शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

म्हैसाळ योजनेच्या थकबाकीवरून मतभेद

By admin | Updated: October 3, 2015 23:48 IST

संतप्त प्रतिक्रिया : शेतकऱ्यांच्या सात-बाऱ्यावर बोजा चढविण्याच्या भूमिकेला कडाडून विरोध

सांगली : मिरज, कवठेमहांकाळ, तासगावसह परिसरातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणाऱ्या म्हैसाळ योजनेच्या थकबाकीच्या मुद्द्यावरून लाभक्षेत्रातील शेतकरी व लोकप्रतिनिधींतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यात कृष्णा खोरे प्रशासनाने आवर्तनाची थकबाकी थेट शेतकऱ्यांच्या सात-बारावर चढवण्याची प्रक्रिया चालू केल्याने शेतकऱ्यांत अस्वस्थता पसरली आहे. दरम्यान, लाभक्षेत्रातील लोकप्रतिनिधींनी याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना, शेतकऱ्यांनी फुकटच्या पाण्याचा सोस सोडला तरच योजना पूर्ण क्षमतेने सुरू राहणार असल्याचे सांगितले, तर शेतकऱ्यांच्या सात-बारावर थकबाकी चढवण्याच्या प्रशासनाच्या भूमिकेला मात्र कडाकडून विरोध दर्शवला. प्रतिसादावर योजना अवलंबून... याबाबत पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलावडे म्हणाले की, म्हैसाळ योजनेच्या पाण्याच्या माध्यमातून चार तालुक्यातील शेतकऱ्यांना फायदा होत असताना योजना चालू ठेवण्यासाठी शेतकऱ्यांकडून मिळणारा प्रतिसाद मात्र अत्यल्प आहे. आवर्तन सुरू करण्याच्या अगोदर प्रशासनाच्यवतीने जाहीर प्रकटने, गावोगावी बैठका घेऊन शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यात येते. त्याचबरोबर त्यांच्याकडून मागणी अर्ज भरून घेतले जातात. या प्रक्रियेसही शेतकऱ्यांकडून कमी प्रतिसाद मिळतो आहे. आजअखेर टंचाई निधीतून ३६ कोटी रुपयांची थकबाकी अदा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांकडून मात्र वसुलीस प्रतिसाद मिळत नसल्याने योजनेचे भवितव्य अधांतरी आहे. योजनेतून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा दर बघितला तर पिण्याच्या पाण्याची बाटली २० रुपयांना मिळत असताना म्हैसाळ योजनेतील १० हजार लिटर पाण्याला १३ रुपये दर आकारण्यात येतो. लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी आपल्या उत्पन्नातील केवळ ५ टक्के रक्कम अदा केल्यास योजना चालवण्यास अडचण येणार नाही. वसुलीला शेतकऱ्यांकडून मिळणाऱ्या प्रतिसादावरच योजना अवलंबून आहे.