शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
4
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
5
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
6
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
7
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
8
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
9
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
10
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
11
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
12
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
13
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
14
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
15
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
16
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
17
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
18
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
19
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
20
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी

निधी नसेल तर पंचायत समितीच बरखास्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 23:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : पंचायत समिती सदस्यांना विकास कामांसाठी निधी मिळावा, अशी मागणी सदस्यांनी केली. त्यावर आक्रमक झालेले विरोधी पक्षनेते राहुल महाडिक यांनी, मतदार संघातील विकास कामांसाठी सदस्यांना निधी मिळणार नसेल, तर पंचायत समितीच बरखास्त करुन टाका, अशी मागणी केली. सभागृहाने तसा ठरावही मंजूर केला.येथील पंचायत समितीच्या राजारामबापू पाटील सभागृहात ...

लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : पंचायत समिती सदस्यांना विकास कामांसाठी निधी मिळावा, अशी मागणी सदस्यांनी केली. त्यावर आक्रमक झालेले विरोधी पक्षनेते राहुल महाडिक यांनी, मतदार संघातील विकास कामांसाठी सदस्यांना निधी मिळणार नसेल, तर पंचायत समितीच बरखास्त करुन टाका, अशी मागणी केली. सभागृहाने तसा ठरावही मंजूर केला.येथील पंचायत समितीच्या राजारामबापू पाटील सभागृहात सभापती सचिन हुलवान यांच्या अध्यक्षतेखाली व उपसभापती नेताजी पाटील, प्रभारी गटविकास अधिकारी राजेंद्र खरात, सुहास बुधवले यांच्या उपस्थितीत सोमवारी सभा झाली.शासनाच्या १४ व्या वित्त आयोगामुळे विकास कामांसाठीचा निधी थेट ग्रामपंचायतींकडे जातो. पंचायत समिती सदस्यांना विकास कामासाठी निधी मिळत नाही. सदस्यांना निधी मिळाला पाहिजे, अशी मागणी पेठेच्या वसुधा दाभोळे यांनी केली. त्याला सर्व सदस्यांनी पाठिंबा दिला. त्यावर महाडिक यांनी, विकास कामांसाठी जर निधी मिळणारच नसेल, तर पंचायत समितीच बरखास्त करुन टाका, अशी मागणी केली.सत्ताधारी राष्ट्रवादीचे गटनेते देवराज पाटील यांनी, ठिबकसाठीच्या अनुदानाची रक्कम वाढवावी, अशी मागणी केली. तोही ठराव सभागृहाने मंजूर केला.अ‍ॅड. विजय खरात यांनी, शिधापत्रिकेसाठी हेलपाटे मारावे लागतात. तहसील कार्यालयात तोंड बघून कामे केली जातात, असे आरोप केले.शंकर चव्हाण यांनी, तहान लागल्यावर विहीर खोदायची, असले काम बंद करा, अशा शब्दात अधिकाºयांना फटकारले. पिण्याच्या पाण्याचा आठ दिवस पुरवठा होत नाही, असा आरोपही त्यांनी केला.अभियंता कोरे यांनी, कामाची सर्व तयारी आहे, मात्र पैसेच नाहीत. पूर्वी या विभागाकडे २५ लोक होते. आता सातजण आहेत. त्यामुळे काय करणार? अशी वस्तुस्थिती मांडली. योजनेच्या परिस्थितीचे अहवाल वेळोवेळी दिले जातात का? या प्रश्नावर चव्हाण यांनी पंचायत समितीमधील अधिकाºयांकडे विचारणा केल्यावर त्यांनी, असे अहवाल आमच्याकडे येत नाहीत असे सांगितले.यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. आॅक्टोबरपासून पाणीटंचाई जाणवेल. त्यामुळे त्याचे नियोजन करा, अशी मागणी केली.एसटीच्या आगार व्यवस्थापक शर्मिष्ठा पाटील यांनी, एसटीच्या सर्व फेºया वेळेवर निघून वेळेत पोहोचल्या पाहिजेत, अशा सूचना दिल्या आहेत. त्यातूनही काही तक्रार अथवा सूचना असल्यास आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले.राहुल महाडिक यांनी तालुक्यातील पीक परिस्थितीची विचारणा केल्यावर, पीक परिस्थिती चांगली असल्याचे अधिकाºयांनी सांगितले. त्यामुळे संतापलेल्या सदस्यांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. पी. टी. पाटील यांनी दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. देवराज पाटील यांनी, ठिबकसाठी अनुदानाची रक्कम वाढवून देण्याची मागणी केली.ग्रामपंचायत विभागाचा सावळागोंधळआनंदराव पाटील यांनी, ग्रामपंचायतीकडील वसुली आणि थकबाकीची माहिती दिली जात नाही, असा आरोप केला. ग्रामपंचायतीकडे अपुरा निधी असतानाही कामांचे प्रस्ताव केले जातात. ती कामे अर्धवट राहतात. त्यामुळे त्याचा वापरही होत नाही. निधीच्या प्रमाणातच कामे करावीत, अशीही सूचना त्यांनी केली.च्धनश्री माने, आनंदराव पाटील यांनी, पश्चिम भागाच्या गावातील तलावात पाणीसाठा नाही. शेखरवाडीसह परिसराच्या तलावातील पाणी दूषित आहे. त्यावर उपाययोजना करा, अशी मागणी केली.अभियंता दिनकर पाटील यांनी, कोणतीही विकासकामे पूर्ण स्वरुपात व्हावयाची असतील, तर आर्थिक नियोजन लक्षात घेऊन प्रस्ताव तयार करावेत, असे स्पष्ट केले.