शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

लोकशाहीची जोपासना करणे आवश्यक

By admin | Updated: November 27, 2014 00:11 IST

बिराज साळुंखे : संविधान दिनानिमित्त ग्रंथदिंडीस प्रतिसाद

सांगली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधानाच्या माध्यमातून लोकशाहीची संकल्पना दिली असून, सर्वसामान्यांनी लोकशाहीची जोपासना करणे गरजेचे असल्याचे मत एसटी कामगार संघटनेचे ज्येष्ठ नेते बिराज साळुंखे यांनी आज (बुधवारी) व्यक्त केले. संविधान दिनानिमित्त आयोजित ग्रंथदिंडीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.भारतीय विद्यार्थी मोर्चा आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने संविधानाचा गौरव करण्यासाठी ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन ग्रंथदिंडीस प्रारंभ झाला. दिंडीत सजविलेल्या पालखीत भारतीय संविधान, महात्मा फुले यांचे समग्र वाङ्मय आणि डॉ. आंबेडकर आणि महात्मा फुले यांची छायाचित्रे ठेवण्यात आली होती. टाळ, मृदंगाच्या निनादात मारुती चौक, हरभट रोड मार्गे स्टेशन चौक येथे दिंडी आली. यामध्ये न्यू हायस्कूलचे विद्यार्थी तसेच नागरिक सहभागी झाले होते. यावेळी बिराज साळुंखे म्हणाले की, लोकशाहीच्या माध्यमातून आपल्याला भाषण आणि मुद्रण स्वातंत्र्याची देणगी मिळालेली आहे. त्यामुळेच आपल्या मनातील विचार आपण इतरांसमोर प्रभावीपणे मांडू शकतो. लोकशाहीमुळेच आपल्याला मतदानाचा पवित्र अधिकार प्राप्त झाला आहे. त्याद्वारे राज्यकर्ते जर राज्यकारभार नीट करीत नसतील, तर त्यांना सत्तेवरुन पायउतार करण्याची क्षमताही नागरिकांना मिळालेली आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी अ‍ॅड. सुभाष पाटील, अ‍ॅड. के. डी. शिंदे, राजेंद्र माळी, महेश वाघमारे, संजय कोमटवार, दत्तात्रय घाटगे, सचिन आवळे, सुनील होवाळ, स्नेहल जिरगे, जमीर जमादार, नामदेव कोरे उपस्थित होते. (प्रतिनिधी)