शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
2
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
3
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
4
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
5
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
6
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
7
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
8
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
9
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
10
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
11
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
12
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
13
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
14
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
15
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!
16
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
17
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
18
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
19
विशेष लेख : कुणी काय खावे, याच्याशी सरकारचा काय संबंध?
20
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर

अवकाळीग्रस्तांसाठी अधिवेशनात घोषणा!

By admin | Updated: March 6, 2015 00:53 IST

चंद्रकांत पाटील यांची माहिती : प्रत्येक तालुक्यात हवामान केंद्र उभारणार

 सांगली : अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात करण्यात येईल, अशी माहिती सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. आता प्रत्येक तालुक्यात हवामान केंद्र उघडण्यात येईल, असेही ते म्हणाले. जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, संपूर्ण राज्यात काही ठिकाणी दुष्काळाने, तर काही ठिकाणी अवकाळी पावसाने मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. सांगली जिल्ह्यात २६ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. याचे पंचनामे १० मार्चपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश महसूल व कृषी विभागाला दिले आहेत. केंद्र सरकारकडून मदत मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे राज्य शासनच आता यासाठी पुढाकार घेणार आहे. प्रत्येक जिल्ह्याचा अहवाल आल्यानंतर यासाठी किती मदत द्यायची, याची घोषणा विधिमंडळातच करण्यात येईल. शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज समजण्यासाठी आता प्रत्येक तालुक्यात हवामान केंद्र उभारण्यासाठी शासन प्रयत्न करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खबरदारी घेण्यास मदत होणार आहे. अवकाळीने झालेल्या सर्व नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. नुकसानग्रस्तांना मदत देताना शासन केवळ नियमावर बोट ठेवून काम करणार नाही. जास्तीत जास्त शेतकरी कसे उभे राहतील यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. जिल्ह्यात नोव्हेंबरपासून अवकाळीने झालेल्या नुकसानीसाठी चार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. अवकाळी व दुष्काळासाठी गेल्या वर्षभरात ४२०० कोटी वितरित करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)