शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
2
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
3
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
4
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
5
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
6
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
7
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
8
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
9
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
10
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
11
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
12
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
13
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
14
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
15
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
16
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
17
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
18
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
19
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
20
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?

उद्धव ठाकरेंनी कधी विधानसभा पाहिली तरी आहे का? : राणे

By admin | Updated: October 4, 2014 23:51 IST

सांगलीत कॉँग्रेसची सभा : राष्ट्रवादीसह भाजप, शिवसेनेवर टीकास्त्र

सांगली : भाजप आणि शिवसेना नेत्यांना आतापासूनच मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पडू लागली आहेत. उध्दव ठाकरेंना विधानसभा तरी माहीत आहे का? विधानसभेत किती विभाग असतात, याचीही त्यांना कल्पना नाही. तरीही असे लोक आता मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पाहू लागले आहेत, अशी टीका काँग्रेसचे प्रचारप्रमुख नारायण राणे यांनी शनिवारी सांगलीतील सभेत केली.कॉँग्रेसचे सांगलीतील उमेदवार मदन पाटील यांच्या प्रचार प्रारंभाची सभा सांगलीत वसंतदादा समाधीस्थळी पार पडली. यावेळी माजी वनमंत्री पतंगराव कदम, माजी मंत्री प्रतीक पाटील, अभिनेत्री नगमा, महापौर कांचन कांबळे उपस्थित होते. राणे म्हणाले की, मंडप नाही, नवरीचा पत्ता नाही आणि भाजप, सेनेचे नेते गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. शिवसेनेने ४८ वर्षे केवळ मराठी माणूस आणि मुंबईच्या जोरावर दुकानदारी केली. भाजपमधील नेत्यांना मराठीत शुद्ध बोलताही येत नाही. महाराष्ट्रात एकही लायक नेता भाजपकडे नसल्याने त्यांच्या जाहिरातींवर केवळ मोदीच दिसत आहेत. भाजपचे नेते किती धुतल्या तांदळासारखे आहेत, त्याची मला चांगली कल्पना आहे. मी मुख्यमंत्री असताना माझ्या मंत्रिमंडळात ते होतेच. असे स्वार्थी लोक आता लोकांची दिशाभूल करीत आहेत. स्वतंत्र महाराष्ट्राच्या स्थापनेवेळी मोरारजी देसाई यांचा मुंबई गुजरातला जोडण्याचा प्रयत्न होता. राज्यातील १०५ हुतात्म्यांच्या बलिदानामुळे मुंबई महाराष्ट्रात राहिली. त्यावेळी मुंबई मिळाली नाही म्हणून आता पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्याचे षड्यंत्र रचत आहेत. मुंबई बंदरावरील व्यापार गुजरातला स्थलांतरित झाला आहे. रिझर्व्ह बॅँकेच्या मुंबईतील तीन शाखा त्यांनी दिल्लीला स्थलांतरित केल्या. गुंतवणूकदारांनाही गुजरातमध्ये जाण्यास सांगितले जात आहे. एकप्रकारे मुंबईचे आर्थिक खच्चीकरण करण्याचा हा डाव आहे. आता मुंबईतील ७५ हजार कोटी रुपयांची १८०० एकर जमीन घेण्यासाठी गुजरातमधील उद्योजक असलेला मोदींचा एक मित्र प्रयत्नशील आहे. भाजपचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे आहेत. राजनाथसिंह यांच्यापासून अनेक भाजप नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, तरीही ते मोठ्या पदांवर आहेत. कॉँग्रेसच्या अशा वादग्रस्त मंत्र्यांना आणि पदाधिकाऱ्यांना तात्काळ राजीनामे द्यावे लागले होते. हा फरक आता लोकांना कळला आहे, असे ते म्हणाले. पतंगराव कदम म्हणाले की, सांगलीतील एक-दोन उमेदवार राष्ट्रवादीच्या इशाऱ्यावर उभे आहेत. माझ्या मतदारसंघातही भाजपने राष्ट्रवादीला पाठिंबा दिला आहे. कॉँग्रेस उमेदवारांनी आता सभेच्या नादाला जास्त लागू नये. घराघरात पोहोचणे महत्त्वाचे आहे. लोकसभेला जे झाले त्याची पुनरावृत्ती नको, असे आवाहन कदम यांनी केले. मदन पाटील म्हणाले की, देवाने शेवटी आमचे गाऱ्हाणे ऐकले आणि आघाडी तुटली. ती जत्रा आमच्याबरोबर नकोच होती. सगळे पक्ष आपसात लढत असल्याने आता प्रत्येकाचीच ताकद कळणार आहे. ज्यांना गुंठेवारी माहीत नाही, लोकांचे प्रश्न माहीत नाहीत, झोपडपट्टी आणि सामान्य माणसांशी ज्यांचा संवाद नाही, असा उमेदवार भाजपने दिला आहे. यावेळी उपमहापौर प्रशांत पाटील-मजलेकर, जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, आनंदराव मोहिते, नामदेवराव मोहिते, सोनिया होळकर-पाटील, राजेश नाईक, किशोर शहा आदी उपस्थित होते. यशवंतराव हाप्पे यांनी स्वागत व प्रास्ताविक, तर लक्ष्मण नवलाई यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)