शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

उद्धव ठाकरेंनी कधी विधानसभा पाहिली तरी आहे का? : राणे

By admin | Updated: October 4, 2014 23:51 IST

सांगलीत कॉँग्रेसची सभा : राष्ट्रवादीसह भाजप, शिवसेनेवर टीकास्त्र

सांगली : भाजप आणि शिवसेना नेत्यांना आतापासूनच मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पडू लागली आहेत. उध्दव ठाकरेंना विधानसभा तरी माहीत आहे का? विधानसभेत किती विभाग असतात, याचीही त्यांना कल्पना नाही. तरीही असे लोक आता मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पाहू लागले आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रचारप्रमुख नारायण राणे यांनी शनिवारी सांगलीतील सभेत केली.कॉँग्रेसचे सांगलीतील उमेदवार मदन पाटील यांच्या प्रचार प्रारंभाची सभा सांगलीत वसंतदादा समाधीस्थळी पार पडली. यावेळी माजी वनमंत्री पतंगराव कदम, माजी मंत्री प्रतीक पाटील, अभिनेत्री नगमा, महापौर कांचन कांबळे उपस्थित होते. राणे म्हणाले की, मंडप नाही, नवरीचा पत्ता नाही आणि भाजप, सेनेचे नेते गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. शिवसेनेने ४८ वर्षे केवळ मराठी माणूस आणि मुंबईच्या जोरावर दुकानदारी केली. भाजपमधील नेत्यांना मराठीत शुद्ध बोलताही येत नाही. महाराष्ट्रात एकही लायक नेता भाजपकडे नसल्याने त्यांच्या जाहिरातींवर केवळ मोदीच दिसत आहेत. भाजपचे नेते किती धुतल्या तांदळासारखे आहेत, त्याची मला चांगली कल्पना आहे. मी मुख्यमंत्री असताना माझ्या मंत्रिमंडळात ते होतेच. असे स्वार्थी लोक आता लोकांची दिशाभूल करीत आहेत. स्वतंत्र महाराष्ट्राच्या स्थापनेवेळी मोरारजी देसाई यांचा मुंबई गुजरातला जोडण्याचा प्रयत्न होता. राज्यातील १०५ हुतात्म्यांच्या बलिदानामुळे मुंबई महाराष्ट्रात राहिली. त्यावेळी मुंबई मिळाली नाही म्हणून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्याचे षड्यंत्र रचत आहेत. मुंबई बंदरावरील व्यापार गुजरातला स्थलांतरित झाला आहे. रिझर्व्ह बॅँकेच्या मुंबईतील तीन शाखा त्यांनी दिल्लीला स्थलांतरित केल्या. गुंतवणूकदारांनाही गुजरातमध्ये जाण्यास सांगितले जात आहे. एकप्रकारे मुंबईचे आर्थिक खच्चीकरण करण्याचा हा डाव आहे. आता मुंबईतील ७५ हजार कोटी रुपयांची १८०० एकर जमीन घेण्यासाठी गुजरातमधील उद्योजक असलेला मोदींचा एक मित्र प्रयत्नशील आहे. भाजपचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे आहेत. राजनाथसिंह यांच्यापासून अनेक भाजप नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, तरीही ते मोठ्या पदांवर आहेत. कॉँग्रेसच्या अशा वादग्रस्त मंत्र्यांना आणि पदाधिकाऱ्यांना तात्काळ राजीनामे द्यावे लागले होते. हा फरक आता लोकांना कळला आहे, असे ते म्हणाले. पतंगराव कदम म्हणाले की, सांगलीतील एक-दोन उमेदवार राष्ट्रवादीच्या इशाऱ्यावर उभे आहेत. माझ्या मतदारसंघातही भाजपने राष्ट्रवादीला पाठिंबा दिला आहे. कॉँग्रेस उमेदवारांनी आता सभेच्या नादाला जास्त लागू नये. घराघरात पोहोचणे महत्त्वाचे आहे. लोकसभेला जे झाले त्याची पुनरावृत्ती नको, असे आवाहन कदम यांनी केले. मदन पाटील म्हणाले की, देवाने शेवटी आमचे गाऱ्हाणे ऐकले आणि आघाडी तुटली. ती जत्रा आमच्याबरोबर नकोच होती. सगळे पक्ष आपसात लढत असल्याने आता प्रत्येकाचीच ताकद कळणार आहे. ज्यांना गुंठेवारी माहीत नाही, लोकांचे प्रश्न माहीत नाहीत, झोपडपट्टी आणि सामान्य माणसांशी ज्यांचा संवाद नाही, असा उमेदवार भाजपने दिला आहे. यावेळी उपमहापौर प्रशांत पाटील-मजलेकर, जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, आनंदराव मोहिते, नामदेवराव मोहिते, सोनिया होळकर-पाटील, राजेश नाईक, किशोर शहा आदी उपस्थित होते. यशवंतराव हाप्पे यांनी स्वागत व प्रास्ताविक, तर लक्ष्मण नवलाई यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)