शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

लोकशाहीची जोपासना करणे आवश्यक

By admin | Updated: November 27, 2014 00:11 IST

बिराज साळुंखे : संविधान दिनानिमित्त ग्रंथदिंडीस प्रतिसाद

सांगली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधानाच्या माध्यमातून लोकशाहीची संकल्पना दिली असून, सर्वसामान्यांनी लोकशाहीची जोपासना करणे गरजेचे असल्याचे मत एसटी कामगार संघटनेचे ज्येष्ठ नेते बिराज साळुंखे यांनी आज (बुधवारी) व्यक्त केले. संविधान दिनानिमित्त आयोजित ग्रंथदिंडीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.भारतीय विद्यार्थी मोर्चा आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्यावतीने संविधानाचा गौरव करण्यासाठी ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन ग्रंथदिंडीस प्रारंभ झाला. दिंडीत सजविलेल्या पालखीत भारतीय संविधान, महात्मा फुले यांचे समग्र वाङ्मय आणि डॉ. आंबेडकर आणि महात्मा फुले यांची छायाचित्रे ठेवण्यात आली होती. टाळ, मृदंगाच्या निनादात मारुती चौक, हरभट रोड मार्गे स्टेशन चौक येथे दिंडी आली. यामध्ये न्यू हायस्कूलचे विद्यार्थी तसेच नागरिक सहभागी झाले होते. यावेळी बिराज साळुंखे म्हणाले की, लोकशाहीच्या माध्यमातून आपल्याला भाषण आणि मुद्रण स्वातंत्र्याची देणगी मिळालेली आहे. त्यामुळेच आपल्या मनातील विचार आपण इतरांसमोर प्रभावीपणे मांडू शकतो. लोकशाहीमुळेच आपल्याला मतदानाचा पवित्र अधिकार प्राप्त झाला आहे. त्याद्वारे राज्यकर्ते जर राज्यकारभार नीट करीत नसतील, तर त्यांना सत्तेवरुन पायउतार करण्याची क्षमताही नागरिकांना मिळालेली आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी अ‍ॅड. सुभाष पाटील, अ‍ॅड. के. डी. शिंदे, राजेंद्र माळी, महेश वाघमारे, संजय कोमटवार, दत्तात्रय घाटगे, सचिन आवळे, सुनील होवाळ, स्नेहल जिरगे, जमीर जमादार, नामदेव कोरे उपस्थित होते. (प्रतिनिधी)