शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

आष्ट्यात प्रतीक पाटील यांच्या हस्ते ट्रान्सफार्मरचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:18 IST

पाच आंबा पाणीपुरवठा संस्थेच्या ट्रान्सफार्मरचे उद्घाटन युवक नेते प्रतीक पाटील यांच्याहस्ते झाले. यावेळी संग्राम फडतरे, विराज शिंदे, माणिक शेळके ...

पाच आंबा पाणीपुरवठा संस्थेच्या ट्रान्सफार्मरचे उद्घाटन युवक नेते प्रतीक पाटील यांच्याहस्ते झाले. यावेळी संग्राम फडतरे, विराज शिंदे, माणिक शेळके उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टा : आष्टा (ता. वाळवा) येथील पाचआंबा सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या योजनेवरील मोटारसाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या प्रयत्नाने जिल्हा नियोजनमधून नवीन ट्रान्सफॉर्मर उभारण्यात आला. त्याचे लोकार्पण युवक नेते प्रतीक जयंत पाटील यांच्या हस्ते झाले.

यावेळी राजारामबापू साखर कारखान्याचे संचालक विराज शिंदे, दिलीप वयाणी, माणिक शेळके, संग्राम फडतरे, रघुनाथ जाधव, अर्जुन माने, दीपक मेथे, भीमराव मस्के, आनंदा लवटे, तानाजी घाडगे, विनोद चव्हाण, नागनाथ घाडगे, संदीप लवटे, व्यवस्थापक गुरुनाथ कुलकर्णी, भागातील सर्व शेतकरी उपस्थित होते.

यावेळी प्रतीक पाटील म्हणाले, लोकनेते राजारामबापू पाटील व मंत्री जयंत पाटील यांच्या प्रयत्नांमुळे आष्टा शहरासह तालुक्यातील शेती ओलिताखाली आली आहे. पाच आंबा पाणीपुरवठा संस्थेच्या कार्यक्षेत्रातील काही जमिनींना पाणीपुरवठा करण्यामध्ये अडथळा येत होता. या ट्रान्सफॉर्मरमुळे त्या भागातील शेतकऱ्यांचा पाणी पाळीतील अंतर कमी होईल शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.

संस्थेचे अध्यक्ष माणिक शेळके यांनी प्रास्ताविक केले, १५०० एकर कमांड एरिया व १२६० एकर तारण क्षेत्र असणारे ही संस्था गेली ३० ते ३५ वर्षे मंत्री जयंत पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली अविरत व यशस्वी वाटचाल करत आहे. या पाणीपुरवठा संस्थेमुळे आष्टा पश्चिम भागातील माळरानाचे नंदनवन झाले आहे, या संस्थेमुळे शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावला आहे. यावेळी सर्व शेतकरी उपस्थित होते.