शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

समन्वयातून दुष्काळावर मात करा--दीपक म्हैसेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 00:00 IST

दुष्काळी संकटावर मात करण्यासाठी प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे. दुष्काळी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी व सर्वसामान्य माणसाचे जीवन सुसह्य होईल यासाठी प्रशासनातील प्रत्येक घटकाने संवेदनशीलतेने काम करत सर्व विभागांनी समन्वय राखून काम करावे

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक-शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यावर नियोजन करावे

सांगली : दुष्काळी संकटावर मात करण्यासाठी प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे. दुष्काळी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी व सर्वसामान्य माणसाचे जीवन सुसह्य होईल यासाठी प्रशासनातील प्रत्येक घटकाने संवेदनशीलतेने काम करत सर्व विभागांनी समन्वय राखून काम करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी शुक्रवारी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली टंचाई आढावा बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, महसूल उपायुक्त प्रताप जाधव, पुनर्वसन उपायुक्त दीपक नलावडे, पुरवठा उपायुक्त नीलिमा धायगुडे, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले, दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. जत आटपाडी व कवठेमहांकाळ तालुक्यातील भेटीमध्ये शेतकऱ्यांच्या अडचणी समोर आल्या आहेत. त्या निवारण्यासाठी प्रशासनाने आता नियोजन करावे. पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी ज्या ठिकाणी टँकर सुरू आहेत, त्या ठिकाणी जीपीएस कार्यप्रणालीचा काटेकोरपणे अवलंब होतो का नाही, याची पाहणी करावी. टँकर भरून घेण्यासाठीचे जलस्रोत निश्चित करण्यात यावीत. टॅँकरमधून पाणी पुरवठा करताना त्याठिकाणी ब्लिचिंग पावडरचा उपयोगही करणे बंधनकारक आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी नियोजन केले असून सर्व सूचनांचे पालन होईल असे जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी सांगितले.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विजया यादव, उपजिल्हाधिकारी किरण कुलकर्णी, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

चारा छावण्यांसाठी सात प्रस्तावचारा छावण्यांसाठी सात प्रस्ताव आले असून पाच प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. तीन चारा छावण्या सुरू झाल्या आहेत, दोन चारा छावण्या लवकरच सुरू करण्यात येतील. अजून आटपाडी तालुक्यातून चार व जत तालुक्यातील चार चारा छावण्यांचे प्रस्ताव प्राप्त झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावर मागणी व आवश्यकता लक्षात घेऊन चारा छावण्यांचे प्रस्ताव तात्काळ मार्गी लावण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले.

सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई आढावा बैठकीत विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. अभिजित चौधरी, प्रताप जाधव, दीपक नलावडे, नीलिमा धायगुडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीcommissionerआयुक्तSangliसांगली