शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

शेतीमालास दर मिळाल्याशिवाय विकास अशक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 23:48 IST

कडेपूर : आज सर्वजण शेतीमालास योग्य भाव द्यावा अशी मागणी करत आहेत. शेती उत्पादनाचे भाव ठरलेले आहेत. मात्र शेतकºयाकडे जेंव्हा माल असतो, तेव्हा सगळ्या शेतीमालाचे भाव पडलेले असतात, हा अनुभव आहे. जोपर्यंत शेतकरी शेतीमालास किफायतशीर दर देत नाहीत, तोपर्यंत देशाचा खºयाअर्थाने विकास होणार नाही, असे प्रतिपादन विधिमंडळातील ज्येष्ठ सदस्य आमदार ...

कडेपूर : आज सर्वजण शेतीमालास योग्य भाव द्यावा अशी मागणी करत आहेत. शेती उत्पादनाचे भाव ठरलेले आहेत. मात्र शेतकºयाकडे जेंव्हा माल असतो, तेव्हा सगळ्या शेतीमालाचे भाव पडलेले असतात, हा अनुभव आहे. जोपर्यंत शेतकरी शेतीमालास किफायतशीर दर देत नाहीत, तोपर्यंत देशाचा खºयाअर्थाने विकास होणार नाही, असे प्रतिपादन विधिमंडळातील ज्येष्ठ सदस्य आमदार गणपतराव देशमुख यांनी केले.हणमंतवडिये (ता. कडेगाव) येथे पनवेलचे माजी आमदार विवेक पाटील यांना क्रांतिवीर भाई भगवानराव पाटील सामाजिक पुरस्कार प्रदान कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. आमदार मोहनराव कदम, आमदार बाळासाहेब पाटील, वैभव नायकवडी, क्रांतिवीरांगना हौसाताई पाटील प्रमुख उपस्थित होते.यावेळी गणपतराव देशमुख म्हणाले, भगवानराव पाटील यांनी स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतर आपले संपूर्ण आयुष्य शेतकरी, कष्टकरी, दलितांसाठी जगले. शेतकरी व कामगारांच्या जीवनामध्ये बदल झाला पाहिजे, यासाठी नवा विचार देण्याचे काम केले. जोपर्यंत शेतकरी शेतीमालास किफायतशीर दर देत नाहीत, तोपर्यंत देशाचा खºयाअर्थाने विकास होणार नाही.आ. मोहनराव कदम म्हणाले, भगवानराव पाटील यांचे कार्य मोठे होते. त्यांच्या कार्याची माहिती भावी पिढीस होण्यासाठी त्यांचा पुतळा आणि स्मारक उभे राहणे गरजेचे आहे. सत्कारमूर्ती माजी आमदार विवेक पाटील म्हणाले, या पुरस्कारामुळे माझ्या भावी जीवनासाठी आदर्शवादी जीवन जगण्यास स्फूर्ती मिळेल. विरोधात राहूनही लोकांची कामे चांगल्या पध्दतीने करू शकतो, हे मी दाखवून दिले आहे. जशी स्वातंत्र्यपूर्व काळात परिस्थिती होती, तशीच परिस्थिती आज देशात सुरू आहे. या व्यवस्थेविरूध्द लढण्यासाठी तरूण पिढीने संघर्ष करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.आमदार बाळासाहेब पाटील, वैभव नायकवडी, जयराम मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. विश्वनाथ गायकवाड यांनी मानपत्र वाचन केले. विद्यार्थी किमया पाटील आणि उत्कर्ष पाटील यांनी गीत सादर केले.कार्यक्रमास अंधकवी चंद्रकांत देशमुखे, संपतराव पवार, खानापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रतापराव साळुंखे, शेकापचे जिल्हाध्यक्ष शरद पाटील, आनंदराव पाटील, आत्माराम मोरे, भीमराव मोरे, इंद्रजित पाटील, सदानंद माळी, रघुराज मेटकरी, दमयंती पाटील उपस्थित होते. अ‍ॅड. सुभाष पाटील यांनी स्वागत केले. सागर पाटील यांनी आभार मानले.