शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

प्रस्तावित वीज कायदा घातक : मोहन शर्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 23:54 IST

तालुका पातळीवर अनेक फ्रॅन्चाईझी कंपन्या कार्यरत राहतील. वीज वितरण क्षेत्र खासगी भांडवलदार आणि कॉपोर्रेट कंपन्यांना देऊन खासगीकरण करण्याचा प्रयोग महाराष्ट्रात सतत होत आहे. तरीही मुंब्रा-शिळ-कळवा आणि मालेगाव विभागाचे वीज वितरण क्षेत्र खासगी भांडवलदार व कॉर्पोरेट कंपन्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देवीज मंडळाच्या खासगीकरणाचा केंद्राचा डाव; संपाचा इशारा

सांगली : केंद्र सरकारचा प्रस्तावित वीज कायदा अतिशय घातक आहे. तो लागू झाला तर नियामक आयोगाचे अधिकार काढले जातील. खासगी वीज निर्मिती कंपन्यांना खर्चावर आधारित वीज दर ठरविण्याचा अधिकार दिला जाईल. नफा देणारे आणि तोटा देणारे वीज ग्राहक विभागले जातील. नफ्यातील ग्राहक खासगी कंपन्यांना देऊन सरसकट खासगीकरणाचा हा डाव केंद्र शासनाचा असून, तो हाणून पाडला जाईल, असा इशारा वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष मोहन शर्मा यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिला.

ते म्हणाले की, केंद्राच्या प्रस्तावित वीज कायद्याला यापूर्वी विरोध केला आहे. पुन्हा वीज कायदा २०१८ हा घातक कायदा लागू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. खासगी निर्मिती कंपन्यांना वीज दराचे अधिकार दिले जातील. नियामक आयोगाला अधिकार राहणार नाहीत. तालुका पातळीवर अनेक फ्रॅन्चाईझी कंपन्या कार्यरत राहतील. वीज वितरण क्षेत्र खासगी भांडवलदार आणि कॉपोर्रेट कंपन्यांना देऊन खासगीकरण करण्याचा प्रयोग महाराष्ट्रात सतत होत आहे. तरीही मुंब्रा-शिळ-कळवा आणि मालेगाव विभागाचे वीज वितरण क्षेत्र खासगी भांडवलदार व कॉर्पोरेट कंपन्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे.

ते म्हणाले की, वीज उद्योगात सध्या पुनर्रचनेच्या नावाखाली २० हजार मंजूर पदे कमी करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याला विरोध राहील. कामाच्या सुधारणेला आमचा विरोध नाही. वीज ग्राहक वाढले असून त्याप्रमाणात कर्मचारी संख्या न वाढवता, उलट कपात करण्याच्या धोरणाविरोधात संप पुकारला जाईल. राज्यात ३२ हजार कंत्राटी कामगारांना कायम करण्याची मागणी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानुसार समान काम-समान वेतन याची अंमलबजावणी वीज उद्योगात झाली पाहिजे.पेन्शन योजनेचा प्रश्न २००९ पासून प्रलंबित आहे. मंत्री समितीने २००९ मध्ये सहमती देऊनही त्याची अंमलबजावणी झाली नाही.

राज्यातील महानिर्मितीचे १६ संच बंदराज्यात महानिर्मितीचे ३३ वीज निर्मिती संच असून, त्यापैकी परळी, नाशिक, भुसावळ, पारस, चंद्रपूर आदी १६ ठिकाणचे संच बंद आहेत. या संचांमधून २.६५ पैसे युनिटने वीज महावितरणला मिळत होती. मात्र महावितरण कंपनी खासगी कंपन्यांकडून सध्या ३ रुपये ते ३ रुपये ९५ पैसे दराने वीज खरेदी करीत आहे. भांडवलदारांना जगविण्यासाठीचा खर्च ग्राहकांवर कशासाठी टाकला जात आहे, असा सवाल मोहन शर्मा यांनी केला.

टॅग्स :Sangliसांगलीmahavitaranमहावितरण