शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

Sangli: त्रिमूर्तीमधील शेवटची कडी निखळली, कष्टकऱ्यांच्या चळवळीचा त्रिवेणी संगम आटला

By अविनाश कोळी | Updated: December 29, 2023 14:28 IST

गल्लीपासून विधानसभेपर्यंत शरद पाटील, संभाजी पवार, व्यंकाप्पा पत्की यांचा होता दबदबा 

अविनाश कोळीसांगली : मैत्री व रक्ताच्या नात्यापेक्षा राजकारणाला महत्त्व देणाऱ्यांच्या काळात सांगलीतील तीन नेत्यांनी राजकारणात असूनही मैत्रीला उच्च स्थान दिले. पैसा, प्रतिष्ठा आणि राजकारणापेक्षा तत्त्वनिष्ठा, चळवळ जपत आयुष्यभर व्रतस्थ राहिले. सांगलीतील या तीन माजी आमदारांची वाटचाल म्हणूनच राजकारणातील आदर्श मानली जाते. अशा समृद्ध राजकीय परंपरेतील शेवटची कडी प्रा. शरद पाटील यांच्या निधनाने निखळली.

राज्याच्या राजकारणातच नव्हे तर देशाच्या राजकीय पटलावरही दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा दबदबा होता. या काळातच ॲड. व्यंकाप्पा पत्की, बिजलीमल्ल संभाजी पवार व प्रा. शरद पाटील या त्रिमूर्तींचा उदय झाला. काँग्रेसच्या बालेकिल्ल्याकडे बघण्याचीही हिंमत ज्या काळात कोणाचीही होत नव्हती, त्या काळात या तिन्ही नेत्यांनी प्रस्थापितांना हादरे देऊन राज्याच्या राजकीय पटलावर आपल्या नावाचा डंका वाजवला. जनता दलाच्या माध्यमातून त्यांनी प्रस्थापितांना हादरे दिले.तिन्ही नेत्यांनी आमदारकीपर्यंत मजल मारली. पत्की हे विधान परिषदेवर तर संभाजी पवार व शरद पाटील यांनी जनतेतून निवडून येत विधानसभा गाठली. विधानसभेत कष्टकरी, वंचितांचे प्रश्न मांडून तिघांनीही राज्यात दबदबा निर्माण केला. जनता दलाचे प्रदेशाध्यक्षपद सांगलीच्या दोन्ही नेत्यांनी भूषविले. भाजपामध्ये गेल्यानंतर संभाजी पवारांना प्रदेश उपाध्यक्षपदही मिळाले.

राजकारणात जपली मैत्रीसंभाजी पवारांना ताकद देऊन त्यांना आमदार करण्यात व्यंकाप्पा पत्कींची मैत्री कारणीभूत ठरली. त्यानंतर याच मैत्रीचा धागा जपत व्यंकाप्पा पत्कींना विधान परिषदेवर घेण्यासाठी संभाजी पवार यांनी ताकद लावली. राजकारणातल्या सच्च्या मैत्रीचा अध्याय या तिघा नेत्यांनी लिहिला. या मैत्रीतली पहिली कडी व्यंकाप्पा पत्कींच्या माध्यमातून २०१४ मध्ये निखळली. त्यानंतर २०२१ मध्ये संभाजी पवार यांचे निधन झाले. या परंपरेची तिसरी कडी नुकतीच प्रा. शरद पाटील यांच्या निधनाने निखळली.

प्रस्थापितांना हादरे देणारे राजकारण..

  • १९८५ पासून १९९९ पर्यंत या त्रिमूर्तींचा सांगली, मिरजेच्या राजकारणात मोठा दबदबा राहिला. वसंतदादांच्या हयातीत त्यांचे पुतणे विष्णुआण्णा पाटील यांना पराभूत करुन संभाजी पवार आमदार झाले.
  • दादांच्या पश्चात शरद पाटील, व्यंकाप्पा पत्की आमदार झाले. शेरीनाला, गुंठेवारी अशा ज्वलंत प्रश्नांसह हातगाडी विक्रेते, हमाल व अन्य कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवरून त्यांनी रान पेटविले होते.
  • प्रस्थापित राजकारण्यांना हादरे देत त्यांच्या राजकारणाची वाटचाल सुरू झाली. पक्ष बदलले तरी कष्टकऱ्यांच्या प्रश्नावर ते लढतच राहिले.
टॅग्स :Sangliसांगली