शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

पाच डिसेंबरपर्यंत अंतिम मुदतवाढ :

By admin | Updated: November 21, 2014 00:29 IST

पुन्हा निविदा दाखल झाली नाही तर शासनाकडे अहवाल जाणार

सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या २१ एकर जागा विक्रीसाठी निविदा दाखल करण्यास दोनवेळा मुदतवाढ देऊनही, नव्याने एकही निविदा दाखल झालेली नाही. आतापर्यंत १०३ प्लॉटस्पैकी केवळ तीन प्लॉटसाठी निविदा दाखल झाल्या आहेत. त्यामुळे जागा विक्रीसाठी नियुक्त केलेल्या समितीने निविदा प्रक्रियेला दि. ५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली असून, ही मुदतवाढ अंतिम आहे. यावेळीही प्रतिसाद न मिळाल्यास, लिलावास प्रतिसाद नसल्याचा अहवाल शासनाकडे देणार असल्याचे, जागा विक्रीसाठी गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष अवर निबंधक सहकारी संस्था तथा जिल्हा बँकेचे प्रशासक शैलेश कोतमिरे यांनी सांगितले.वसंतदादा साखर कारखाना आर्थिक अरिष्टात सापडला आहे. गत गळीत हंगामातील गाळप केलेल्या उसाची २१ कोटींची देणी अद्यापही शेतकऱ्यांना दिलेली नाहीत. शेतकरी, जिल्हा बँक आणि कर्मचाऱ्यांच्या पगाराची थकबाकीसह जवळपास शंभर कोटींची थकबाकी कारखान्याकडे आहे. बँका व शेतकऱ्यांची थकित देणी देण्यासाठी कारखान्याची २१ एकर जागा विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. कारखान्याच्या उत्तर बाजूला सांगली-माधवनगर रस्त्यालगतच ही जागा आहे. त्यामुळे या जागेला चांगली किंमत मिळून कारखान्याची देणी भागतील, असा तर्कही काढण्यात आला होता. कारखान्याच्या २१ एकर जागा विक्रीला शासनानेही परवानगी दिली. जागा विक्रीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी चारजणांची समितीही नियुक्त करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष अवर निबंधक सह. संस्था तथा जिल्हा बँकेचे प्रशासक शैलेश कोतमिरे असून, समितीत पुणे साखर आयुक्त (प्रशासन) संचालक डॉ. किशोर तोष्णीवाल, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील व कोल्हापूर प्रादेशिक सह. संस्था साखर योगीराज सुर्वे यांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीने जागा विक्री निविदेस पुन्हा ५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ही मुदतवाढ अंतिम असून, या कालावधित निविदा दाखल न झाल्यास राज्य शासनास तसा अहवाल देणार आहे. यावर शासनच योग्य तो निर्णय घेईल, असे मत शैलेश कोतमिरे यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)समितीसमोर पेचप्रसंगकारखान्याने २१ एकर जागेत १०३ प्लॉट पाडले. त्याच्या रेखांकनाला महापालिकेची मान्यताही घेण्यात आली आहे. त्यानंतर समितीने जागा विक्रीची निविदा प्रसिद्ध करीत १५ आॅक्टोबरपर्यंतची मुदत दिली होती. या कालावधित केवळ तीन प्लॉटसाठी तीन निविदा दाखल झाल्या. निविदेला अल्प प्रतिसाद मिळाल्याने समितीने प्रक्रियेला ५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला होता. या मुदतीत नव्याने एकही निविदा दाखल झाली नाही. त्यामुळे समितीने पुन्हा एकदा २० नोव्हेंबरपर्यंत निविदा दाखल करण्यास मुदतवाढ दिली होती. दुसऱ्या मुदतीत एकही निविदा दाखल झाली नसल्यामुळे जागा विक्री समितीसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे पुन्हा प्रयत्न सुरू झाले आहेत.