शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

महापुरानंतर मार्केट यार्डात व्यवहार सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 23:46 IST

सांगली : महापुराच्या प्रलयानंतर बाजारपेठ हळूहळू सावरत असली तरी, मार्केट यार्डातील व्यवहार मात्र, सुरळीत सुरू झाले आहेत. राज्यासह शेजारच्या ...

सांगली : महापुराच्या प्रलयानंतर बाजारपेठ हळूहळू सावरत असली तरी, मार्केट यार्डातील व्यवहार मात्र, सुरळीत सुरू झाले आहेत. राज्यासह शेजारच्या कर्नाटकातून येणाऱ्या शेतीमालाच्या सौद्यासह इतर व्यवहार सुरू झाले आहेत. मार्केट यार्ड वगळता शहरातील इतर बाजारपेठ मात्र अद्यापही पुराच्या सावटाखालीच असल्याचे चित्र आहे.सलग सहा दिवस पुराच्या पाण्याखाली शहरातील ७० टक्क्यांहून अधिक भाग होता. त्यामुळे बाजारपेठेचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. शहरातील मार्केट यार्ड व गणपतीपेठ परिसरात सर्वाधिक व्यवहार होतात. यातील मार्केट यार्डाला पुराचा फटका बसला नसला तरी, तेथील व्यवहारावर परिणाम झाला होता. मालाच्या आवक-जावक उलाढालीवरही परिणाम झाल्याने मार्केट यार्डात दररोज अडीच कोटींचे नुकसान झाले होते.या कालावधित बेदाणा, हळद, गुळासह इतर शेतीमालाचे सौदेही बंद होते. त्यामुळे शेतकऱ्यांनाही नुकसान सोसावे लागले होते. मार्केट यार्डाबरोबरच कोल्हापूर रोडवर असलेला विष्णुअण्णा फळ मार्केट परिसर पाण्याखाली गेल्याने तेथील व्यवहार थांबले होते. या कालावधित कांदा, बटाट्याचे सौदे मार्केट यार्डात होत होते. तरीही फळ मार्केटमधील बहुतांश सौद्यावर अद्यापही परिणाम जाणवत आहे. मार्केट यार्डात अपवाद वगळता वर्षभर हळद, बेदाण्याचे सौदे सुरू असतात. पुराच्या कालावधित आठवडाभर हे सौदे बंद होते. सांगली शहराला जोडणारे प्रमुख रस्ते पाण्याखाली असल्याने बाहेरच्या व्यापाºयांना सांगलीत येणे शक्य नव्हते व खरेदी केलेला मालही नेता येणे शक्य नसल्याने, ही स्थिती निर्माण झाली होती. सध्या बाजारपेठेतील आवक मर्यादित असून त्यास मागणीही त्याच प्रमाणात आहे.