शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

शेतीमालास दर मिळाल्याशिवाय विकास अशक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 23:48 IST

कडेपूर : आज सर्वजण शेतीमालास योग्य भाव द्यावा अशी मागणी करत आहेत. शेती उत्पादनाचे भाव ठरलेले आहेत. मात्र शेतकºयाकडे जेंव्हा माल असतो, तेव्हा सगळ्या शेतीमालाचे भाव पडलेले असतात, हा अनुभव आहे. जोपर्यंत शेतकरी शेतीमालास किफायतशीर दर देत नाहीत, तोपर्यंत देशाचा खºयाअर्थाने विकास होणार नाही, असे प्रतिपादन विधिमंडळातील ज्येष्ठ सदस्य आमदार ...

कडेपूर : आज सर्वजण शेतीमालास योग्य भाव द्यावा अशी मागणी करत आहेत. शेती उत्पादनाचे भाव ठरलेले आहेत. मात्र शेतकºयाकडे जेंव्हा माल असतो, तेव्हा सगळ्या शेतीमालाचे भाव पडलेले असतात, हा अनुभव आहे. जोपर्यंत शेतकरी शेतीमालास किफायतशीर दर देत नाहीत, तोपर्यंत देशाचा खºयाअर्थाने विकास होणार नाही, असे प्रतिपादन विधिमंडळातील ज्येष्ठ सदस्य आमदार गणपतराव देशमुख यांनी केले.हणमंतवडिये (ता. कडेगाव) येथे पनवेलचे माजी आमदार विवेक पाटील यांना क्रांतिवीर भाई भगवानराव पाटील सामाजिक पुरस्कार प्रदान कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. आमदार मोहनराव कदम, आमदार बाळासाहेब पाटील, वैभव नायकवडी, क्रांतिवीरांगना हौसाताई पाटील प्रमुख उपस्थित होते.यावेळी गणपतराव देशमुख म्हणाले, भगवानराव पाटील यांनी स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतर आपले संपूर्ण आयुष्य शेतकरी, कष्टकरी, दलितांसाठी जगले. शेतकरी व कामगारांच्या जीवनामध्ये बदल झाला पाहिजे, यासाठी नवा विचार देण्याचे काम केले. जोपर्यंत शेतकरी शेतीमालास किफायतशीर दर देत नाहीत, तोपर्यंत देशाचा खºयाअर्थाने विकास होणार नाही.आ. मोहनराव कदम म्हणाले, भगवानराव पाटील यांचे कार्य मोठे होते. त्यांच्या कार्याची माहिती भावी पिढीस होण्यासाठी त्यांचा पुतळा आणि स्मारक उभे राहणे गरजेचे आहे. सत्कारमूर्ती माजी आमदार विवेक पाटील म्हणाले, या पुरस्कारामुळे माझ्या भावी जीवनासाठी आदर्शवादी जीवन जगण्यास स्फूर्ती मिळेल. विरोधात राहूनही लोकांची कामे चांगल्या पध्दतीने करू शकतो, हे मी दाखवून दिले आहे. जशी स्वातंत्र्यपूर्व काळात परिस्थिती होती, तशीच परिस्थिती आज देशात सुरू आहे. या व्यवस्थेविरूध्द लढण्यासाठी तरूण पिढीने संघर्ष करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.आमदार बाळासाहेब पाटील, वैभव नायकवडी, जयराम मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. विश्वनाथ गायकवाड यांनी मानपत्र वाचन केले. विद्यार्थी किमया पाटील आणि उत्कर्ष पाटील यांनी गीत सादर केले.कार्यक्रमास अंधकवी चंद्रकांत देशमुखे, संपतराव पवार, खानापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रतापराव साळुंखे, शेकापचे जिल्हाध्यक्ष शरद पाटील, आनंदराव पाटील, आत्माराम मोरे, भीमराव मोरे, इंद्रजित पाटील, सदानंद माळी, रघुराज मेटकरी, दमयंती पाटील उपस्थित होते. अ‍ॅड. सुभाष पाटील यांनी स्वागत केले. सागर पाटील यांनी आभार मानले.