शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

प्रस्तावित वीज कायदा घातक : मोहन शर्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 23:54 IST

तालुका पातळीवर अनेक फ्रॅन्चाईझी कंपन्या कार्यरत राहतील. वीज वितरण क्षेत्र खासगी भांडवलदार आणि कॉपोर्रेट कंपन्यांना देऊन खासगीकरण करण्याचा प्रयोग महाराष्ट्रात सतत होत आहे. तरीही मुंब्रा-शिळ-कळवा आणि मालेगाव विभागाचे वीज वितरण क्षेत्र खासगी भांडवलदार व कॉर्पोरेट कंपन्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देवीज मंडळाच्या खासगीकरणाचा केंद्राचा डाव; संपाचा इशारा

सांगली : केंद्र सरकारचा प्रस्तावित वीज कायदा अतिशय घातक आहे. तो लागू झाला तर नियामक आयोगाचे अधिकार काढले जातील. खासगी वीज निर्मिती कंपन्यांना खर्चावर आधारित वीज दर ठरविण्याचा अधिकार दिला जाईल. नफा देणारे आणि तोटा देणारे वीज ग्राहक विभागले जातील. नफ्यातील ग्राहक खासगी कंपन्यांना देऊन सरसकट खासगीकरणाचा हा डाव केंद्र शासनाचा असून, तो हाणून पाडला जाईल, असा इशारा वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष मोहन शर्मा यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिला.

ते म्हणाले की, केंद्राच्या प्रस्तावित वीज कायद्याला यापूर्वी विरोध केला आहे. पुन्हा वीज कायदा २०१८ हा घातक कायदा लागू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. खासगी निर्मिती कंपन्यांना वीज दराचे अधिकार दिले जातील. नियामक आयोगाला अधिकार राहणार नाहीत. तालुका पातळीवर अनेक फ्रॅन्चाईझी कंपन्या कार्यरत राहतील. वीज वितरण क्षेत्र खासगी भांडवलदार आणि कॉपोर्रेट कंपन्यांना देऊन खासगीकरण करण्याचा प्रयोग महाराष्ट्रात सतत होत आहे. तरीही मुंब्रा-शिळ-कळवा आणि मालेगाव विभागाचे वीज वितरण क्षेत्र खासगी भांडवलदार व कॉर्पोरेट कंपन्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे.

ते म्हणाले की, वीज उद्योगात सध्या पुनर्रचनेच्या नावाखाली २० हजार मंजूर पदे कमी करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याला विरोध राहील. कामाच्या सुधारणेला आमचा विरोध नाही. वीज ग्राहक वाढले असून त्याप्रमाणात कर्मचारी संख्या न वाढवता, उलट कपात करण्याच्या धोरणाविरोधात संप पुकारला जाईल. राज्यात ३२ हजार कंत्राटी कामगारांना कायम करण्याची मागणी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानुसार समान काम-समान वेतन याची अंमलबजावणी वीज उद्योगात झाली पाहिजे.पेन्शन योजनेचा प्रश्न २००९ पासून प्रलंबित आहे. मंत्री समितीने २००९ मध्ये सहमती देऊनही त्याची अंमलबजावणी झाली नाही.

राज्यातील महानिर्मितीचे १६ संच बंदराज्यात महानिर्मितीचे ३३ वीज निर्मिती संच असून, त्यापैकी परळी, नाशिक, भुसावळ, पारस, चंद्रपूर आदी १६ ठिकाणचे संच बंद आहेत. या संचांमधून २.६५ पैसे युनिटने वीज महावितरणला मिळत होती. मात्र महावितरण कंपनी खासगी कंपन्यांकडून सध्या ३ रुपये ते ३ रुपये ९५ पैसे दराने वीज खरेदी करीत आहे. भांडवलदारांना जगविण्यासाठीचा खर्च ग्राहकांवर कशासाठी टाकला जात आहे, असा सवाल मोहन शर्मा यांनी केला.

टॅग्स :Sangliसांगलीmahavitaranमहावितरण