शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मरण झाले स्वस्त; कोरोना कालावधीतही रस्ते अपघातात मृत्यूसंख्या कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यात रस्त्यांचा दर्जा सुधारत चालला असताना अपघातांची मालिकाही कायम आहे. काही भागांत रस्ते चांगले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : जिल्ह्यात रस्त्यांचा दर्जा सुधारत चालला असताना अपघातांची मालिकाही कायम आहे. काही भागांत रस्ते चांगले झाल्याने वेगाने वाहन चालवल्याने अपघात घडले तर काही भागात रस्ते खराब असल्याने अपघात घडत आहेत. कोरोनामुळे सर्वत्र निर्बंध लागू असतानाही जिल्ह्यातील अपघातांची संख्या व त्यातील मृतांची संख्या तुलनेने कायम आहे. जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत सरासरी २७५ हून अधिक जणांनी रस्ते अपघातात जीव गमावला आहे.

जिल्ह्यात वाहनांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे रस्त्याच्या परिस्थितीचा, वाहतुकीचा अंदाज न घेता वाहन चालवून अपघात घडत आहेत. यासह खराब रस्त्यांमुळेही काही भागात अपघात घडत आहेत. गेल्यावर्षी व यावर्षी पाच महिन्यांत अपघातांची संख्या कमी असली तरी त्यामुळे जखमी होणाऱ्यांचे प्रमाण कायम आहे. कोरोना अगोदर २०१७ साली ३६५ जणांचा अपघातात मृत्यू झाला होता. २०१८ साली ३५९ जणांचा मृत्यू झाला.

चौकट

लॉकडाऊनमध्ये अपघात झाले कमी; पण...

* गेल्यावर्षी कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर अनेक निर्बंध लागू करण्यात आले. त्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले होते.

* कोरोना संसर्ग कायमच राहिल्याने लॉकडाऊनही कायम राहिले होते. या कालावधीत अपघातांची संख्या कमी झाली असली तरी मृत्यूचे प्रमाण कायम राहिले आहे.

चौकट

पायी चालणाऱ्यांनाही धोका

जिल्ह्यातील अपघातात केवळ दोन वाहन अथवा एखादे वाहनांच्या अपघातांचा समावेश नसून रस्त्याकडून पायी जाणारेही गंभीर जखमी झाले आहेत. त्यातही सकाळच्या वेळी मॉर्निंग वॉकवेळी गेलेले काही जण जखमी झाले आहेत.

चौकट

तरुणांना वेगाची नशा नडली

गेल्या तीन वर्षांतील अपघातातील मृतांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक आहे. नव्याने वाहन चालविण्याची क्रेझ आणि वेगाची नशा यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे आणि त्यात मृत्यू होण्यात व आयुष्यभरासाठी जायबंदी होणाऱ्यांत तरुणांचेच प्रमाण दुर्दैवाने अधिक आहे.

चौकट

याठिकाणी वाहने हळू चालवा

* जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीने ३६ ठिकाणी ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले आहेत. वारंवार एकाच ठिकाणी अपघात होत असल्यास त्या ठिकाणास ब्लॅक स्पॉट म्हटले जाते.

* जिल्ह्यात रत्नागिरी-नागपूर, दिघंची-हेरवाड, पेठ-सांगली, विटा-सांगली या मार्गावर वाहतूक वाढली आहे. वाहनधारकांनी या मार्गावर सावकाश वाहन चालविण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

चौकट

वेळ मौल्यवान; पण जीवन अमूल्य!

कोट

रस्त्याच्या कामासाठी पसरण्यात आलेल्या खडीवरून दुचाकी घसरून अपघात घडला होता. त्यामुळे मुकामार आणि जखमाही झाल्या हाेत्या. वाहनांचा वेग कमी असल्याने अपघातातून बचावलो होतो.

-महेश ढवळे

कोट

सांगलीतील गतिरोधकांच्या उंचीचा अंदाज न आल्याने पडून जखमी झालो होतो. मात्र, त्यावेळी हेल्मेट घातले असल्याने तीव्रता जाणवली नाही व त्यामुळे बचावलो होतो. सर्वांनी हेल्मेट नेहमी वापरावे.

-दिलीप कोथळे

चौकट

वर्ष अपघात जखमी मृत्यू

२०१८ ७९७ ७०९ ३५९

२०१९ ७५६ ६६५ २९३

२०२० ५८८ ४२७ २७९

२०२१ मे पर्यंत २८६ १२६