शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: मुंबई हायकोर्टातील आजचे कामकाज संपले; उद्या दुपारी ३ वाजता पुन्हा सुनावणी
2
हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबत मसुदा तयार, पण...; राधाकृष्ण विखे पाटील यांची महत्त्वाची माहिती
3
Maratha Morcha : मुख्यमंत्री साहेब, तुमच्या हातातली वेळ गेलेली नाही, महाराष्ट्र मुंबईत यायला निघण्याआधी निर्णय घ्या; मनोज जरांगेंचा इशारा
4
तुम्हीही तुमच्या पगारवाढीचा हिशोब लावताय? वेतनवाढ कशी ठरते? संपूर्ण गणित सोप्या भाषेत समजून घ्या
5
Manoj Jarange Patil: "माझ्या पोरांवर दादागिरी करायची नाही, एकालाही काठी लावली तर मुंबईसह महाराष्ट्र बंद करू"
6
चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांची आवडती कार, मोदींनीही केली सफर! 'लाल झेंडा' असलेल्या 'या' गाडीत खास काय?
7
भारतात रस्ते अपघातात दर तासाला २० जणांचा मृत्यू, अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती
8
GST कमी झाल्यास, किती स्वस्त होऊ शकते मोस्ट-सेलिंग Maruti Ertiga? किती रुपयांचा होऊ शकतो फायदा? जाणून घ्या
9
'आरक्षण बचाव'ची मागणी, मराठा आंदोलनाचे केंद्रबिंदू अंतरवाली सराटीत ओबीसींचे उपोषण
10
मराठा आंदोलन: शिंदे गटाचे अर्जुन खोतकर आझाद मैदानात, घेतली मनोज जरांगेंची भेट; म्हणाले... 
11
Mumbai Local: मराठा आंदोलनामुळे मुंबईची लाईफलाईन खोळंबली! सीएसएमटी स्टेशनवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त
12
"राष्ट्रीय पुरस्कार, आपली अपूर्ण इच्छा पूर्ण झाली...", किंग खानने राणीसोबत केलं रील, चाहते खूश
13
मराठा आंदोलन: सुट्टी असूनही मुंबई हायकोर्ट उघडले; जरांगेंविरोधातील याचिकेवर तातडीची सुनावणी
14
चीनमध्ये भारताचा पाकिस्तानला धक्का! SCO च्या जाहीरनाम्यात पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा एकमताने निषेध
15
येत्या रविवारी खग्रास चंद्रग्रहण; 'या' वेळेत दिसणार अद्भुत लाल चंद्र! भारतातूनही पाहता येणार
16
पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण सुरुच राहणार; इथेनॉलमुक्त पेट्रोलची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
17
सीएसएमटी स्टेशनवर मराठा आंदोलकांची प्रचंड गर्दी; लोकल ट्रेनच्या गार्ड केबिनमध्ये घुसले आंदोलक
18
लेडी कंडक्टरला तब्बल ६१५९ कॉल, ३१५ मेसेज; ‘तो’ म्हणाला, ‘माझ्याशी लग्न कर नाहीतर…'
19
ओलाचा शेअर रॉकेट बनला, ३० दिवसांत ४७% परतावा दिला; पाडला पैशांचा पाऊस; कारण काय?
20
"रशिया-भारत खांद्याला खांदा लावून प्रगती करतायत..."; PM मोदी आणि पुतिन यांच्यात दीर्घ चर्चा

विकासाभिमुख नेतृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:22 IST

प्रदीर्घ काळ संघर्षाची वाट चालत असताना, विकासकामांशी असलेले नाते कधीही न तोडण्याची सवय संजयकाका पाटील यांनी अंगिकारली. त्यामुळे अपयशाचे ...

प्रदीर्घ काळ संघर्षाची वाट चालत असताना, विकासकामांशी असलेले नाते कधीही न तोडण्याची सवय संजयकाका पाटील यांनी अंगिकारली. त्यामुळे अपयशाचे अनेक अडथळे पार करीत वाटेवर यशाचा सुगंधी बहरही त्यांनी स्वकर्तृत्वाने फुलविला. हा बहर कालांतराने विकासकामांतून सामान्य जनतेच्या घरांमध्येही दरवळू लागला. पदे मिळाली की जनतेची साथ सोडणाऱ्या अनेक राजकारण्यांच्या पंक्तीत न बसता संजयकाकांनी पदांचा उपयोग जिल्ह्याच्या विकासकामांसाठी कसा होईल, याचा विचार केला. सभागृहात लांबलचक व प्रभावशाली भाषणे झाडण्यापेक्षा विविध खात्यांच्या मंत्र्यांशी सुसंवाद साधून त्यांच्याकडून जिल्ह्यासाठी काही तरी विकासकामे पदरात पाडून घेण्याची भूमिका त्यांनी स्वीकारली. त्यामुळे गेल्या साडेचार वर्षांत सिंचन, उद्योग, रेल्वे, महामार्ग अशा विविध विभागांतील निधी मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यात आणण्यात त्यांना यश आले. ड्रायपोर्टसाठी त्यांनी केलेले भरीव प्रयत्न जिल्ह्याच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील विकासाची नांदी ठरणार आहे.

खासदार म्हणून त्यांनी केलेल्या कामांचा धडाका जिल्ह्यातील नागरिकांनी अनुभवला असला तरी, अडचणीत सापडलेल्या जिल्ह्यातील नागरिकांना भावनिक साथ देण्याचे कामही त्यांनी केले. अपघातात मृत झालेल्या पैलवानांच्या कुटुंबीयांना मदतीसाठी त्यांनी केलेली भावनिक धडपडही लोकांना भावली. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यानंतर त्यांच्या बांधापर्यंत जाऊन अश्रू पुसण्याचे कामही संजयकाका पाटील यांनी केले. शेतकरी या घटकाशी सर्वांत जास्त जोडलेले नेतृत्व म्हणूनही त्यांना ओळखले जाते. शेतीचा विकास हा सर्वस्वी सिंचनावरच अवलंबून असल्यामुळे रखडलेल्या सिंचन योजनांना हत्तीचे बळ देऊन कार्यान्वित करण्याचे काम त्यांनी केले.

टीका करण्यापेक्षा कामातून नाती जोडण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळेच अल्पावधीत जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत त्यांच्या कामाचा डंका वाजला. कामाचा गाजावाजा करण्यापेक्षा लोकांपर्यंत ती माहिती पोहोचविण्याचे काम त्यांनी केले. ज्या कामासाठी लोकांनी निवडून दिले, त्या कामाची पूर्तता करण्याचेच ध्येय बाळगून त्यांनी धडपड केली. नावाला वचननामे करून निवडणुकीची औपचारिकता पार पाडणाऱ्या राजकारण्यांपेक्षा वचननामे पूर्ण करून पुन्हा तितक्याच आत्मविश्वासाने लोकांसमोर जाणे त्यांनी पसंत केले.

लोकप्रतिनिधी म्हणून संजयकाका पाटील यांनी सामान्य लोकांशी व विविध क्षेत्रांतील लोकांशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवले. मतदारसंघातील असे एकही गाव नसेल, जिथे संजयकाका पोहोचले नाहीत. भेटायला येणाऱ्या प्रत्येकाच्या सुख-दु:खाची चौकशी करून, त्यांच्यासोबत असल्याचे सांगत त्यांना आधार देण्याची त्यांची शैली अनेकांना भावते. त्यांची सलगी जशी सामान्य माणसाशी आहे, तशीच ती पक्षीय पातळीवरील सर्व नेत्यांशीही आहे.

राज्य आणि केंद्रातील अनेक मंत्री, पक्षाचे प्रमुख नेते, पदाधिकारी यांच्या दालनात थेट जाऊन कोणत्याही प्रश्नाबाबत चर्चा करण्याचा हक्क ते अबाधित ठेवून आहेत. अविश्रांतपणे विकासकामांसाठी ते धडपड करीत राहिल्याने जनतेच्या पदरात बरेच काही पडले. सिंचनाचा आज जो काही हिरवागार व जलमय परिणाम दुष्काळी भागात दिसत आहे, त्यामागे संजयकाकांची धडपड आहे.

पुणे-मिरज-लोंढा रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण, मिरज रेल्वेस्थानकावर लोकोमोटिव्ह वर्कशॉप विकसित करण्याबाबत आणि सांगली रेल्वेस्थानक येथे नवीन पिटलाईन तयार करण्याबाबतची मागणी संजयकाका पाटील यांनी महाप्रबंधक एस. के. शर्मा यांच्याकडे करून सातत्याने त्यासाठीचा पाठपुरावा सुरू ठेवला. रेल्वेसंबंधी अनेक प्रश्न मार्गी लावताना जिल्ह्यातील रेल्वेसेवा अधिकाधिक विकसित करण्यावरही त्यांनी भर दिला.

गतीने धावणाऱ्या एखाद्या एक्स्प्रेसप्रमाणेच जिल्ह्यात विकासकामांच्या रुळांची उभारणी करून त्यावरून सातत्याने गतीने धावणारी एक्स्प्रेस म्हणूनच संजयकाकांची ओळख होत आहे.

- संतोष आठवले