शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

आळसंदला २२ रोजी ग्रामीण साहित्य संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 23:30 IST

आळसंद : खानापूर तालुक्यातील आळसंद येथे श्रीमंत खानाजीराव जाधव दिशा संस्कृती, कला प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने बुधवार दि. २२ मे ...

आळसंद : खानापूर तालुक्यातील आळसंद येथे श्रीमंत खानाजीराव जाधव दिशा संस्कृती, कला प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने बुधवार दि. २२ मे रोजी पहिल्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास गोरड यांनी दिली.यावेळी गोरड म्हणाले, संमेलन चार सत्रात होणार आहे. सकाळी ९ वाजता सामाजिक कार्यकर्ते संपतराव पवार यांच्याहस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी ड्रीम सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा अनुराधादेवी प्रभाकर देशमुख या प्रमुख पाहुण्या आहेत. सकाळी ११ वाजता द्वितीय सत्रात कविसंमेलन होणार आहे. अध्यक्षपदी अंधकवी चंद्रकांत देशमुखे आहेत. दयासागर बन्ने, वासंती मेरू, स्वाती शिंदे-पवार, एम. बी. जमादार सहभागी होणार आहेत. दुपारी ३ वाजता मुख्य कार्यक्रम आहे. प्रसिध्द साहित्यिक व ज्येष्ठ विचारवंत डॉ. बाबूराव गुरव यांचे अध्यक्षीय भाषण आहे. अरूण चव्हाण, देवदत्त राजोपाध्ये, रघुराज मेटकरी प्रमुख उपस्थित राहणार आहेत.यावेळी शेतीक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच काव्य स्पर्धेतील प्रथम क्रमांकांना परितोषिक देण्यात येणार आहे. यावेळी अरूण चव्हाण, रघुराज मेटकरी यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. चौथ्या सत्रात प्रा. विश्वनाथ गायकवाड, शांतिनाथ मांगले यांचे कथाकथन होणार आहे.संग्राम जाधव, खंडेराव जाधव, तानाजी जाधव, दीपक सावंत, अशोक देशमुख, रत्नकुमार नरूले, सोनाली शेटे, अशोक जाधव आदी संयोजन करत आहेत.