शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
3
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
4
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
5
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
6
५० एकरहून जास्त भूखंडांवर क्लस्टर रिडेव्हलपमेंट प्रकल्प; उपमुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा
7
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
8
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
9
झोपडपट्ट्यांत मूल विकणाऱ्या टोळ्या सक्रिय; हरवलेल्या मुलांच्या शोधासाठी 'ऑपरेशन मुस्कान'
10
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
11
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
12
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
13
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
14
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
15
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
16
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
17
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
18
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
19
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
20
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
Daily Top 2Weekly Top 5

शेतीमालास दर मिळाल्याशिवाय विकास अशक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 23:48 IST

कडेपूर : आज सर्वजण शेतीमालास योग्य भाव द्यावा अशी मागणी करत आहेत. शेती उत्पादनाचे भाव ठरलेले आहेत. मात्र शेतकºयाकडे जेंव्हा माल असतो, तेव्हा सगळ्या शेतीमालाचे भाव पडलेले असतात, हा अनुभव आहे. जोपर्यंत शेतकरी शेतीमालास किफायतशीर दर देत नाहीत, तोपर्यंत देशाचा खºयाअर्थाने विकास होणार नाही, असे प्रतिपादन विधिमंडळातील ज्येष्ठ सदस्य आमदार ...

कडेपूर : आज सर्वजण शेतीमालास योग्य भाव द्यावा अशी मागणी करत आहेत. शेती उत्पादनाचे भाव ठरलेले आहेत. मात्र शेतकºयाकडे जेंव्हा माल असतो, तेव्हा सगळ्या शेतीमालाचे भाव पडलेले असतात, हा अनुभव आहे. जोपर्यंत शेतकरी शेतीमालास किफायतशीर दर देत नाहीत, तोपर्यंत देशाचा खºयाअर्थाने विकास होणार नाही, असे प्रतिपादन विधिमंडळातील ज्येष्ठ सदस्य आमदार गणपतराव देशमुख यांनी केले.हणमंतवडिये (ता. कडेगाव) येथे पनवेलचे माजी आमदार विवेक पाटील यांना क्रांतिवीर भाई भगवानराव पाटील सामाजिक पुरस्कार प्रदान कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. आमदार मोहनराव कदम, आमदार बाळासाहेब पाटील, वैभव नायकवडी, क्रांतिवीरांगना हौसाताई पाटील प्रमुख उपस्थित होते.यावेळी गणपतराव देशमुख म्हणाले, भगवानराव पाटील यांनी स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतर आपले संपूर्ण आयुष्य शेतकरी, कष्टकरी, दलितांसाठी जगले. शेतकरी व कामगारांच्या जीवनामध्ये बदल झाला पाहिजे, यासाठी नवा विचार देण्याचे काम केले. जोपर्यंत शेतकरी शेतीमालास किफायतशीर दर देत नाहीत, तोपर्यंत देशाचा खºयाअर्थाने विकास होणार नाही.आ. मोहनराव कदम म्हणाले, भगवानराव पाटील यांचे कार्य मोठे होते. त्यांच्या कार्याची माहिती भावी पिढीस होण्यासाठी त्यांचा पुतळा आणि स्मारक उभे राहणे गरजेचे आहे. सत्कारमूर्ती माजी आमदार विवेक पाटील म्हणाले, या पुरस्कारामुळे माझ्या भावी जीवनासाठी आदर्शवादी जीवन जगण्यास स्फूर्ती मिळेल. विरोधात राहूनही लोकांची कामे चांगल्या पध्दतीने करू शकतो, हे मी दाखवून दिले आहे. जशी स्वातंत्र्यपूर्व काळात परिस्थिती होती, तशीच परिस्थिती आज देशात सुरू आहे. या व्यवस्थेविरूध्द लढण्यासाठी तरूण पिढीने संघर्ष करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.आमदार बाळासाहेब पाटील, वैभव नायकवडी, जयराम मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. विश्वनाथ गायकवाड यांनी मानपत्र वाचन केले. विद्यार्थी किमया पाटील आणि उत्कर्ष पाटील यांनी गीत सादर केले.कार्यक्रमास अंधकवी चंद्रकांत देशमुखे, संपतराव पवार, खानापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रतापराव साळुंखे, शेकापचे जिल्हाध्यक्ष शरद पाटील, आनंदराव पाटील, आत्माराम मोरे, भीमराव मोरे, इंद्रजित पाटील, सदानंद माळी, रघुराज मेटकरी, दमयंती पाटील उपस्थित होते. अ‍ॅड. सुभाष पाटील यांनी स्वागत केले. सागर पाटील यांनी आभार मानले.