शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
3
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
4
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
5
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
6
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
7
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
9
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
10
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
11
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
12
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
13
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
14
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
15
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
16
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
17
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
18
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
19
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
20
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
Daily Top 2Weekly Top 5

मागणीअभावी ताकारी-टेंभू योजनेच्या आवर्तनास विलंब

By admin | Updated: November 17, 2014 23:22 IST

शेतकरीही पाणी मागणी अर्ज भरून देण्यास टाळाटाळ करीत आहेत.

कडेगाव : किमान ५0 टक्के शेतकऱ्यांचे पाणी मागणी अर्ज प्राप्त झाल्याशिवाय ताकारी आणि टेंभू दोन्ही योजनांचे आवर्तन सुरू करणार नाही, अशी आडमुठी भूमिका शासनाने घेतली आहे. शेतकरीही पाणी मागणी अर्ज भरून देण्यास टाळाटाळ करीत आहेत. यामुळे दोन्ही योजनांच्या पहिल्या आवर्तनास विलंब होत आहे.वास्तविक ताकारी आणि टेंभू या दोन्ही योजनांच्या लाभक्षेत्रातील ओलिताखालील शेतजमिनीची पाणीपट्टी आकारणी करताना संबंधित शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन लाभक्षेत्र मोजणे आवश्यक आहे. परंतु पाणीपट्टी आकारणी पारदर्शक पध्दतीने होत नाही. अनेक बड्या शेतकऱ्यांचे लाभक्षेत्र दडविण्याचे प्रकार दोन्ही योजनांच्या पाणीपट्टी आकारणीत होतात. एकरी ६२५0 रुपये पाणीपट्टी शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून कपात करून संबंधित कारखानदार योजनेकडे वर्ग करतात. एकाच शेतकऱ्याचा अनेक कारखान्यांना ऊस जातो. अशावेळी संबंधित योजनेच्या पाणीपट्टी आकारणी यादीप्रमाणे दोन्हीकडे कपात होते. यामुळे शेतकऱ्यांना त्रास होतो. ऊसपिकाशिवाय गहू, हरभरा, हळद, भाजीपाला अशी पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांची पाणीपट्टी वसूल करण्याची सक्षम यंत्रणा योजनांकडे नाही. यामुळे सर्व भुर्दंड ऊस उत्पादकांनाच सोसावा लागतो. यामुळेच शेतकरी पाणी मागणी अर्ज भरून देण्यास टाळाटाळ करतात. परंतु आता दोन्ही योजनांच्या लाभक्षेत्रातील ५0 टक्के पाणी मागणी अर्ज प्राप्त झाल्याशिवाय आवर्तन सुरू करणार नाही, अशी आडमुठे भूमिका शासनाने घेतली आहे. यामुळे योजनांचे कार्यकारी अभियंता तसेच वरिष्ठ अधिकारी ५0 टक्के मागणी अर्ज प्राप्त होण्यापूर्वी आवर्तन देण्याचे धाडस करण्यास तयार नाहीत.यापूर्वी ५0 टक्के मागणी अर्ज प्राप्त होण्यापूर्वी आवर्तन सुरू केले जात होते. माजी पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम ‘शेतीसाठी विनाविलंब पाणी सोडा, असे आदेश देत होते. पाणी मागणी अर्ज संबंधित गावांमध्ये उपलब्ध केले आहेत. परंतु अर्ज भरण्यासाठी शेतकरी टाळाटाळ करीत आहेत. (वार्ताहर)कारखान्यांतर्फे वसुलीताकारी आणि टेंभू या दोन्ही योजनांची वसुली फक्त साखर कारखान्यांच्या माध्यमातून होत आहे. सिंचन योजना आणि साखर कारखाने परस्परावलंबी असल्याने एकमेकांना सहकार्य करतात. कारखाने वगळता पाणीपट्टी वसुलीची अन्य कोणतीही सक्षम यंत्रणा योजनांकडे नाही. ताकारी आणि टेंभू या दोन्ही योजनांसाठी जादा कर्मचारी नेमणूक करून पारदर्शक पाणीपट्टी आकारणी केली पाहिजे. याशिवाय योग्य दराने व सर्व पिकांची पाणीपट्टी वसुलीही केली पाहिजे.