शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

महापुरानंतर मार्केट यार्डात व्यवहार सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 23:46 IST

सांगली : महापुराच्या प्रलयानंतर बाजारपेठ हळूहळू सावरत असली तरी, मार्केट यार्डातील व्यवहार मात्र, सुरळीत सुरू झाले आहेत. राज्यासह शेजारच्या ...

सांगली : महापुराच्या प्रलयानंतर बाजारपेठ हळूहळू सावरत असली तरी, मार्केट यार्डातील व्यवहार मात्र, सुरळीत सुरू झाले आहेत. राज्यासह शेजारच्या कर्नाटकातून येणाऱ्या शेतीमालाच्या सौद्यासह इतर व्यवहार सुरू झाले आहेत. मार्केट यार्ड वगळता शहरातील इतर बाजारपेठ मात्र अद्यापही पुराच्या सावटाखालीच असल्याचे चित्र आहे.सलग सहा दिवस पुराच्या पाण्याखाली शहरातील ७० टक्क्यांहून अधिक भाग होता. त्यामुळे बाजारपेठेचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. शहरातील मार्केट यार्ड व गणपतीपेठ परिसरात सर्वाधिक व्यवहार होतात. यातील मार्केट यार्डाला पुराचा फटका बसला नसला तरी, तेथील व्यवहारावर परिणाम झाला होता. मालाच्या आवक-जावक उलाढालीवरही परिणाम झाल्याने मार्केट यार्डात दररोज अडीच कोटींचे नुकसान झाले होते.या कालावधित बेदाणा, हळद, गुळासह इतर शेतीमालाचे सौदेही बंद होते. त्यामुळे शेतकऱ्यांनाही नुकसान सोसावे लागले होते. मार्केट यार्डाबरोबरच कोल्हापूर रोडवर असलेला विष्णुअण्णा फळ मार्केट परिसर पाण्याखाली गेल्याने तेथील व्यवहार थांबले होते. या कालावधित कांदा, बटाट्याचे सौदे मार्केट यार्डात होत होते. तरीही फळ मार्केटमधील बहुतांश सौद्यावर अद्यापही परिणाम जाणवत आहे. मार्केट यार्डात अपवाद वगळता वर्षभर हळद, बेदाण्याचे सौदे सुरू असतात. पुराच्या कालावधित आठवडाभर हे सौदे बंद होते. सांगली शहराला जोडणारे प्रमुख रस्ते पाण्याखाली असल्याने बाहेरच्या व्यापाºयांना सांगलीत येणे शक्य नव्हते व खरेदी केलेला मालही नेता येणे शक्य नसल्याने, ही स्थिती निर्माण झाली होती. सध्या बाजारपेठेतील आवक मर्यादित असून त्यास मागणीही त्याच प्रमाणात आहे.