शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

‘अमृत’च्या दरवाढीवरून स्थायी समितीत वादंग, सांगली महापालिका : नगरसेवक आक्रमक; वाढीव दराचा बोजा कुणावर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 00:26 IST

सांगली : मिरजेच्या अमृत पाणी योजनेच्या वाढीव दराच्या निविदेमुळे महापालिकेवर साडेबारा कोटींचा बोजा पडणार आहे. या वाढीव दराची जबाबदारी कोणाची?

सांगली : मिरजेच्या अमृत पाणी योजनेच्या वाढीव दराच्या निविदेमुळे महापालिकेवर साडेबारा कोटींचा बोजा पडणार आहे. या वाढीव दराची जबाबदारी कोणाची? असा सवाल करीत गुरुवारी महापालिकेच्या स्थायी समिती सभेत नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली. वाढीव दराची जबाबदारी प्रशासनावर टाका, अशी मागणीही करण्यात आली. तर आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी वाढीव दराबाबत शासनाशी पुन्हा पत्रव्यवहार केल्याचे सांगत विषयाला बगल देण्याचा प्रयत्न केला.

महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सभापती बसवेश्वर सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली झाली. आयुक्तांच्या उपस्थितीमुळे सभा तब्बल तीन तास सुरू होती. स्वाभिमानीचे नगरसेवक शिवराज बोळाज यांनी अमृत योजनेच्या निविदेचा प्रश्न उपस्थित केला. बोळाज म्हणाले की, मिरजेच्या अमृत योजनेत महापालिकेला २६ कोटी रुपये हिस्सा घालावा लागणार आहे. त्यात साडेआठ टक्के जादा दराची निविदा आल्याने आणखी साडेबारा कोटींचा बोजा पडणार आहे.

सध्या महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नाही. त्यामुळे वाढीव निविदेला महासभा, स्थायी समितीने विरोध केला आहे. स्थायी समितीने तर या ठेकेदारीसंदर्भात ठरावच कायम केलेला नाही. असे असताना प्रशासनाने परस्पर ठेकेदाराला वर्कआॅर्डरही दिली आहे. तांत्रिक काहीच न समजणाºया उपायुक्तांनी ती वर्कआॅर्डर दिली. साडेबारा कोटीच्या वाढीव दराची जबाबदारी कोणाची? असा सवाल केला.

यावर आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी १४ व्या वित्त आयोगातून हा निधी वर्ग करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यावरून पुन्हा वाद उफाळला. सातपुते, बोळाज म्हणाले, महापालिकेला स्वत:चा हिस्सा यातूनच घालायचा आहे. यापूर्वीच साडेपाच कोटी रुपये वर्ग केले आहेत. पुन्हा हा बोजा कोठून सोसणार? असा सवाल केला. खेबूडकर म्हणाले, वाढीव दरासंदर्भात शासनाकडे प्रस्ताव पाठवू, अशी ग्वाही देत सदस्यांची बोळवण केली. अखेर सदस्यांनी वाढीव खर्चाची जबाबदारी स्थायी समितीवर येऊ नये, प्रशासनावरच सोपवावी, अशी मागणी केली.महिला स्वच्छतागृहाची : कामे ठप्पचरोहिणी पाटील यांनी महिला स्वच्छतागृहाचा प्रश्न मांडला. महिलांसाठी ४२ स्वच्छतागृहे मंजूर झाली. त्यापैकी केवळ आंबेडकर वसतिगृहाजवळील काम सुरू आहे. उर्वरित दहा ते बारा स्वच्छतागृहांची कामे रखडली आहेत. स्वच्छतागृहाच्या जागेबाबत विरोध होत आहे. त्यावर काय निर्णय घेणार, असा सवाल केला. याबाबत आयुक्तांनी शुक्रवारी बैठक घेण्याचे आश्वासन दिले.स्थायी समितीतील चर्चाशास्त्री उद्यानाला कंपाऊंडचे साडेसहा लाखांचे काम व गुलमोहर कॉलनीतील उद्यान विकसित करण्याचा अवलोकनार्थ आलेला प्रस्ताव सदस्यांनी फेटाळलाहॉटेल, रेस्टॉरंटचा ओला व सुका कचरा गोळा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता, जागा निश्चितीबाबत महासभेत धोरणात्मक निर्णय होणादिवाबत्ती विभागाकडील कामचुकार कर्मचाºयांची बदली करण्याची मागणी. कामे न केल्यास कर्मचाºयांना परत पाठवून ठेका पद्धतीने काम करण्याचे आयुक्तांचे आश्वासनविश्रामबाग परिसरातील दत्तनगर, पार्श्वनाथ कॉलनीतील अपुºया पाणीपुरवठ्याबाबत सात दिवसात नियोजन करण्याचे आदेशशंभर फुटी रस्त्यावरील बंद स्ट्रीट लाईट व भाडेकराराचा अहवाल मागविलामतदार नोंदणीमुळे कर्मचाºयांची अपुरी संख्या असल्याने चौमाही अंदाजपत्रक सादर करण्यास उशीर. २१ डिसेंबरपर्यंत अंदाजपत्रक सादर करण्याची लेखापालांची ग्वाहीआठ महिने प्रश्न प्रलंबिततीन कोटी रुपयांच्या रस्त्यांसह विविध विकासकामांच्या निविदांना प्रतिसाद येत नाही. आठ महिने हा प्रश्न रखडला असूनही प्रशासन सुस्तच असल्याबद्दल नगसेवक दिलीप पाटील यांनी अधिकाºयांना धारेवर धरले. या कामाबाबत प्रशासनाने काहीच निर्णय घेतलेला नाही. ही कामे स्थायी समितीकडे पाठविण्याची मागणी केली. निवडणूक तोंडावर असल्याने आम्ही जनतेला काय उत्तर द्यायचे, असे ते म्हणाले. आयुक्तांनी आठ दिवसांची मुदत द्या, या कालावधित निविदांचा प्रश्नावर तोडगा निघाला नाही, तर हा विषय स्थायी समितीकडे पाठवू, असे आश्वासन दिले.