शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
2
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
3
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
4
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
5
आयसीसीनं लॉरावर केली मर्जी बहाल! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतवर अन्याय?
6
उत्पन्न वाढीसाठी एसटी रिटेल इंधन विक्री करणार, निविदा प्रक्रिया सुरू, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती 
7
एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बांगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग
8
Relationship Tips: भांडणानंतर बायको रडत राहते आणि नवरा झोपी जातो, असे का?
9
महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
10
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
11
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
12
Astro Tips: कडक मंगळाची पत्रिका म्हणजे नेमके काय? ती व्यक्ती तापदायकच असते का? वाचा 
13
‘एक बुथ, १० युथ’ या सुत्रानुसार युवक काँग्रेसने काम करा, जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवा, नसीम खान यांचं आवाहन
14
Mumbai: "जेवण का आणलं नाही?" रूममेट्सकडून टॅक्सी ड्रायव्हरची हत्या, साकीनाका येथील घटना!
15
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
16
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
17
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
18
रागाच्या भरात परेश रावल यांनी चक्क केली होती हाणामारी! म्हणाले, "एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड..."
19
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
20
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो

पलूस एमआयडीसीचा विकास खुंटला

By admin | Updated: January 15, 2015 23:19 IST

राजकर्त्यांसह प्रशासनाचेही दुर्लक्ष : उद्योग वाढविण्यासाठी जागाच नसल्याचा परिणाम

किरण सावंत - किर्लोस्करवाडी -पलूस औद्योगिक वसाहतीमध्ये (एमआयडीसी) जागेची पुरेशी उपलब्धता नसल्यामुळे उद्योजकांना उद्योग वाढविण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. यातूनच विकास खुंटला आहे. या प्रश्नांवर शासनाकडे तक्रारी दाखल करूनही दखल घेतली जात नाही. उद्योगमंत्री प्रकाश मेहता यांनी लक्ष घालून जागेची उपलब्धता करुन देण्याची मागणी उद्योजकांकडून होत आहे.पलूस औद्योगिक वसाहत सांगली जिल्ह्यातीलच नव्हे, तर पश्चिम महाराष्ट्रातील नावाजलेली औद्योगिक वसाहत आहे. किर्लोस्कर कारखान्यामुळे पलूसची एमआयडीसी देशपातळीवर लौकिकप्राप्त ठरलेली आहे. पलूसच्या या औद्योगिक वसाहतीची स्थापना १९७५ मध्ये झाली. ३५ एकर क्षेत्रावर ही औद्योगिक वसाहत भरभराटीस आली आहे. अनेक संकटांवर मात करीत प्रगती केली आहे. किर्लोस्कर उद्योग समूहाने त्यांना केवळ मार्गदर्शनच नव्हे, तर त्यांच्या उद्योगाला कामसुध्दा दिले. उद्योजकतेची गुणवत्ता असणाऱ्या या सेवानिवृत्त तरुण होतकरुंना काम मिळाल्याने त्यांनी संधीचे सोने केले. परंतु उद्योगास चालना मिळाल्याने किर्लोस्करांकडून मिळणाऱ्या कामावर अवलंबून न राहता, येथील अनेक उद्योजकांनी अन्य राज्यांतून काम उपलब्ध करण्यात यश मिळविले. या प्रगतशील एमआयडीसीला पुरेशा दाबाने अखंड वीजपुरवठा करुन सहकार्य केले. भारनियमन नसल्याने येथील उद्योजक पूर्ण क्षमतेने उत्पादन घेताना दिसतात. त्यापैकी १६७ उद्योग पूर्ण क्षमतेने चालू आहेत. आज सर्व उद्योगात मिळून ४ हजार २00 कामगार उदरनिर्वाह करीत आहेत. प्रगत आणि आधुनिकतेवर आधारलेली एमआयडीसी म्हणून दबदबा असला तरी, येथील असंख्य तरुण उद्योजक जागेअभावी आपला उद्योग सुरु करत करू शकत नाहीत. शिवाय, सध्याचा उद्योग वाढवण्यातही उद्योजकांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. पलूसच्या जवळच गे्रप वाईनसाठी आरक्षित जागा असून, तेथील प्लॉट देण्याची उद्योजकांची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. परंतु, याकडे शासन आणि राजकर्ते गांभीर्याने लक्ष देत नसल्यामुळे उद्योजकांतून नाराजी व्यक्त होत आहे.सांडगेवाडीची जागा देण्याची मागणीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे खासदार संजय पाटील यांनी प्रयत्न करून सांडगेवाडी येथील कृष्णा वाईन पार्कमधील प्लॉट पलूसमधील तरुण उद्योजकांना उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी येथील सर्व उद्योजक नवीन सरकारकडे करीत आहेत.जुन्या सरकारने लक्ष दिले नाही, आता नवीन सरकारमधील उद्योगमंत्री तरी लक्ष देतील का? असा प्रश्न उद्योजकांतून उपस्थित होत आहे.