शहरं
Join us  
Trending Stories
1
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
2
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
3
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
4
१७ वर्षीय आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; पण फिफ्टी आड आला माफाका
5
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
6
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
7
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
8
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
9
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
10
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
11
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
12
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
13
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
14
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
15
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
16
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
17
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
18
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
19
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
20
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...

गोवंश हत्याबंदी रद्दसाठी जिल्ह्यात निदर्शने

By admin | Updated: May 20, 2015 00:09 IST

गोवंश हत्याबंदीमुळे भाकड जनावरांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या कायद्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

सांगली : गोवंश हत्याबंदी कायदा रद्द करावा, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्यावतीने मंगळवारी सांगलीसह जिल्ह्यात ठिकठिकाणी मंगळवारी निदर्शने करण्यात आली.सांगलीत रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलेल्या निदर्शनात नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, सुरेश दुधगावकर, अरुण आठवले, बापू सोनवणे, अपर्णाताई वाघमारे, विशाल सकटे, संदेश भंडारे, रोहित शिवशरण, संजय शिंदे सहभागी झाले होते. शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गोवंश हत्याबंदीमुळे भाकड जनावरांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या कायद्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. मिरज : मिरजेत तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी तहसीलदारांना निवेदन दिले. भाकड जनावरे सांभाळण्याचा खर्च परवडणारा नाही. गोवंश हत्याबंदीमुळे चर्मकार व ढोर समाजाचा व्यवसाय अडचणीत आल्याने त्यांचे आर्थिक नुकसान सुरु आहे. गोवंश हत्याबंदी कायदा रद्द करावा, अन्यथा भाकड जनावरे सांभाळण्याचा प्रतिमहा सहा हजार रुपये खर्च शासनाने शेतकऱ्यांना द्यावा, या मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. माजी नगरसेवक अशोक कांबळे, नंदकुमार कांबळे, सुमनताई वाघमारे, रवींद्र कांबळे, योगेंद्र कांबळे, पोपट कांबळे, रसिक जकाते, प्रकाश इनामदार, राम कांबळे आंदोलनात सहभागी झाले होते.कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तहसील कार्यालयाच्या आवारात करण्यात आलेल्या आंदोलनाचे नेतृत्व तालुका अध्यक्ष पिंटू माने, महाराष्ट्र उपाध्यक्ष नानासाहेब वाघमारे, तालुका अध्यक्ष विशाल (लाला) वाघमारे, संजय वाघमारे, किरण बनसोडे, दत्ता आठवले यांनी केले. यावेळी नानासाहेब वाघमारे म्हणाले, गोवंश हत्याबंदी कायदा हा अन्यायकारक आहे. या कायद्यामुळे कित्येक कुटुंबांची उपासमार होत आहे. हा कायदा रद्द करण्यात यावा, अन्यथा देशातील शेतकरी कुटुंबातील जनावरे मंत्र्यांच्या दारात बांधण्यात येतील. परशुराम पाटील, पिंटू चंदनशिवे, महेश देसाई, रवी चंदनशिवे, सूरज वाघमारे, अमोल धेंडे, महेश माने, विशाल माने, रोहित कांबळे, सचिन वाघमारे व कार्यकर्ते उपस्थित होते. कडेगाव : भाकड जनावरे सांभाळणे शेतकऱ्यांना अशक्य आहे. या भाकड जनावरांचे काय करायचे, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या शेतकऱ्यांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी. अन्यथा गोवंश हत्याबंदी कायदा रद्द करावा, अशी मागणी करीत आरपीआय, कडेगाव तालुका संघटनेने कडेगाव तहसीलसमोर आंदोलन केले.यावेळी आरपीआयचे कडेगाव तालुका अध्यक्ष महादेव होवाळ, उपाध्यक्ष जीवन करकटे, सरचिटणीस प्रवीण कांबळे, संकेत कांबळे, विजय गवाळे, बाळासाहेब दंडवते, प्रकाश दंडवते, भूषण दंडवते, धैर्यशील कांबळे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)सर्व पशू-प्राण्यांची हत्याबंदी करण्याची मागणी जत : जत तालुका रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले गट) यांच्यातर्फे तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. शासनाने गोहत्या बंदी कायदा केल्यामुळे जनावरांपासून कातडी कमावण्याचा व्यवसाय करणाऱ्यांवर अन्याय झाला आहे. शासनाने हत्याबंदी करायची असेल, तर सर्व पशू आणि प्राण्यांची हत्याबंदी करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. आंदोलनात ललिता कांबळे, उज्ज्वला पवार, अंबिका मांग, शैलजा चिकदुळे, अशोक हुवाळे, मुत्याप्पा कांबळे, राजेश वर्मा, तालुका सरचिटणीस सुनील कसबे, संजय कांबळे, श्रीकांत हुवाळे सहभागी झाले होते.