शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

म्हैसाळ योजनेला उदासीनतेचा फटका

By admin | Updated: March 19, 2015 00:01 IST

थकित पाणीपट्टी १५ कोटींवर : वसुलीकडे राज्यकर्ते, प्रशासनाचे दुर्लक्ष

प्रवीण जगताप - लिंगनूर --एकीकडे म्हैसाळ योजनेचे वीजबिल भरून प्रत्यक्ष आवर्तन कधी सुरू होणार, याकडे शेतकरी चातकासारखे डोळे लावून बसला आहे, तर दुसरीकडे मिरज व कवठेमहांकाळ तालुक्यातील हाच लाभार्थी शेतकरी म्हैसाळ योजनेसाठी पाणी मागणी अर्ज देण्यासाठी आणि थकबाकी भरण्याबाबत मात्र उदासीन असल्याचे चित्र आहे. अनेक बैठका घेऊनही महिनाभरात लाभार्थ्यांकडून फक्त १ लाख ८० हजार रुपयांची वसुली झाली आहे, तर किमान अर्ध्या लाभक्षेत्रातून पाण्याच्या मागणीचे (१२ हजार हेक्टर क्षेत्रांतून) अर्ज येणे अपेक्षित असताना, त्यापैकी केवळ २६१ हेक्टर क्षेत्रातील शेतकऱ्यांचे अर्ज खात्याकडे आजअखेर आले आहेत. त्यामुळे शासन, लोकप्रतिनिधी अन् शेतकऱ्यांच्या उदासीनतेच्या विळख्यात म्हैसाळ योजना सापडली आहे की काय? असे दुर्दैवी चित्र निर्माण झाले आहे. दुसरीकडे थकित वीजबिल, थकित पाणीपट्टी, अपुरे म्हैसाळ योजनेचे पाणी मागणी अर्ज असताना, अधिकारी व कर्मचारी वर्ग गावा-गावात व कार्यालयांत हतबल होताना दिसत आहेत. खरंच यंदा पाणी सुटणार, की असाच भाग होरपळणार? याची काळजी दुष्काळी टापूला लागली आहे.गतवर्षीचे संपूर्ण वीज बिलच थकल्याने वीज मंडळाने म्हैसाळ योजनेचा विद्युत पुरवठा बंद केला होता. म्हैसाळ योजनेच्या मागील चार-पाच वर्षांतील थकित पाणीपट्टीचा आकडा १५ कोटींपर्यंत पोहोचला, तर ५ कोटी ६९ लाखांच्या थकित वीज बिलापोटी म्हैसाळची वीज विद्युत मंडळाने तोडली होती. आजपर्यंत मागील तीन वर्षांत आणेवारी ५० पैसेपेक्षा कमी असल्याने अवर्षणप्रवण टंचाईक्षेत्र घोषित करून टंचाई निधीतून आवर्तनाचा मार्ग सुकर व्हावा, म्हणून वीज बिले तीनवेळा शासनाने भरली. यावर्षीही टंचाई निधीतून ५ कोटी ६९ लाखांपैकी आयुक्त कार्यालयाकडून १ कोटी ६२ लाख रुपयांची तरतूद म्हैसाळ योजनेसाठी करण्यात लोकप्रतिनिधींना यश मिळाले. पण उर्वरित ४ कोटी रूपयांच्या थकित वीज बिलाचे काय? ते कोणी भरायचे? अन् थकित १५ कोटींच्या पाणीपट्टीचे काय? असे यक्षप्रश्न निर्माण झाले आहेत.वसुलीला लाभार्थी शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळावा म्हणून जाहीर आवाहने, बैठका, तालुकास्तरीय बैठका, कारखाना प्रशासनाकडून जागृती, वृत्तपत्रांतून होणारे प्रबोधन यातून फक्त २ लाखांपर्यंत वसुलीचा आकडा पोहोचला आहे. या उदासीनतेला जबाबदार कोण? असे गंभीर प्रश्न तयार होत आहेत. आताच उन्हाच्या तीव्रतेने येथील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. पाणीसाठे संपत चालले आहेत. ऐन उन्हाळ्यात द्राक्षबागा टिकविणे कठीण होणार आहे. असे असूनही शासन, लोकप्रतिनिधी अन् शेतकऱ्यांच्या उदासीन भूमिकेमुळे आता यंदाच्या आवर्तनाची वाट बिकट झाल्याचे दिसत आहे.ना टंचाई... ना भरपाई...म्हैसाळ योजनेचा लाभ प्रामुख्याने मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव या तालुक्यांंना होत आहे. दुष्काळी पार्श्वभूमीवर आतापासूनच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. म्हैसाळचे आवर्तन तातडीने सुरू करावे, अशी मागणी सर्वत्र सुरू झाली आहे. पाण्याची जाहीर मागणी करताना जमणारी गर्दी वैयक्तिक अर्ज भरण्याबाबत उदासीन का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पाणी तर हवे, मात्र पाण्याची मागणी करणारा अर्ज देण्याची तयारी नाही. पाणीपट्टी वसुलीसही शेतकऱ्यांमधून फारसा प्रतिसाद मिळत नाही. यंदा अवकाळीच्या तडाख्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघणेही कठीण बनले आहे. त्यामुळे पाणीपट्टी भरण्याची त्यांची मानसिकता नाही, हेही स्पष्ट आहे.आणेवारीचे कारण पुढे करत सरकारने अवकाळी नुकसानीच्या भरपाईबाबत हात वर केले आहेत. गेली काही वर्षे जिल्ह्यातील मंत्री रेटून टंचाईतून पाणीपट्टी भरीत, भरपाई मिळवून देत, मात्र आता ती शक्यता धुसर आहे.म्हैसाळ योजनेचे लाभक्षेत्र २३ हजार हेक्टर आहे. पैकी किमान ५० टक्के म्हणजे १२ हजार हेक्टरपर्यंत मागणी अर्ज आल्याशिवाय आवर्तन सुरू करता येणार नाही. शिवाय मागणी अर्जामुळे पाणी कोणाला हवे, कोणाला सोडायचे हे निश्चित होते. नमुना ७ मध्ये अर्ज करावयाचे असून, खात्याचे कर्मचारी गावोगाव तैनात आहेत. मात्र अत्यंत तोकडा प्रतिसाद मिळत आहे. योजनेच्या आवर्तनाकरिता वीज कनेक्शनही जोडून तयार आहे. आता प्रतीक्षा आहे लाभार्थी शेतकऱ्यांच्या मागणी अर्जांची अन् त्यांची मागील थकित पाणीपट्टी भरण्याची.- सूर्यकांत नलवडे, सहाय्यक कार्यकारी अभियंता, म्हैसाळ योजना