शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
6
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
7
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
8
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
9
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
10
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
11
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
12
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
13
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
14
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
15
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
16
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
17
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
18
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
19
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
20
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार

गाईला राष्ट्रीय पशू घोषित करा--धार्मिक सलोखा सर्वांनीच राखला पाहिजे: इमाम उमेरअहमद इलियासी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 00:41 IST

गाय हिंदूंच्या धार्मिक आस्थेचा विषय असल्याने मुस्लिमांनीही त्याचा सन्मान केला पाहिजे. केंद्र सरकारने गाईला राष्ट्रीय पशू घोषित करावे,

गाय हिंदूंच्या धार्मिक आस्थेचा विषय असल्याने मुस्लिमांनीही त्याचा सन्मान केला पाहिजे. केंद्र सरकारने गाईला राष्ट्रीय पशू घोषित करावे, अशी मागणी अखिल भारतीय इमाम संघटनेचे अध्यक्ष डॉ. इमाम उमेरअहमद इलियासी (दिल्ली) यांनी केली. मिरजेतील मीरासाहेब दर्ग्यास भेट देण्यासाठी आलेल्या इमाम इलियासी यांच्याशी मुस्लिमांच्या प्रश्नांबाबत साधलेला थेट संवाद...प्रश्न : गोरक्षेच्या नावावर देशात सुरू असलेल्या हिंसाचाराबाबत तुमचे काय मत आहे?उत्तर : गोरक्षा हा धार्मिक आस्थेचा विषय आहे. या विषयाशी हिंदूंची आस्था जोडलेली असल्याने मुस्लिमांनीही त्याचा सन्मान केला पाहिजे. मुस्लिम गाय कापत नाहीत व खात नाहीत. याबाबत केवळ अपप्रचार सुरू आहे. केंद्र शासनाने गाईला राष्टÑीय पशुचा दर्जा देऊन गाईचे संरक्षण करावे. आमची त्यास कोणतीही हरकत नाही. मुस्लिमांनी हिंदूंसोबत धार्मिक सलोखा टिकवून त्यांचा आदर केल्यास हिंदूंकडूनही त्यांना असेच प्रेम मिळेल, हे त्यांनी लक्षात ठेवावे.प्रश्न : केंद्रातील भाजप शासनाचा कारभार कसा आहे?उत्तर : केंद्रातील भाजप सरकारचा कारभार ठीक सुरू आहे. पंतप्रधान मोदी यांनी ‘सबका साथ, सबका विकास’ अशी घोषणा दिली होती. या घोषणेप्रमाणे कारभार केला पाहिजे. सर्वधर्मियांचा विकास व्हावा, यासाठी सर्वांचेच चांगले विचार असले पाहिजेत. यासाठी पंतप्रधानांना पाठिंबा दिला पाहिजे. या घोषणेबाबत टीका-टिप्पणी करून जाती-धर्मात विभाजन करण्याचे काम राजकीय मंडळी करीत आहेत. मात्र धर्माचे व धर्मगुरूंचे काम सर्वांना एकत्र आणण्याचे व जातीय सलोखा कायम ठेवण्याचे आहे. धर्म, धार्मिक आस्था, परंपरा वेगळ्या असल्या तरी, आम्ही सर्वधर्मीय एकत्र आहोत. देशाला एकतेची आवश्यकता आहे.प्रश्न : देशातील मशिदींच्या इमामांची काय अवस्था आहे?उत्तर : भारतात सुमारे साडेपाच लाख मशिदी व साडेसात लाख मंदिरे आहेत. मशिदीत धर्मगुरू म्हणून काम करणाºया इमामांच्या वेतनाची समस्या कायम आहे. सर्वोच्च न्यायालयाने इमामांना प्रथम श्रेणी अधिकाºयाचा दर्जा देऊन आठव्या वेतन आयोगाप्रमाणे दरमहा ८० हजार रूपये वेतन देण्याचा आदेश दिला आहे. मात्र या आदेशाची शासनाकडून अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय लागू करावा यासाठी इमाम असोसिएशनकडून पाठपुरावा सुरू आहे.प्रश्न : तीन तलाक विधेयकाबाबत तुमचे मत काय आहे?उत्तर : तीन तलाकबाबत देशात विनाकारण चर्चा सुरू आहे. याऐवजी विवाहाची व पती-पत्नीला जोडण्याबाबत चर्चा झाली पाहिजे. तीन तलाक विधेयकाचा सरकारचा निर्णय आहे; मात्र या विधेयकात सुधारणा करून स्त्री व पुरूष या दोघांनाही त्याचा लाभ होईल, अशा तरतुदी केल्या पाहिजेत.प्रश्न : मुस्लिमांचे हितरक्षण करणारा कोणता पक्ष आहे?उत्तर : मुस्लिमांसाठी सर्वच पक्ष चांगले आहेत. पक्ष सत्तेवर येतात-जातात, मात्र राष्टÑहित व देशाला विकासाकडे नेणाºया राजकीय पक्षांना समर्थन दिले पाहिजे. मात्र राजकीय पक्ष जाती-धर्मांत विभाजन व ध्रुवीकरणाचे राजकारण करतात. राम मंदिराचा प्रश्न सोडविण्यासाठी धर्म हिताऐवजी राष्टÑहिताचा निर्णय घ्यावा. केवळ एक धर्म खूश होईल असा निर्णय घेण्यात येऊ नये. देशाच्या विकासासाठी धार्मिक एकता आवश्यक आहे, हे सर्वांनी ध्यानात घ्यावे.प्रश्न : काश्मीर समस्येबाबत कोणती उपययोजना केली पाहिजे ?उत्तर : काश्मीरमध्ये शांततेसाठी पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेऊन विभाजनवादी नेत्यांवर शासनाने कारवाई करावी. जोपर्यंत या उपययोजना होत नाहीत, तोपर्यंत काश्मीरमध्ये शांतता निर्माण होणार नाही. काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचे समर्थन करणाºया फारूख अब्दुल्ला यांच्यासारख्यांनी पाकिस्तानात निघून जावे. काश्मीर हा भारताचा हिस्सा आहे व यापुढेही राहील.                                                                                                                                              - सदानंद औंधे, मिरज