शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद!
2
गुड न्यूज! चाकरमान्यांना बाप्पा पावला; गणेशोत्सवासाठी कोकणात STच्या जादा ५ हजार बस धावणार
3
Raigad Rain: रायगडमध्ये पावसाचा कहर! सहा तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी
4
पत्नीला जाळून मारल्याप्रकरणी पतीला अटक, पण ती प्रियकरासोबत सापडली जिवंत, सोलापूरातील धक्कादायक प्रकार
5
Accident Video: मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद! दोन तरुणांना कारने उडवले, एकाचा जागीच मृत्यू
6
...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन
7
Ramayana : तब्बल ४ हजार कोटींमध्ये बनतोय रणबीरचा 'रामायण'; निर्माते म्हणाले, "हॉलिवूडच्या जवळपासही..."
8
संपत्तीवरून वाढला वाद, पत्नीने अवघी १० लाख लावली पतीच्या जीवाची बोली! सुपारी दिली अन्...  
9
नवजात बाळाला मालिश करणं का महत्त्वाचं, कोणतं तेल आहे सर्वात बेस्ट?
10
Bitcoin Return Chart: ५ वर्षांत बनवलं राजा! तुम्हीही १००-२०० रुपयांत खरेदी करू शकता बिटकॉईन
11
जयशंकर यांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना दिला पीएम मोदींचा संदेस; पाकिस्तानला लागणार मिरची..!
12
सरकार बदलणार MRP चा फॉर्म्युला; वस्तूंच्या किंमती कमी होणार की महागणार? ग्राहकांवर होणार परिणाम
13
धक्कादायक! हरवलेला क्रिकेटचा बॉल शोधत होता, बंद घरात मानवी सांगाडा पाहून हादरला
14
Video - जीवघेणा प्रवास! शाळेत जाण्यासाठी चिमुकलीची धडपड; पाय घसरून चिखलात पडली अन्...
15
व्रत-वैकल्यांचा राजा श्रावणमास, प्रत्येक दिवसाचे महत्त्व खास; पाहा, सण-उत्सवांचे महात्म्य
16
वय ३५? काळजी करू नका! 'या' ३ सोप्या स्टेप्सने कमवू शकता १ कोटीचा फंड, गुंतवणुकीचा सिक्रेट रोडमॅप!
17
WI vs AUS: अब्रूचं खोबरं! कॅरेबियन संघ २७ धावांवर ऑल आउट! ७ फलंदाजांच्या पदरी पडला भोपळा
18
Video: पॅराग्लायडिंग करण्यासाठी 'तो' धावत गेला अन् दरीत कोसळला! व्हिडीओ बघून चुकेल काळजाचा ठोका
19
मुंबई: घरातील सगळे झोपले अन् वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने आयुष्य संपवले, साडीनेच घेतला...
20
१३८ दिवस शनि वक्री: ५ राशींवर शनिची वक्र दृष्टी कायम, ‘हे’ रामबाण उपाय कराच; शनि शुभ करेल!

निधी नसेल तर पंचायत समितीच बरखास्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 23:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : पंचायत समिती सदस्यांना विकास कामांसाठी निधी मिळावा, अशी मागणी सदस्यांनी केली. त्यावर आक्रमक झालेले विरोधी पक्षनेते राहुल महाडिक यांनी, मतदार संघातील विकास कामांसाठी सदस्यांना निधी मिळणार नसेल, तर पंचायत समितीच बरखास्त करुन टाका, अशी मागणी केली. सभागृहाने तसा ठरावही मंजूर केला.येथील पंचायत समितीच्या राजारामबापू पाटील सभागृहात ...

लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : पंचायत समिती सदस्यांना विकास कामांसाठी निधी मिळावा, अशी मागणी सदस्यांनी केली. त्यावर आक्रमक झालेले विरोधी पक्षनेते राहुल महाडिक यांनी, मतदार संघातील विकास कामांसाठी सदस्यांना निधी मिळणार नसेल, तर पंचायत समितीच बरखास्त करुन टाका, अशी मागणी केली. सभागृहाने तसा ठरावही मंजूर केला.येथील पंचायत समितीच्या राजारामबापू पाटील सभागृहात सभापती सचिन हुलवान यांच्या अध्यक्षतेखाली व उपसभापती नेताजी पाटील, प्रभारी गटविकास अधिकारी राजेंद्र खरात, सुहास बुधवले यांच्या उपस्थितीत सोमवारी सभा झाली.शासनाच्या १४ व्या वित्त आयोगामुळे विकास कामांसाठीचा निधी थेट ग्रामपंचायतींकडे जातो. पंचायत समिती सदस्यांना विकास कामासाठी निधी मिळत नाही. सदस्यांना निधी मिळाला पाहिजे, अशी मागणी पेठेच्या वसुधा दाभोळे यांनी केली. त्याला सर्व सदस्यांनी पाठिंबा दिला. त्यावर महाडिक यांनी, विकास कामांसाठी जर निधी मिळणारच नसेल, तर पंचायत समितीच बरखास्त करुन टाका, अशी मागणी केली.सत्ताधारी राष्ट्रवादीचे गटनेते देवराज पाटील यांनी, ठिबकसाठीच्या अनुदानाची रक्कम वाढवावी, अशी मागणी केली. तोही ठराव सभागृहाने मंजूर केला.अ‍ॅड. विजय खरात यांनी, शिधापत्रिकेसाठी हेलपाटे मारावे लागतात. तहसील कार्यालयात तोंड बघून कामे केली जातात, असे आरोप केले.शंकर चव्हाण यांनी, तहान लागल्यावर विहीर खोदायची, असले काम बंद करा, अशा शब्दात अधिकाºयांना फटकारले. पिण्याच्या पाण्याचा आठ दिवस पुरवठा होत नाही, असा आरोपही त्यांनी केला.अभियंता कोरे यांनी, कामाची सर्व तयारी आहे, मात्र पैसेच नाहीत. पूर्वी या विभागाकडे २५ लोक होते. आता सातजण आहेत. त्यामुळे काय करणार? अशी वस्तुस्थिती मांडली. योजनेच्या परिस्थितीचे अहवाल वेळोवेळी दिले जातात का? या प्रश्नावर चव्हाण यांनी पंचायत समितीमधील अधिकाºयांकडे विचारणा केल्यावर त्यांनी, असे अहवाल आमच्याकडे येत नाहीत असे सांगितले.यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. आॅक्टोबरपासून पाणीटंचाई जाणवेल. त्यामुळे त्याचे नियोजन करा, अशी मागणी केली.एसटीच्या आगार व्यवस्थापक शर्मिष्ठा पाटील यांनी, एसटीच्या सर्व फेºया वेळेवर निघून वेळेत पोहोचल्या पाहिजेत, अशा सूचना दिल्या आहेत. त्यातूनही काही तक्रार अथवा सूचना असल्यास आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले.राहुल महाडिक यांनी तालुक्यातील पीक परिस्थितीची विचारणा केल्यावर, पीक परिस्थिती चांगली असल्याचे अधिकाºयांनी सांगितले. त्यामुळे संतापलेल्या सदस्यांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. पी. टी. पाटील यांनी दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. देवराज पाटील यांनी, ठिबकसाठी अनुदानाची रक्कम वाढवून देण्याची मागणी केली.ग्रामपंचायत विभागाचा सावळागोंधळआनंदराव पाटील यांनी, ग्रामपंचायतीकडील वसुली आणि थकबाकीची माहिती दिली जात नाही, असा आरोप केला. ग्रामपंचायतीकडे अपुरा निधी असतानाही कामांचे प्रस्ताव केले जातात. ती कामे अर्धवट राहतात. त्यामुळे त्याचा वापरही होत नाही. निधीच्या प्रमाणातच कामे करावीत, अशीही सूचना त्यांनी केली.च्धनश्री माने, आनंदराव पाटील यांनी, पश्चिम भागाच्या गावातील तलावात पाणीसाठा नाही. शेखरवाडीसह परिसराच्या तलावातील पाणी दूषित आहे. त्यावर उपाययोजना करा, अशी मागणी केली.अभियंता दिनकर पाटील यांनी, कोणतीही विकासकामे पूर्ण स्वरुपात व्हावयाची असतील, तर आर्थिक नियोजन लक्षात घेऊन प्रस्ताव तयार करावेत, असे स्पष्ट केले.