शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत भुयारी वीज प्रकल्पाचा बोजवारा

By admin | Updated: September 11, 2014 00:08 IST

ठेकेदाराचे दुर्लक्ष : वीस कोटीपैकी दोन वर्षात साडेपाच कोटी खर्च

अशोक डोंबाळे - सांगली -वीजचोरी, गळती कमी करून सांगली, मिरज व कुपवाड महापालिका क्षेत्रातील ग्राहकांना अखंडित वीज देण्यासाठी महावितरणने हाती घेतलेल्या भुयारी वीज प्रकल्पाचा बोजवारा उडाला आहे. कधी महापालिका प्रशासनाचा अडथळा, तर कधी ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे दोन वर्षात केवळ साडेपाच कोटीचा निधी खर्च झाला आहे. ठेकेदारामुळे पंधरा कोटींचे काम खोळंबले आहे. सांगली, मिरज, कपवाड आणि बामणोली परिसरात भुयारी वीज प्रकल्पासाठी महावितरणने जानेवारी २०१२ मध्ये ७४ कोटींचा निधी मंजूर केला होता. या निधीतून महापालिका क्षेत्रासह बामणोली येथे अति उच्चदाब वाहिनीचे पंधरा किलोमीटर आणि उच्चदाब वाहिनीचे १८ किलोमीटर काम केले आहे. ३३४ ठिकाणी नवीन रोहित्रे बसविल्यामुळे शहरातील वीज गळतीला काही प्रमाणात लगाम बसला आहे. या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर महापालिका क्षेत्रात भुयारी विद्युत केबल टाकणे, शिंदेमळा येथे उपकेंद्र, खणभागातील रिसाला रोड येथे दहा एमव्हीए क्षमतेचा नवीन रोहित्र बसविण्यासह विविध कामांसाठी १९ कोटी ३९ लाखांचा निधी जानेवारी २०१२ मध्ये मंजूर झाला आहे. या कामाची निविदा मंजूर झाल्यानंतर संबंधित ठेकेदाराने कामाला सुरुवात केली. रिसाला रोड येथील दहा एमव्हीए क्षमतेचे नवीन रोहित्र बसविण्यासह शहरातील ३५ ठिकाणी नवीन रोहित्रे बसविली. वीज वितरण करणाऱ्या १४० रोहित्रांची क्षमता वाढवायची होती. यामध्ये आतापर्यंत ९० वीज वितरण करणाऱ्या रोहित्रांची क्षमता वाढविली असून उर्वरित काम अपूर्ण आहे. या सर्व कामावर गेल्या दोन वर्षात केवळ पाच कोटी ५० लाखांचा निधी खर्च झाला आहे. उर्वरित कामे दोन वर्षात पूर्ण झाली नाहीत. उर्वरित पंधरा कोटींचा निधी अखर्चित आहे.भुयारी वीज प्रकल्पाचा बोजवारा उडाल्याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारले असता, ठेकेदाराकडूनच विलंब झाला आहे, म्हणूनच काम थांबले असून त्याला काम पूर्ण करण्यासाठी दोन ते तीनवेळा समज दिली आहे. सध्या त्याने काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे, असे त्यांनी सांगितले.डिसेंबर २०१४ पर्यंत ठेकेदाराने काम पूर्ण न केल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा शहर विभागाचे कार्यकारी अभियंता अजितकुमार कागी यांनी दिला आहे. ठेकेदाराने कामास विलंब केल्यामुळे दोन ते अडीच वर्षात भुयारी विद्युत वाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले नाही. महापालिकेकडूनही भुयारी वीज प्रकल्प टाकण्यासाठीच्या खोदकामास मंजुरी वेळेत मिळाली नाही. काही तांत्रिक मंजुरीलाही अडचणी असल्यामुळे भुयारी वीज प्रकल्पाचे काम खोळंबले आहे.भुयारी विद्युत केबल टाकल्यामुळे ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यातील अडचणी कमी होणार आहेत. शिवाय देखभाल खर्चही कमी होणार आहे. शासनाकडून निधी मंजूर आहे. परंतु, केवळ ठेकेदाराकडून विलंब झाल्यामुळेच काम थांबले होते. ठेकेदाराला समज देऊन डिसेंबर २०१४ पर्यंत काम पूर्ण करण्याची सूचना दिली आहे. काम पूर्ण न केल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.- अजितकुमार कागी, कार्यकारी अभियंता, महावितरण.गतिमान विद्युत विकास कार्यक्रमातून होणारी कामेशिंदेमळा येथे ३३ बाय ११ केव्ही क्षमतेचे उपकेंद्ररिसाला रोड येथे दहा एमव्हीए क्षमतेचे निवीन रोहित्र बसविणेमहापालिका क्षेत्रात नवीन ९५ रोहित्र बसविणे४जिल्ह्यातील १४० वितरण रोहित्रांची क्षमता वाढविणे