फोटो : गोटखिंडी (ता. वाळवा) येथील जिल्हा बँक शाखेचे नूतन जागेत स्थलांतर झाले त्याचे उद्घाटन दिलीप पाटील यांच्याहस्ते झाले. यावेळी सरपंच विजय लोंढे, सागर डवंग आदी उपस्थित होते.
गोटखिंडी : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत कर्जवसुलीमध्ये इतर तालुक्यांपेक्षा वाळवा तालुक्यात अग्रेसर आहे. ही वसुली ९५ टक्के आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी दिली.
गोटखिंडी (ता. वाळवा) येथील जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेचे विकास सोसायटीच्या नवीन इमारतीमध्ये स्थलांतर करण्यात आले. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. इस्लामपूरचे नगरसेवक चिमण डांगे, सरपंच विजय लोंढे, सागर डवंग यांची प्रमुख उपस्थिती होती.
दिलीप पाटील म्हणाले, जिल्हा बँकेचे कर्जवितरण ही वाळवा तालुक्यात सर्वाधिक आहे. त्याचप्रमाणे वसूल ही चांगला आहे. गोटखिंडी विकास सोसायटीचा ही कर्जवसुली उत्तम आहे. गोटखिंडीसाठी एटीएम मशीन देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी पंचायत समिती सदस्य आनंदराव पाटील, धैर्यशील थोरात, एन. जी. पाटील, सुभाष शिंगटे, प्रकाश एटम, आनंदराव टिबे, भानुदास पाटील, बँकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.