शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

प्रस्तावित वीज कायदा घातक : मोहन शर्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 23:54 IST

तालुका पातळीवर अनेक फ्रॅन्चाईझी कंपन्या कार्यरत राहतील. वीज वितरण क्षेत्र खासगी भांडवलदार आणि कॉपोर्रेट कंपन्यांना देऊन खासगीकरण करण्याचा प्रयोग महाराष्ट्रात सतत होत आहे. तरीही मुंब्रा-शिळ-कळवा आणि मालेगाव विभागाचे वीज वितरण क्षेत्र खासगी भांडवलदार व कॉर्पोरेट कंपन्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देवीज मंडळाच्या खासगीकरणाचा केंद्राचा डाव; संपाचा इशारा

सांगली : केंद्र सरकारचा प्रस्तावित वीज कायदा अतिशय घातक आहे. तो लागू झाला तर नियामक आयोगाचे अधिकार काढले जातील. खासगी वीज निर्मिती कंपन्यांना खर्चावर आधारित वीज दर ठरविण्याचा अधिकार दिला जाईल. नफा देणारे आणि तोटा देणारे वीज ग्राहक विभागले जातील. नफ्यातील ग्राहक खासगी कंपन्यांना देऊन सरसकट खासगीकरणाचा हा डाव केंद्र शासनाचा असून, तो हाणून पाडला जाईल, असा इशारा वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष मोहन शर्मा यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिला.

ते म्हणाले की, केंद्राच्या प्रस्तावित वीज कायद्याला यापूर्वी विरोध केला आहे. पुन्हा वीज कायदा २०१८ हा घातक कायदा लागू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. खासगी निर्मिती कंपन्यांना वीज दराचे अधिकार दिले जातील. नियामक आयोगाला अधिकार राहणार नाहीत. तालुका पातळीवर अनेक फ्रॅन्चाईझी कंपन्या कार्यरत राहतील. वीज वितरण क्षेत्र खासगी भांडवलदार आणि कॉपोर्रेट कंपन्यांना देऊन खासगीकरण करण्याचा प्रयोग महाराष्ट्रात सतत होत आहे. तरीही मुंब्रा-शिळ-कळवा आणि मालेगाव विभागाचे वीज वितरण क्षेत्र खासगी भांडवलदार व कॉर्पोरेट कंपन्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे.

ते म्हणाले की, वीज उद्योगात सध्या पुनर्रचनेच्या नावाखाली २० हजार मंजूर पदे कमी करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याला विरोध राहील. कामाच्या सुधारणेला आमचा विरोध नाही. वीज ग्राहक वाढले असून त्याप्रमाणात कर्मचारी संख्या न वाढवता, उलट कपात करण्याच्या धोरणाविरोधात संप पुकारला जाईल. राज्यात ३२ हजार कंत्राटी कामगारांना कायम करण्याची मागणी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यानुसार समान काम-समान वेतन याची अंमलबजावणी वीज उद्योगात झाली पाहिजे.पेन्शन योजनेचा प्रश्न २००९ पासून प्रलंबित आहे. मंत्री समितीने २००९ मध्ये सहमती देऊनही त्याची अंमलबजावणी झाली नाही.

राज्यातील महानिर्मितीचे १६ संच बंदराज्यात महानिर्मितीचे ३३ वीज निर्मिती संच असून, त्यापैकी परळी, नाशिक, भुसावळ, पारस, चंद्रपूर आदी १६ ठिकाणचे संच बंद आहेत. या संचांमधून २.६५ पैसे युनिटने वीज महावितरणला मिळत होती. मात्र महावितरण कंपनी खासगी कंपन्यांकडून सध्या ३ रुपये ते ३ रुपये ९५ पैसे दराने वीज खरेदी करीत आहे. भांडवलदारांना जगविण्यासाठीचा खर्च ग्राहकांवर कशासाठी टाकला जात आहे, असा सवाल मोहन शर्मा यांनी केला.

टॅग्स :Sangliसांगलीmahavitaranमहावितरण