शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

उन्हाळ्याच्या काहीलीने वाढली शीतपेयांची मागणी, लिंबू- कोकम सरबताला अधिक पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 13:42 IST

Temperature Sangli- ऊन, प्रचंड उकाडा, घशाला सतत पडणारी कोरड यामुळे सांगलीत जागोजागी थंडपेयाची मागणी वाढली आहे. यामुळे लोक आता शीतपेयाच्या स्टॉलकडे वळू लागले आहेत. यामुळे स्टॉलधारकांनी शीतपेय विक्रीवर विशेष भर दिल्याचे शहरात दिसून येत आहे.

ठळक मुद्दे लिंबू व कोकम सरबताला अधिक पसंतीसावधगिरी बाळगण्याचा डॉक्टरांचा सल्ला

सुरेंद्र दुपटेसंजयनगर/सांगली : ऊन, प्रचंड उकाडा, घशाला सतत पडणारी कोरड यामुळे सांगलीत जागोजागी थंडपेयाची मागणी वाढली आहे. यामुळे लोक आता शीतपेयाच्या स्टॉलकडे वळू लागले आहेत. यामुळे स्टॉलधारकांनी शीतपेय विक्रीवर विशेष भर दिल्याचे शहरात दिसून येत आहे.

कोरोनामुळे थंड पिण्यावर लोकांनी नियंत्रण ठेवले असले तरी ऊन आणि गरम वातावरणामुळे त्यांचे पाय थंडपेय विक्री करणाऱ्या  दुकानाकडे वळले आहेत. सामान्य लोकांचे  लिंबू पाणी व कोकम सरबतला अधिक पसंती आहे. सर्व स्टॉलवर दोन्ही पेय हमखास मिळत आहेत. कामानिमित्त येणारे बहुतांश नागरिक उपनगरात गाडीने प्रवास करतात. विशेषता सकाळी सांगलीतील विश्रामबाग, काँग्रेस भवन, एसटी स्टँड, टिळक चौक रोड, कुपवाड या भागातून लोक गावात येत असतात.

उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे  लोक अक्षरशः हैराण होत आहेत. त्यांचा जीव कासावीस होतो आहे. यामुळे लोक आता पहिल्यांदा शीतपेयांचे स्टॉलकडे वळतात. शीतपेयामध्ये थंड पाणी, लिंबूसोडा, इतर कोल्ड्रिंकची मागणी नेहमीपेक्षा २० टक्क्यानी वाढली आहे. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात खाद्यपदार्थांपेक्षा  शीतपेयाची जास्त मागणी असते.

काही मोक्याच्या ठिकाणी असलेल्या स्टॉलवर मोसंबी, गाजर तसेच इतर फळांचा ज्युस पिण्यासाठी  लोक गर्दी करत असल्याचे दिसत आहे, तर बच्चेकंपनी कालाखट्टा, कच्ची कैरी,मिल्क शेक तसेच बर्फाचा गोळा खाण्याचा आनंद घेत असल्याचे चित्र शहरांमध्ये दिसत आहे.

उकाडा व त्यामुळे त्वचेला होणारा त्रास लक्षात घेत महिलावर्ग तोंडाला स्कार्प बांधून प्रवास करणे पसंद करत आहेत. मार्च महिन्याचे तापमान साधारणपणे ३० ते ३२ डिग्रीच्या आसपास पोचले असून अजून एप्रिल व मे महिना बाकी आहे. यामुळे उन्हाळ्याच्या काहिलीने शीतपेयांची मागणी वाढली आहे. डॉक्टरांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. 

उन्हामुळे शरीरातील पाणी कमी होते, त्याचा परिणाम शरीरावर होतो. यासाठी नारळ पाणी, आवळा, लिंबू पाणी यांचे जास्त सेवन करावे. यात जीवनसत्त्व तसेच मूलद्रव्ये असतात. लहान मुले व वृद्ध नागरिकांना जास्तीत जास्त पाणी पिण्याचा आग्रह करावा. त्यामुळे पाण्याचे प्रमाण समतोल राहण्यास मदत होईल. फ्रीजमधील पाणी घातक असून यामुळे कशाला विकार होऊ शकतात, बाहेरील अशुद्ध पाणी शक्यतो टाळावे. अन्यथा काविळ, पोटाचे विकार, डोके दुखणे इत्यादी आजार होऊ शकतात. - डॉ. विजया सुवास पाटील, सांगली.  

टॅग्स :TemperatureतापमानSangliसांगली