शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

मिरजेत डेंग्यूसदृश तापामुळे महिलेसह युवतीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 00:19 IST

मिरज : मिरजेत कोकणे गल्ली येथील श्रावणी विकास माळी (वय १७) ही युवती व अस्वले कॉलनीतील सोनाबाई पांडुरंग अस्वले ...

मिरज : मिरजेत कोकणे गल्ली येथील श्रावणी विकास माळी (वय १७) ही युवती व अस्वले कॉलनीतील सोनाबाई पांडुरंग अस्वले (५५) या महिलेचा डेंग्यूसदृश तापामुळे मृत्यू झाला. अस्वले कॉलनीत व परिसरात अस्वच्छतेमुळे डेंग्यूसदृश आजारांची अनेकांना लागण झाली असून डेंग्यूसदृश तापामुळे दोघींच्या झालेल्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे.महापुराच्या आपत्तीनंतर साथींच्या आजारांमुळे नागरिक हैराण आहेत. कोकणे गल्लीतील बारावीत शिकणारी श्रावणी माळी हिला वारंवार ताप येत असल्याने तिला कोल्हापुरात खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेहोते. उपचार सुरू असताना मंगळवारी श्रावणीचा मृत्यू झाला तसेचअस्वले कॉलनीत सोनाबाई अस्वले यांना दोन दिवस ताप येत असल्याने त्यांना उपचारासाठी मिरजेत खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; पण उपचारसुरू असताना त्यांचाही बुधवारी मृत्यूझाला.अस्वले कॉलनीत आणखी काहीजणांना डेंग्यूसदृश तापाची लागण झाल्याने त्यांच्यावर शहरातील खासगी व शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आल्याची माहिती मिळाली. डेंग्यूसदृश तापाने दोघींच्या झालेल्या मृत्यूमुळे शहरातील अस्वच्छता व महापालिका आरोग्य विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. डासांच्या प्रतिबंधासाठी स्वच्छता व धूरफवारणीसह आरोग्य विभागाकडून उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी आहे. सोनाबाईअस्वले यांच्या मृत्यूमुळे अस्वलेकॉलनी परिसरात महापालिका आरोग्य विभागाकडून स्वच्छता व रुग्णांचे सर्वेक्षण करून संशयित रुग्णांवर उपचार करण्यात आले.