शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
3
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
4
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
5
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
6
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
7
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
8
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
9
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
10
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
11
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
12
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
13
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
14
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
15
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
16
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
17
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
18
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
19
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
20
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!

उन्हाळ्याच्या काहीलीने वाढली शीतपेयांची मागणी, लिंबू- कोकम सरबताला अधिक पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 13:42 IST

Temperature Sangli- ऊन, प्रचंड उकाडा, घशाला सतत पडणारी कोरड यामुळे सांगलीत जागोजागी थंडपेयाची मागणी वाढली आहे. यामुळे लोक आता शीतपेयाच्या स्टॉलकडे वळू लागले आहेत. यामुळे स्टॉलधारकांनी शीतपेय विक्रीवर विशेष भर दिल्याचे शहरात दिसून येत आहे.

ठळक मुद्दे लिंबू व कोकम सरबताला अधिक पसंतीसावधगिरी बाळगण्याचा डॉक्टरांचा सल्ला

सुरेंद्र दुपटेसंजयनगर/सांगली : ऊन, प्रचंड उकाडा, घशाला सतत पडणारी कोरड यामुळे सांगलीत जागोजागी थंडपेयाची मागणी वाढली आहे. यामुळे लोक आता शीतपेयाच्या स्टॉलकडे वळू लागले आहेत. यामुळे स्टॉलधारकांनी शीतपेय विक्रीवर विशेष भर दिल्याचे शहरात दिसून येत आहे.

कोरोनामुळे थंड पिण्यावर लोकांनी नियंत्रण ठेवले असले तरी ऊन आणि गरम वातावरणामुळे त्यांचे पाय थंडपेय विक्री करणाऱ्या  दुकानाकडे वळले आहेत. सामान्य लोकांचे  लिंबू पाणी व कोकम सरबतला अधिक पसंती आहे. सर्व स्टॉलवर दोन्ही पेय हमखास मिळत आहेत. कामानिमित्त येणारे बहुतांश नागरिक उपनगरात गाडीने प्रवास करतात. विशेषता सकाळी सांगलीतील विश्रामबाग, काँग्रेस भवन, एसटी स्टँड, टिळक चौक रोड, कुपवाड या भागातून लोक गावात येत असतात.

उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे  लोक अक्षरशः हैराण होत आहेत. त्यांचा जीव कासावीस होतो आहे. यामुळे लोक आता पहिल्यांदा शीतपेयांचे स्टॉलकडे वळतात. शीतपेयामध्ये थंड पाणी, लिंबूसोडा, इतर कोल्ड्रिंकची मागणी नेहमीपेक्षा २० टक्क्यानी वाढली आहे. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात खाद्यपदार्थांपेक्षा  शीतपेयाची जास्त मागणी असते.

काही मोक्याच्या ठिकाणी असलेल्या स्टॉलवर मोसंबी, गाजर तसेच इतर फळांचा ज्युस पिण्यासाठी  लोक गर्दी करत असल्याचे दिसत आहे, तर बच्चेकंपनी कालाखट्टा, कच्ची कैरी,मिल्क शेक तसेच बर्फाचा गोळा खाण्याचा आनंद घेत असल्याचे चित्र शहरांमध्ये दिसत आहे.

उकाडा व त्यामुळे त्वचेला होणारा त्रास लक्षात घेत महिलावर्ग तोंडाला स्कार्प बांधून प्रवास करणे पसंद करत आहेत. मार्च महिन्याचे तापमान साधारणपणे ३० ते ३२ डिग्रीच्या आसपास पोचले असून अजून एप्रिल व मे महिना बाकी आहे. यामुळे उन्हाळ्याच्या काहिलीने शीतपेयांची मागणी वाढली आहे. डॉक्टरांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. 

उन्हामुळे शरीरातील पाणी कमी होते, त्याचा परिणाम शरीरावर होतो. यासाठी नारळ पाणी, आवळा, लिंबू पाणी यांचे जास्त सेवन करावे. यात जीवनसत्त्व तसेच मूलद्रव्ये असतात. लहान मुले व वृद्ध नागरिकांना जास्तीत जास्त पाणी पिण्याचा आग्रह करावा. त्यामुळे पाण्याचे प्रमाण समतोल राहण्यास मदत होईल. फ्रीजमधील पाणी घातक असून यामुळे कशाला विकार होऊ शकतात, बाहेरील अशुद्ध पाणी शक्यतो टाळावे. अन्यथा काविळ, पोटाचे विकार, डोके दुखणे इत्यादी आजार होऊ शकतात. - डॉ. विजया सुवास पाटील, सांगली.  

टॅग्स :TemperatureतापमानSangliसांगली