शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
2
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
3
राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; CM फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...”
4
हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप
5
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
6
१९९० मध्ये १ किलो सोन्याची किंमत मारुती ८०० एवढी होती, आज लँड रोव्हरएवढी झालीय, २०४० मध्ये...; उद्योगपतीने हिशेबच मांडला
7
पैसाच पैसा! माकडाने पळवली ५० हजारांची बॅग; झाडावर चढला, केला ५०० रुपयांच्या नोटांचा वर्षाव
8
नाकेबंदीदरम्यान हवालाची रक्कम लुटली, बड्या महिला पोलिस अधिकाऱ्यासह ५ जण अटकेत   
9
“डोळ्यांत पाणी, उद्ध्वस्त घरे, थंड पडलेले सरकार अन् शेतकऱ्यांचे दिवाळे”: विजय वडेट्टीवार
10
गुजरात कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल; रवींद्र जडेजाच्या पत्नीला मंत्रिपदाची लॉटरी...
11
दिवाळीला घरी आणा नवी कोरी दुचाकी! देशातील सर्वात स्वस्त ५ बाईक्स, मायलेज-फीचर्स सर्वच दमदार
12
4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला...
13
माओवादी चळवळीला मोठा हादरा ! नक्षल्यांचा नेता ‘भूपती’सह ६० जणांनी पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण
14
इंटरनेटशिवाय करता येणार पेमेंट; RBI ने लॉन्च केला ‘ऑफलाइन डिजिटल रुपया’, जाणून घ्या...
15
उद्धव ठाकरे अन् मविआ नेत्यांसोबत राज ठाकरे मंत्रालयात; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी एकत्र चर्चा, 'इंजिना'ची ठरली दिशा?
16
एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना खरेच बंद होणार का? CM फडणवीसांनी सरळ सांगितले; म्हणाले...
17
सोन्याचे दर ₹१.३० लाखांच्या जवळ, चांदीचा भाव ₹१.८१ लाखांच्या पुढे, कॅरेटनुसार पाहा नवे दर
18
रोहित-विराट संदर्भातील 'त्या' प्रश्नावर गंभीर यांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले कोच? जाणून घ्या सविस्तर
19
Tata Motors Demerger: टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची खरी कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या

चार जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांचा मंगळूर गाडीसाठी जोहार; कर्नाटक, केरळमधील व्यापाऱ्यांचे खासदारांना पत्र

By अविनाश कोळी | Updated: July 10, 2024 19:19 IST

पंधरा वर्षापूर्वी मिरज-मंगळूर जुनी महालक्ष्मी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली

सांगली : व्यापारी, नोकरदार, उद्योजक व पर्यटनासाठी जाऊ पाहणाऱ्या सातारा, कोल्हापूर, सांगली, बेळगाव जिल्ह्यातील प्रवाशांसाठी मंगळूरला जाण्यासाठी सध्या कोणतीही दैनंदिन गाडी उपलब्ध नाही. त्यामुळे कर्नाटक व केरळ येथील व्यापारी संघटनांनी रेल्वे तसेच जिल्ह्यातील खासदारांकडे हा प्रश्न मांडला आहे.व्यापारी संघटनांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पंधरा वर्षापूर्वी मिरज-मंगळूर जुनी महालक्ष्मी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली. आता आठवड्यातून मंगळूरला जाण्यासाठी पुर्णा एक्सप्रेस ही एकमेव साप्ताहिक गाडी आहे. त्यामुळे सातारा, कराड, कोल्हापूर, सांगली, बेळगाव, येथील लोकांना मंगळुरूला जाण्यासाठी खूप कसरत करावी लागत आहे. चार जिल्ह्यातून केरळला कामानिमित्त जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. याशिवाय मंगळूर येथे पर्यटनासाठी जाऊ इच्छिणाऱ्यांनाही रेल्वेचा दैनंदिन पर्याय उपलब्ध नाही. कोणत्याही व्यक्तीला तातडीच्या वेळी मंगळूरला किंवा त्या भागातून या चारही जिल्ह्यात येण्यासाठी पर्याय उपलब्ध नाही.त्यामुळे प्रतिष्ठित जुनी महालक्ष्मी एक्स्प्रेस (मिरज ते मंगळूर), अर्सिकेरेमार्गे दररोज सुरु करावी. सातारा, मिरज, बेळगाव, लोंढा, मडगाव, मंगळूरमार्गे जाणारी एकमेव साप्ताहिक रेल्वे (क्र. ११०९७ व ९८) पूर्णा एक्स्प्रेस आठवड्यातून तीनवेळा सुरु करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. सांगलीचे खासदार विशाल पाटील यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. व्यापारी संघटनांनी सांगलीच्या नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांच्याशीही चर्चा केली. संघटनांनी एकत्र येत यासाठी पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.निवेदनावर कर्नाटक, केरळ व्यापारी असोसिएशनचे फिरोस ए. पी., अर्शद के. पी., रेनी जॉर्ज, गेनू जॉय, सुरेश टी. जी., बेंझी बाबू जॉर्ज, मुजीब पी. सी., विजयन टी, फरशीद ए. पी., सजीवन यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

वंदे भारत एक्सप्रेसची मागणीकर्नाटक, केरळ व्यापारी संघटनेने रेल्वेकडे वंदे भारत एक्सप्रेसची मागणी केली आहे. आर्सिकेरे मार्गे कोल्हापूर ते मंगळूर या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याचा प्रस्ताव त्यांनी दिला आहे.

मंगळूरला जाण्यासाठी येत असलेल्या प्रवाशांच्या अडचणींचा विचार करुन आम्ही त्याबाबत पाठपुरावा करणार आहोत. यापूर्वीही रेल्वेकडे या गाडीबाबत पत्रव्यवहार केला होता. मात्र, रेल्वेकडून प्रवाशांची मागणी दुर्लक्षित करण्यात आली. - सतीश साखळकर, अध्यक्ष, नागरिक जागृती मंच

टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वेpassengerप्रवासी