July 16, 2015 23:23 IST

सदाभाऊ खोत : कारखानदारांचा राज्याच्या तिजोरीवर दरोड्याचा बेत

सांगली : राजकीय अड्डे बनलेल्या राज्यातील जिल्हा बॅँका बरखास्त करून नाबार्डमार्फत थेट सोसायट्यांनी अर्थपुरवठा करावा, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. सोसायट्या सक्षम झाल्या तरच शेतकऱ्यांचा अधिक फायदा होईल, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी गुरुवारी सांगलीतील पत्रकार परिषदेत व्यक्त केले. ते म्हणाले की, जिल्हा बॅँकांमार्फत शेतकऱ्यांना कमी आणि अन्य संस्थांनाच जादा कर्जपुरवठा केला जातो. त्यामध्ये राजकीय नेत्यांशी संबंधित संस्थांचा वाटा मोठा आहे. कर्जपुरवठ्याच्या सोयीस्कर यंत्रणेमुळेच खासदार, आमदार आणि मोठी पदे भूषविलेले राजकारणीही बॅँकेच्या संचालकपदासाठी धडपडत असतात. त्यामुळे राजकीय अड्डा बनलेल्या या जिल्हा बॅँका बरखास्त करून थेट सोसायट्यांना कर्जपुरवठा करण्यात यावा. यातून सोसायट्या सक्षम होऊन शेतकऱ्यांना त्याचा सर्वाधिक लाभ होऊ शकतो. जिल्हा बॅँका बरखास्त झाल्यामुळे शेतकऱ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही. याबाबतचा प्रस्ताव आम्ही मुख्यमंत्र्यांकडे दिला आहे. सरकारही याबाबत सकारात्मक आहे.ते म्हणाले की, कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या राज्यात वाढत आहेत. त्यामुळे राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करावे. पाच वर्षांची मुदत देऊन संपूर्ण कालावधीचे व्याज माफ करावे. दुष्काळ ही राष्ट्रीय आपत्ती जाहीर करून केंद्राकडूनही मदत मिळवावी. या उपाययोजनांमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. ऊसबिलाच्या प्रश्नावर सध्या शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राज्यातील साखर कारखानदारांची लॉबी तयार झाली आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या अडचणीत आणून राज्याच्या तिजोरीवर दरोडा घालण्याचा त्यांचा बेत आहे. पवारांनी आघाडी सरकारच्या कालावधीत दिलेले पॅकेज या कारखानदारांना गोड लागले. आता भाजप सरकारने दिलेले पॅकेजच यांना कडू का लागले? शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर पॅकेजचे पैसे जाणार असल्यामुळे कारखानदारांना वाईट वाटत आहे. शेतकऱ्यांचा बदला घेण्याचा प्रयत्न कारखानदार करीत आहेत. (प्रतिनिधी)मंत्रिपद मिळणार असल्यानेच कर्जमाफीऐवजी कर्ज पुनर्गठनाचा पर्याय स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ठेवला आहे का, असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर खोत यांनी मंत्रिपदाचा याच्याशी काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. सरकारवर दबाव आणणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मगरीला अश्रू कसे आले?खोत म्हणाले की, राज्यात आघाडीच्या नेत्यांनी सुरू केलेले आंदोलन म्हणजे शेतकऱ्यांपोटीचे पुतनामावशीचे प्रेम आहे. त्यांचे सरकार सत्तेवर असताना त्यांनी पूर्ण कर्जमाफी देता येत नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे आताच मगरीच्या डोळ्यात अश्रू कसे आले?एफआरपी न दिल्यास आंदोलनसाखर कारखानदारांनी एफआरपी न दिल्यास सरकारने कारखानदारांवर कारवाई करावी. सर्वांचेच परवाने रद्द करून सहकारी साखर कारखान्यांचे संचालक मंडळ बरखास्त करावे. प्रशासकांमार्फत कारखाने चालवून शेतकऱ्यांना न्याय द्यावा. सरकारने कारवाई केली नाही, तर आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा खोत यांनी यावेळी दिला. सर्वांना डीलरशीप द्याखते व बियाणे कंपन्यांच्या डीलरशीपची सध्या मक्तेदारी आहे. यातूनच खते व बियाणांचा काळाबाजार वाढला आहे. त्यामुळे मागेल त्याला डीलरशीप द्यावी, अशी मागणी सरकारकडे करणार असल्याचे खोत म्हणाले. माझ्याविषयीचे जयंतरावांचे प्रेम पाहून आनंद झाला. हेच प्रेम बावची येथे मला राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून मारहाण झाली त्यावेळी निर्माण झाले असते, तर माझ्या पाठीवर वळ उठले नसते, असे ते म्हणाले.