शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पलूस एमआयडीसीचा विकास खुंटला

By admin | Updated: January 15, 2015 23:19 IST

राजकर्त्यांसह प्रशासनाचेही दुर्लक्ष : उद्योग वाढविण्यासाठी जागाच नसल्याचा परिणाम

किरण सावंत - किर्लोस्करवाडी -पलूस औद्योगिक वसाहतीमध्ये (एमआयडीसी) जागेची पुरेशी उपलब्धता नसल्यामुळे उद्योजकांना उद्योग वाढविण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. यातूनच विकास खुंटला आहे. या प्रश्नांवर शासनाकडे तक्रारी दाखल करूनही दखल घेतली जात नाही. उद्योगमंत्री प्रकाश मेहता यांनी लक्ष घालून जागेची उपलब्धता करुन देण्याची मागणी उद्योजकांकडून होत आहे.पलूस औद्योगिक वसाहत सांगली जिल्ह्यातीलच नव्हे, तर पश्चिम महाराष्ट्रातील नावाजलेली औद्योगिक वसाहत आहे. किर्लोस्कर कारखान्यामुळे पलूसची एमआयडीसी देशपातळीवर लौकिकप्राप्त ठरलेली आहे. पलूसच्या या औद्योगिक वसाहतीची स्थापना १९७५ मध्ये झाली. ३५ एकर क्षेत्रावर ही औद्योगिक वसाहत भरभराटीस आली आहे. अनेक संकटांवर मात करीत प्रगती केली आहे. किर्लोस्कर उद्योग समूहाने त्यांना केवळ मार्गदर्शनच नव्हे, तर त्यांच्या उद्योगाला कामसुध्दा दिले. उद्योजकतेची गुणवत्ता असणाऱ्या या सेवानिवृत्त तरुण होतकरुंना काम मिळाल्याने त्यांनी संधीचे सोने केले. परंतु उद्योगास चालना मिळाल्याने किर्लोस्करांकडून मिळणाऱ्या कामावर अवलंबून न राहता, येथील अनेक उद्योजकांनी अन्य राज्यांतून काम उपलब्ध करण्यात यश मिळविले. या प्रगतशील एमआयडीसीला पुरेशा दाबाने अखंड वीजपुरवठा करुन सहकार्य केले. भारनियमन नसल्याने येथील उद्योजक पूर्ण क्षमतेने उत्पादन घेताना दिसतात. त्यापैकी १६७ उद्योग पूर्ण क्षमतेने चालू आहेत. आज सर्व उद्योगात मिळून ४ हजार २00 कामगार उदरनिर्वाह करीत आहेत. प्रगत आणि आधुनिकतेवर आधारलेली एमआयडीसी म्हणून दबदबा असला तरी, येथील असंख्य तरुण उद्योजक जागेअभावी आपला उद्योग सुरु करत करू शकत नाहीत. शिवाय, सध्याचा उद्योग वाढवण्यातही उद्योजकांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. पलूसच्या जवळच गे्रप वाईनसाठी आरक्षित जागा असून, तेथील प्लॉट देण्याची उद्योजकांची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. परंतु, याकडे शासन आणि राजकर्ते गांभीर्याने लक्ष देत नसल्यामुळे उद्योजकांतून नाराजी व्यक्त होत आहे.सांडगेवाडीची जागा देण्याची मागणीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे खासदार संजय पाटील यांनी प्रयत्न करून सांडगेवाडी येथील कृष्णा वाईन पार्कमधील प्लॉट पलूसमधील तरुण उद्योजकांना उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी येथील सर्व उद्योजक नवीन सरकारकडे करीत आहेत.जुन्या सरकारने लक्ष दिले नाही, आता नवीन सरकारमधील उद्योगमंत्री तरी लक्ष देतील का? असा प्रश्न उद्योजकांतून उपस्थित होत आहे.