शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मृतदेह विटंबना; आंबोळेंसह दोघेजण निलंबित

By admin | Updated: November 6, 2014 00:03 IST

आयुक्तांची कारवाई : वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक, मुकादमाची वेतनवाढ रोखली

सांगली : मिरजेत झालेल्या बेवारस मृतदेहांच्या विटंबनेप्रकरणी आज, बुधवारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुनील आंबोळे व सफाई कर्मचारी गोविंद मद्रासी या दोघांना आयुक्त अजिज कारचे यांनी निलंबित केले, तर वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक आर. के. यादव व मुकादम मिलिंद शिंदे यांची वेतनवाढ रोखण्यात आली. या चौघांवर कामात निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. मृतदेह विल्हेवाट लावण्यात पोलीस व सिव्हिल प्रशासनावरही ठपका ठेवला असून, त्याचा अहवाल संबंधित विभागाकडे पाठविण्यात आला आहे. सांगलीतील दोन बेवारस मृतदेह पोलिसांनी महापालिका आरोग्य विभागाच्या मजुरांच्या ताब्यात अंत्यसंस्कारासाठी दिले होते. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह कापडात गुंडाळून दिले जातात; मात्र बेवारस दोन्ही मृतदेह नग्नावस्थेत, शववाहिकेऐवजी कचरा उचलणाऱ्या गाडीतील कंटेनरमधून मिरजेतील पंढरपूर रोड स्मशानभूमीत आणण्यात आले. बेवारस मृतदेहांची विटंबना होते, याप्रकरणी महापालिकेवर टीकेची झोड उठल्यानंतर आयुक्तांनी प्रभारी उपायुक्त सुनील नाईक यांच्या अध्यक्षतेखालील समितीत सहाय्यक आयुक्त टीना गवळी, आरोग्य अधिकारी डॉ. सुनील आंबोळे, डॉ. रवींद्र ताटे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक किशोर गोंधळेकर या पाच सदस्यांची चौकशी समिती नियुक्त केली होती. या समितीने सोमवारी सायंकाळी आपला सीलबंद अहवाल आयुक्तांना सादर केला होता. या अहवालात आरोग्य विभागाकडील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केली असून, कामाकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. त्यांच्या निष्काळजीपणामुळे महापालिकेची बदनामी झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्याची दखल घेत आयुक्त कारचे यांनी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सुनील आंबोळे व मृतदेहांची विल्हेवाट लावणारा सफाई कामगार गोविंद मद्रासी या दोघांना निलंबित केले. तरसेच वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक आर. के. यादव यांच्या दोन वेतनवाढी, तर मुकादम मिलिंद शिंदे यांची एक वेतनवाढ रोखण्याचे आदेश दिले आहेत. (प्रतिनिधी)संघटना आक्रमकमृतदेहाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी महापालिकेची असली तरी, त्याची सर्व पूर्तता पोलीस व सिव्हिल प्रशासनाने करावयाची आहे. या प्रकरणात सिव्हिलने विवस्त्र मृतदेह पालिकेच्या ताब्यात दिले. पोलिसांनी पंचनामा केला नाही, की दफनावेळीही ते हजर नव्हते. त्यामुळे केवळ पालिका कर्मचारी दोषी आहेत असे नव्हे, तर जबाबदारी पोलीस व सिव्हिलची आहे. त्यासाठी आता शुक्रवारी आयुक्त अजिज कारचे यांची भेट घेऊन त्यांना जाब विचारणार असल्याचे कर्मचारी संघटनेचे नेते दिलीप शिंदे यांनी सांगितले. सांगली, मिरज पोलिसांतील फरकबेवारस मृतदेहाबाबत सांगली व मिरज पोलिसांतील फरकही अहवालात स्पष्ट करण्यात आला आहे. मिरजेतील पोलीस बेवारस मृतदेहाची विल्हेवाट लावताना महापालिकेला पत्र देऊन शववाहिकेची मागणी करतात. मृतदेहाचे दफन करेपर्यंत पोलीस कर्मचारी तेथे हजर असतो. सांगली शहर पोलीस ठाण्यातील कनिष्ठ दर्जाच्या कर्मचाऱ्यांकडून पालिकेला पत्र दिले जाते. त्यात पालिकेने मृतदेहाची विल्हेवाट लावा, असे सांगून आपली जबाबदारी झटकली जात असल्याचे स्पष्ट केल्याचे सूत्रांनी सांगितले. पालिका कर्मचाऱ्यांची टोलवाटोलवीपोलिसांचे पत्र आयुक्तांनी वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविले. वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील आंबोळे यांनी आर. के यादव यांना दूरध्वनीवरून दोन मृतदेहांची विल्हेवाट लावण्यास सांगितले. यादव यांनी मुकादमाला, तर मुकादमाने सफाई कर्मचाऱ्याला दूरध्वनीवरूनच हा आदेश दिल्याचे अहवालात उघड झाल्याने या चौघांवर कारवाई करण्यात आली आहे.पोलीस, सिव्हिलकडून हेटाळणीबेवारस मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात पोलीस व सिव्हिल प्रशासनाचीही जबाबदारी असते. या दोन्ही मृतदेहांबाबत पोलीस व सिव्हिलकडूनही निष्काळजीपणा झाला आहे. सिव्हिल प्रशासनाने पालिका कर्मचाऱ्यांच्या ताब्यात मृतदेह देताना ते कापडात गुंडाळून दिले नाहीत. बेवारस मृतदेह ताब्यात घेऊन त्यांचे दफन करेपर्यंत पोलीस कर्मचारी हजर राहणे अनिवार्य आहे. मृतदेहाचा पंचनामा करून पोलिसांनी तो पालिका कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देणे अपेक्षित आहे; पण या प्रकरणावेळी एकही पोलीस कर्मचारी त्यांच्यासोबत नव्हता. पालिका कर्मचाऱ्यांनी याबाबत सिव्हिलकडे चौकशी केली असता, तुम्ही मृतदेह घेऊन जावा, पोलिसांना नंतर पाठवतो, असे सांगण्यात आले. त्यामुळे पोलीस व सिव्हिल प्रशासनाकडून निष्काळजीपणा झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. तसा अहवाल आयुक्तांनी जिल्हा पोलीस प्रमुख व सिव्हिलच्या अधिष्ठातांना पाठविला आहे. पोलीस, सिव्हिलकडून हेटाळणीबेवारस मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात पोलीस व सिव्हिल प्रशासनाचीही जबाबदारी असते. या दोन्ही मृतदेहांबाबत पोलीस व सिव्हिलकडूनही निष्काळजीपणा झाला आहे. सिव्हिल प्रशासनाने पालिका कर्मचाऱ्यांच्या ताब्यात मृतदेह देताना ते कापडात गुंडाळून दिले नाहीत. बेवारस मृतदेह ताब्यात घेऊन त्यांचे दफन करेपर्यंत पोलीस कर्मचारी हजर राहणे अनिवार्य आहे. मृतदेहाचा पंचनामा करून पोलिसांनी तो पालिका कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देणे अपेक्षित आहे; पण या प्रकरणावेळी एकही पोलीस कर्मचारी त्यांच्यासोबत नव्हता. पालिका कर्मचाऱ्यांनी याबाबत सिव्हिलकडे चौकशी केली असता, तुम्ही मृतदेह घेऊन जावा, पोलिसांना नंतर पाठवतो, असे सांगण्यात आले. त्यामुळे पोलीस व सिव्हिल प्रशासनाकडून निष्काळजीपणा झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. तसा अहवाल आयुक्तांनी जिल्हा पोलीस प्रमुख व सिव्हिलच्या अधिष्ठातांना पाठविला आहे.