शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Sangli: त्रिमूर्तीमधील शेवटची कडी निखळली, कष्टकऱ्यांच्या चळवळीचा त्रिवेणी संगम आटला

By अविनाश कोळी | Updated: December 29, 2023 14:28 IST

गल्लीपासून विधानसभेपर्यंत शरद पाटील, संभाजी पवार, व्यंकाप्पा पत्की यांचा होता दबदबा 

अविनाश कोळीसांगली : मैत्री व रक्ताच्या नात्यापेक्षा राजकारणाला महत्त्व देणाऱ्यांच्या काळात सांगलीतील तीन नेत्यांनी राजकारणात असूनही मैत्रीला उच्च स्थान दिले. पैसा, प्रतिष्ठा आणि राजकारणापेक्षा तत्त्वनिष्ठा, चळवळ जपत आयुष्यभर व्रतस्थ राहिले. सांगलीतील या तीन माजी आमदारांची वाटचाल म्हणूनच राजकारणातील आदर्श मानली जाते. अशा समृद्ध राजकीय परंपरेतील शेवटची कडी प्रा. शरद पाटील यांच्या निधनाने निखळली.

राज्याच्या राजकारणातच नव्हे तर देशाच्या राजकीय पटलावरही दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा दबदबा होता. या काळातच ॲड. व्यंकाप्पा पत्की, बिजलीमल्ल संभाजी पवार व प्रा. शरद पाटील या त्रिमूर्तींचा उदय झाला. काँग्रेसच्या बालेकिल्ल्याकडे बघण्याचीही हिंमत ज्या काळात कोणाचीही होत नव्हती, त्या काळात या तिन्ही नेत्यांनी प्रस्थापितांना हादरे देऊन राज्याच्या राजकीय पटलावर आपल्या नावाचा डंका वाजवला. जनता दलाच्या माध्यमातून त्यांनी प्रस्थापितांना हादरे दिले.तिन्ही नेत्यांनी आमदारकीपर्यंत मजल मारली. पत्की हे विधान परिषदेवर तर संभाजी पवार व शरद पाटील यांनी जनतेतून निवडून येत विधानसभा गाठली. विधानसभेत कष्टकरी, वंचितांचे प्रश्न मांडून तिघांनीही राज्यात दबदबा निर्माण केला. जनता दलाचे प्रदेशाध्यक्षपद सांगलीच्या दोन्ही नेत्यांनी भूषविले. भाजपामध्ये गेल्यानंतर संभाजी पवारांना प्रदेश उपाध्यक्षपदही मिळाले.

राजकारणात जपली मैत्रीसंभाजी पवारांना ताकद देऊन त्यांना आमदार करण्यात व्यंकाप्पा पत्कींची मैत्री कारणीभूत ठरली. त्यानंतर याच मैत्रीचा धागा जपत व्यंकाप्पा पत्कींना विधान परिषदेवर घेण्यासाठी संभाजी पवार यांनी ताकद लावली. राजकारणातल्या सच्च्या मैत्रीचा अध्याय या तिघा नेत्यांनी लिहिला. या मैत्रीतली पहिली कडी व्यंकाप्पा पत्कींच्या माध्यमातून २०१४ मध्ये निखळली. त्यानंतर २०२१ मध्ये संभाजी पवार यांचे निधन झाले. या परंपरेची तिसरी कडी नुकतीच प्रा. शरद पाटील यांच्या निधनाने निखळली.

प्रस्थापितांना हादरे देणारे राजकारण..

  • १९८५ पासून १९९९ पर्यंत या त्रिमूर्तींचा सांगली, मिरजेच्या राजकारणात मोठा दबदबा राहिला. वसंतदादांच्या हयातीत त्यांचे पुतणे विष्णुआण्णा पाटील यांना पराभूत करुन संभाजी पवार आमदार झाले.
  • दादांच्या पश्चात शरद पाटील, व्यंकाप्पा पत्की आमदार झाले. शेरीनाला, गुंठेवारी अशा ज्वलंत प्रश्नांसह हातगाडी विक्रेते, हमाल व अन्य कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवरून त्यांनी रान पेटविले होते.
  • प्रस्थापित राजकारण्यांना हादरे देत त्यांच्या राजकारणाची वाटचाल सुरू झाली. पक्ष बदलले तरी कष्टकऱ्यांच्या प्रश्नावर ते लढतच राहिले.
टॅग्स :Sangliसांगली