शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
2
IND vs ENG: बुमराहवर प्रचंड संतापला रवी शास्त्री; गंभीर-गिल जोडीला म्हणाला- "त्याच्या हातातून..."
3
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
4
८ वर्षांनी संधी; आता प्रमोशनही मिळालं! पण तो पुन्हा 'बिनकामाचा' ठरला
5
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
6
टॉयलेटमध्ये जाणाऱ्या महिलांचे बनवत होता व्हिडीओ; प्रसिद्ध आयटी कंपनीमधील इंजिनियरला अटक
7
इन्स्टाग्रामवर सूत जुळलं, कोर्ट मॅरेजनंतर मुलाला दिला जन्म; २२ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य
8
सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे भारतीय कर्णधार, धोनी दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
9
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
10
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
11
२०२७ पर्यंत ३ राशींना साडेसाती कायम, २ राशींवर शनि दृष्टी; अशुभ प्रभाव वाढेल? ‘हे’ उपाय कराच
12
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
13
ENG vs IND : यशस्वी जैस्वाल इंग्लंडला नडला अन् कॅप्टन बेन स्टोक्सलाही भिडला; नेमकं काय घडलं?
14
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
15
काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा पुढाकार; ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या
16
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
17
मुसळधार पावसात AC सुरू ठेवणं योग्य आहे का? बहुतेक लोक करतात 'ही' चूक
18
राहुल आणि सोनिया गांधींनी केलेला २००० कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न; ईडीचा मोठा आरोप
19
भयंकर! कुत्रा चावल्यामुळे कबड्डीपटूचा तडफडून मृत्यू; अँटी रेबीज इंजेक्शन न घेणं बेतलं जीवावर
20
लग्नाआधीच अनेकदा तुझ्या रूममध्ये का दिसायची रितिका? भज्जीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं भन्नाट उत्तर

दिलीपतात्यांकडून आश्वासनांचा पाऊस!

By admin | Updated: September 24, 2015 00:23 IST

जिल्हा बँक सर्वसाधारण सभा : ‘आयएसओ’ मानांकनासाठी प्रयत्न

सांगली : पाच वर्षांत जिल्हा बँकेला राज्यात एक नंबरी बनवू, यासह २६ गावांत विस्तारित कक्ष, मागणीनुसार एटीएम सुविधा, सोसायटीचे सक्षमीकरण, विकास निधीला नफ्यातील दहा टक्के रक्कम देणार, अशा विविध घोषणांचा पाऊस बुधवारी जिल्हा बँकेच्या वार्षिक सभेत पडला. अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी या सभेत आश्वासनांवर आश्वासने दिली. जिल्हा बँकेची ८८ वी वार्षिक सभा बुधवारी वसंतदादा पाटील सभागृहात झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी दिलीपतात्या पाटील होते. यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, खासदार संजयकाका पाटील, माजी आमदार मानसिंगराव नाईक, मोहनराव कदम, विलासराव शिंदे, बी. के. पाटील, विशाल पाटील यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते. अध्यक्ष पाटील म्हणाले की, सभासदांनी विश्वस्त म्हणून आम्हाला बँकेत निवडून दिले आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. येत्या पाच वर्षांत राज्यातील सहकार क्षेत्रातील एक अग्रगण्य व नंबर एकची बँक म्हणून आपल्या बँकेचा नावलौकिक होईल. यंदा बँकेला १९ कोटी १८ लाखांचा निव्वळ नफा झाला आहे. या नफ्यातील दहा टक्के रक्कम सोसायट्यांना विकास निधी म्हणून देणार आहोत. जिल्ह्यात ग्राहकांच्या मागणीनुसार एटीएम सुविधा देऊ. बँक शाखा नसलेल्या २६ गावांत विस्तारित कक्ष सुरू केले जाणार आहेत. बँकेला आयएसओ मानांकनासाठी प्रयत्न केले जातील. सोसायट्यांना अनिष्ट तफावतीतून बाहेर काढून त्या सक्षम करण्यासाठी बँकेकडून सर्वतोपरी सहकार्य राहील. सोसायट्यांना नवीन इमारत बांधकामासाठी कमी व्याजाने कर्ज उपलब्ध करून देणार आहोत. विकास सोसायट्यांचे अध्यक्ष व सचिवांना प्रशिक्षण, शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक कर्ज, कर्जवाटप मर्यादेत वाढ, सोसायट्यांना संगणकांची सुविधा देऊन त्या थेट बँकेशी जोडण्याची योजना राबवणार आहोत.बँकेचे कार्यकारी संचालक शीतल चोथे यांनी नोटिशीचे वाचन केले. व्यवस्थापक मानसिंग पाटील यांनी आभार मानले. सभेला संचालक महेंद्र लाड, डॉ. सिकंदर जमादार, सुरेश पाटील, श्रद्धा चरापले, कमल पाटील, माजी अध्यक्ष शंकरराव पाटील, डी. के. पाटील, दिलीप वग्याणी यांच्यासह सभासद उपस्थित होते.बँकेत गैरव्यवहार नाही : पाटीलजिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून गेल्या पंधरा वर्षांत दीड कोटी रुपयांची अफरातफर झाली आहे, या मुद्द्यावर अध्यक्ष दिलीप पाटील यांनी बँकेत कुठलाही गैरव्यवहार झालेला नाही, असे स्पष्ट केले. बँक आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. काहीजण बँकेला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ही काय महापालिका व जिल्हा परिषद नव्हे, तिथे काही घडले तर फरक पडत नाही. आमच्या हातात बँक सुरक्षित आहे. २००१ पासून बँकेत काही छोट्या गोष्टी घडल्या असतील, पण त्याची वसुलीही झाली आहे, असा खुलासा त्यांनी केला.