शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत काँग्रेस नेत्यांचा एकजुटीचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 00:03 IST

सांगली : पक्षांतर्गत नेत्यांमधील गटबाजी कृष्णा नदीच्या पात्रात बुडवून एकसंधपणे महापालिका निवडणूक लढविण्याची जोरदार मागणी बुधवारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षीय बैठकीत केली. त्याची गंभीर दखल घेत काँग्रेस नेत्यांनीही गटबाजीला तिलांजली देत एकजुटीचा निर्धार व्यक्त केला.येथील कच्छी जैन भवनात महापालिका क्षेत्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम ...

सांगली : पक्षांतर्गत नेत्यांमधील गटबाजी कृष्णा नदीच्या पात्रात बुडवून एकसंधपणे महापालिका निवडणूक लढविण्याची जोरदार मागणी बुधवारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षीय बैठकीत केली. त्याची गंभीर दखल घेत काँग्रेस नेत्यांनीही गटबाजीला तिलांजली देत एकजुटीचा निर्धार व्यक्त केला.येथील कच्छी जैन भवनात महापालिका क्षेत्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, काँग्रेसच्या राष्टÑीय कार्यकारिणी सदस्या जयश्रीताई पाटील, महापौर हारुण शिकलगार, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, पक्षाचे प्रभारी प्रकाश सातपुते, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, महापालिकेचे गटनेते किशोर जामदार उपस्थित होते. पृथ्वीराज पाटील यांनी या बैठकीत सर्वच नेत्यांना एकत्रीत आणले. तरीही कार्यकर्त्यांनी पक्षातील गटबाजीवरच आक्षेप नोंदविले. कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करून व्यासपीठावरील नेत्यांनी, महापालिका निवडणुकीत आम्ही सारे नेते एकत्र राहू, असे सांगून, एकजुटीने काम करण्याचे आश्वासन दिले.विश्वजित कदम म्हणाले की, माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम आणि मदनभाऊ पाटील या दोन दिग्गज नेत्यांच्या अनुपस्थितीत महापालिकेची निवडणूक होत असल्याने काँग्रेसची सर्वच नेतेमंडळी निवडणुकीबाबत गंभीर आहेत. या दोन्ही नेत्यांचे महापालिका जिंकण्याचे स्वप्न साकार करायचे आहे. आपसात मतभेद करण्याची ही वेळच नाही. प्रभागनिहाय आम्ही लवकरच भेटीगाठीचा कार्यक्रम सुरू करणार आहोत. त्यावेळी काँग्रेसमधील सर्वच नेते एकत्र दिसतील. महापालिका निवडणुका तोंडावर आल्याने जाणीवपूर्वक काही लोक काँग्रेसअंतर्गत गटबाजीबद्दल अफवा पसरवित आहेत. कार्यकर्त्यांनीही अशा गोष्टींकडे लक्ष देऊ नये. नेत्यांमध्ये मतभेद आहेत, असे भासवून कुणी गैरफायदा घेण्याचा प्रयत्नही करू नये. असे प्रकार खपवून घेणार नाही.जयश्रीताई पाटील म्हणाल्या की, पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांमध्ये आता कोणतेही वाद नाहीत. दोन मोठ्या नेत्यांच्या निधनानंतर महापालिकेची निवडणूक आता कार्यकर्त्यांची लढाई बनली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपल्या या नेत्यांसाठी एकसंधपणे लढायचे आहे. कोणावरही अन्याय आम्ही होऊ देणार नाही.प्रकाश सातपुते म्हणाले की, संपूर्ण राज्याचे लक्ष आता सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीकडे लागले आहे. महाराष्टÑाच्या राजकारणात प्रचंड उलथापालथ झाल्यानंतरही काँग्रेसचा बालेकिल्ला असणाºया नांदेड महापालिकेत काँग्रेस जिंकली. आता सांगली महापालिकेच्या निवडणुकीतही काँग्रेसचाच विजय निश्चित आहे. त्यासाठी नेत्यांनी एकसंधपणे लढावे, असे मलाही वाटते.पृथ्वीराज पाटील म्हणाले की, महापालिकेची निवडणूक सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन लढली जाणार आहे. त्यामुळेच त्यांच्या भावना ऐकून घेण्यासाठी बैठकीचे आयोजन केले आहे. लोकशाही मानणारा आपला पक्ष आहे. येणाºया महापालिका निवडणुकीत कॉँग्रेसची सत्ता अबाधित ठेवताना शहरातील उर्वरित प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.हाफिजभार्इंचा विसर नको!एका कार्यकर्त्याने उपस्थित नेत्यांचे स्टेजवरील फलकाकडे लक्ष वेधले. मिरजेचे माजी आमदार हाफिज धत्तुरे यांचे कॉँग्रेसच्या यशात मोठे योगदान आहे. तरीही व्यासपीठावरील फलकावर त्यांचे छायाचित्रही नाही, याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली. पृथ्वीराज पाटील यांनी लगेचच प्रतिसाद देत पुन्हा अशी चूक होणार नसल्याचे स्पष्ट केले.पाणीपुरवठा प्रकल्पाचे २ रोजी उद्घाटनपक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह अनेक दिग्गज नेते २ मे रोजी सांगली दौºयावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत माळबंगला येथील ७० एमएलडीच्या नव्या पाणीप्रकल्पाचे उद्घाटन व सभा होणार आहे. त्यानंतर ३ रोजी कॉँग्रेस कार्यकर्त्यांचे शिबिर आयोजित केले आहे, अशी माहिती विश्वजित कदम यांनी दिली.