शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
2
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
3
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
4
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
5
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
6
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
7
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
8
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
9
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
10
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
11
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
12
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
13
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
14
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
15
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
16
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
17
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
18
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
19
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
20
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  

बोरगावच्या कृष्णाकाठावर मृत माशांमुळे दुर्गंधी

By admin | Updated: May 19, 2015 00:24 IST

पाणी सोडले, तेही अपुरेच : पाटबंधारे विभागाचा बेजबाबदारपणा; ग्रामस्थांमधून संताप

बोरगाव : कृष्णा नदीपात्रात कारखान्याचे रासायनिक पदार्थ व मळीमिश्रित पाणी मिसळत असल्याने बोरगाव (ता. वाळवा) येथे दोन दिवसात लाखो मासे मृत झाले. हे मासे कुजू लागल्याने बोरगावसह फार्णेवाडी, ताकारी, बनेवाडी, गौंडवाडी, साटपेवाडी परिसरात कृष्णाकाठी दुर्गंधी पसरली आहे. पाटबंधारे विभागाने नदीत पाणी सोडले असले तरी, ते अपुरे असल्याने तुटपुंज्या प्रमाणात मासे वाहून गेले आहेत. किमान दोन टीएमसी पाणी सोडण्याची मागणी होत आहे.गेल्या दोन दिवसापासून बोरगाव, बहे, ताकारी येथे कृष्णा नदीपात्रात मृत माशांचा खच पडला आहे. हे मासे दोन दिवस पाण्यावर तरंगत असल्याने आता कुजू लागले आहेत. मासे कुजल्याने त्याची दुर्गंधी परिसरात पसरु लागली आहे. पाण्याबरोबरच हवेचेही प्रदूषण होत असल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.ग्रामपंचायतीने स्वच्छतेसाठी उपाययोजना सुरू केल्या असून, पाण्यापासून कोणालाही त्रास होऊ नये, यासाठी प्राथमिक आरोग्य विभागातर्फे उपाय सुचविले जात आहेत. पाटबंधारे खात्याने अर्धा टीएमसी पाणी सोडले आहे. परंतु एवढ्या पाण्याने मासे वाहून जाण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे किमान दोन टीएमसी पाणी सोडावे, अशी मागणी होत आहे.ज्या कारखान्याने कृष्णा नदीपात्रात रासायनिक पदार्थ व मळीमिश्रित पाणी सोडले, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा वैभव जलसिंचन योजनेचे अध्यक्ष तानाजीराव पाटील यांनी दिला आहे. (वार्ताहर)कारवाईची मागणीसोमवारी दुपारी सरपंच केशव वाटेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा झाली. नदी प्रदूषणास जबाबदार कारखाने व उद्योजकांवर कारवाईची मागणी करण्यात आली. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी जयवंत हजारे, बाजीराव मालवेकर यांना निवेदन देण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून कृष्णेचे पाणी दूषित होऊन ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. असे असतानाही कोणावरही कारवाई झालेली नाही. रस्त्यावर टायर जाळून आंदोलन करणाऱ्यांना दोन कोटीचा दंड होतो, तशी घटनेत तरतूद आहे, तर मग पाणी प्रदूषण करुन जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर कोणतीच कारवाई का होत नाही? प्रशासन गप्प का?- जितेंद्र पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य, बोरगावकृष्णा नदीपात्रात जर कृष्णा साखर कारखान्याने रासायनिक पदार्थ अथवा मळीमिश्रित पाणी सोडले असते, तर शिरटे, नरसिंहपूर, कोळे, बहे येथील नदीपात्रातही मासे मृत झाले असते. केवळ बोरगाव, ताकारी व इतर वाड्या-वस्त्यांवरच मासे मृत झाले. निवडणूक तोंडावर असल्यानेच विरोधक राजकीय हेतूने आरोप करत आहेत. - अविनाश मोहिते, अध्यक्ष, कृष्णा साखर कारखाना