शहरं
Join us  
Trending Stories
1
आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी
2
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
3
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
4
Stock Market Today: ३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी
5
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
6
LIC चा ‘या’ स्कीममध्ये फक्त ४ वर्ष भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरंटी, आणखीही बेनिफिट्स मिळणार
7
चातुर्मासातील पहिली शिवरात्री: शिवपूजन कसे करावे? व्रताचरणाची सोपी पद्धत; मिळेल सुख-लाभ!
8
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
9
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
10
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
11
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
12
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
13
राज्य सरकार, तपासयंत्रणांना मोठा धक्का, गुन्हे सिद्ध करण्यात सरकारी वकील ठरले अपयशी : उच्च न्यायालय
14
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
15
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
16
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
17
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
18
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
19
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
20
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!

गोवंश हत्याबंदी रद्दसाठी जिल्ह्यात निदर्शने

By admin | Updated: May 20, 2015 00:09 IST

गोवंश हत्याबंदीमुळे भाकड जनावरांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या कायद्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

सांगली : गोवंश हत्याबंदी कायदा रद्द करावा, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्यावतीने मंगळवारी सांगलीसह जिल्ह्यात ठिकठिकाणी मंगळवारी निदर्शने करण्यात आली.सांगलीत रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आलेल्या निदर्शनात नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, सुरेश दुधगावकर, अरुण आठवले, बापू सोनवणे, अपर्णाताई वाघमारे, विशाल सकटे, संदेश भंडारे, रोहित शिवशरण, संजय शिंदे सहभागी झाले होते. शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गोवंश हत्याबंदीमुळे भाकड जनावरांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या कायद्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. मिरज : मिरजेत तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी तहसीलदारांना निवेदन दिले. भाकड जनावरे सांभाळण्याचा खर्च परवडणारा नाही. गोवंश हत्याबंदीमुळे चर्मकार व ढोर समाजाचा व्यवसाय अडचणीत आल्याने त्यांचे आर्थिक नुकसान सुरु आहे. गोवंश हत्याबंदी कायदा रद्द करावा, अन्यथा भाकड जनावरे सांभाळण्याचा प्रतिमहा सहा हजार रुपये खर्च शासनाने शेतकऱ्यांना द्यावा, या मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. माजी नगरसेवक अशोक कांबळे, नंदकुमार कांबळे, सुमनताई वाघमारे, रवींद्र कांबळे, योगेंद्र कांबळे, पोपट कांबळे, रसिक जकाते, प्रकाश इनामदार, राम कांबळे आंदोलनात सहभागी झाले होते.कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तहसील कार्यालयाच्या आवारात करण्यात आलेल्या आंदोलनाचे नेतृत्व तालुका अध्यक्ष पिंटू माने, महाराष्ट्र उपाध्यक्ष नानासाहेब वाघमारे, तालुका अध्यक्ष विशाल (लाला) वाघमारे, संजय वाघमारे, किरण बनसोडे, दत्ता आठवले यांनी केले. यावेळी नानासाहेब वाघमारे म्हणाले, गोवंश हत्याबंदी कायदा हा अन्यायकारक आहे. या कायद्यामुळे कित्येक कुटुंबांची उपासमार होत आहे. हा कायदा रद्द करण्यात यावा, अन्यथा देशातील शेतकरी कुटुंबातील जनावरे मंत्र्यांच्या दारात बांधण्यात येतील. परशुराम पाटील, पिंटू चंदनशिवे, महेश देसाई, रवी चंदनशिवे, सूरज वाघमारे, अमोल धेंडे, महेश माने, विशाल माने, रोहित कांबळे, सचिन वाघमारे व कार्यकर्ते उपस्थित होते. कडेगाव : भाकड जनावरे सांभाळणे शेतकऱ्यांना अशक्य आहे. या भाकड जनावरांचे काय करायचे, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या शेतकऱ्यांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी. अन्यथा गोवंश हत्याबंदी कायदा रद्द करावा, अशी मागणी करीत आरपीआय, कडेगाव तालुका संघटनेने कडेगाव तहसीलसमोर आंदोलन केले.यावेळी आरपीआयचे कडेगाव तालुका अध्यक्ष महादेव होवाळ, उपाध्यक्ष जीवन करकटे, सरचिटणीस प्रवीण कांबळे, संकेत कांबळे, विजय गवाळे, बाळासाहेब दंडवते, प्रकाश दंडवते, भूषण दंडवते, धैर्यशील कांबळे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)सर्व पशू-प्राण्यांची हत्याबंदी करण्याची मागणी जत : जत तालुका रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले गट) यांच्यातर्फे तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. शासनाने गोहत्या बंदी कायदा केल्यामुळे जनावरांपासून कातडी कमावण्याचा व्यवसाय करणाऱ्यांवर अन्याय झाला आहे. शासनाने हत्याबंदी करायची असेल, तर सर्व पशू आणि प्राण्यांची हत्याबंदी करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. आंदोलनात ललिता कांबळे, उज्ज्वला पवार, अंबिका मांग, शैलजा चिकदुळे, अशोक हुवाळे, मुत्याप्पा कांबळे, राजेश वर्मा, तालुका सरचिटणीस सुनील कसबे, संजय कांबळे, श्रीकांत हुवाळे सहभागी झाले होते.